शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Video: Burning Train: आष्टी- अहमदनगर रेल्वेला अचानक लागली आग; ५ डबे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 17:05 IST

नारायण डोहजवळ अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली.

- नितीन कांबळेकडा ( बीड) : न्यू आष्टी रेल्वेस्टेशनवरून अहमदनगरकडे जाणाऱ्या रेल्वेस नारायण डोहजवळ अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. रेल्वेच्या पाच डब्यांना आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेतली.आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती आहे. 

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे अहमदनगर-आष्टीपर्यंत काम पूर्ण झाले आहे.यामार्गावर अहमदनगर-न्यू आष्टी रेल्वेसेवा दि.२३ सप्टेंबर २०२२ पासून नियमित सुरू झाली आहे.ही रेल्वे अहमदनगरवरून सकाळी ७.४५ वा.निघते व न्यू आष्टी येथे १०.१५ वा.येते त्यानंतर न्यू आष्टी वरून ११ वा.निघून दुपारी २ वा.अहमदनगर येथे पोहचते. आज अहमदनगर येथूनच सकाळी १०.३० वा गाडी सुटल्याने आष्टी येथे उशिरा आली.

दरम्यान, ही रेल्वे पुन्हा आष्टी येथून अहमदनगर येथे निघाली.दुपारी ३.३० वा.नारायणडोहच्या पुढे गेल्यानंतर अहमदनगर-सोलापूर मार्गावरील गेट पार करताना अचानक पुढील पाच डब्यांना आग लागली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच आग आटोक्यात आणण्यासाठी अहमदनगर महापालिका कर्मचारी व नागरिकांनी धाव घेतली.काही वेळानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. रेल्वे अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली असून आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.

टॅग्स :railwayरेल्वेBeedबीडfireआग