शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

उसतोड मजूर, मुकादमांच्या अडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:46 PM

ऊसतोड कामगारांशिवाय गुलाल लागत नाही हा इतिहास असल्याचा विश्वास बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : मांजरसुंबा येथे उसतोड मजुरांची बैठक

मांजरसुंबा : ऊसतोड कामगारांशिवाय गुलाल लागत नाही हा इतिहास असल्याचा विश्वास बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला. बालाघाटावरील मांजरसुंबा येथे मुकादम आणि ऊसतोड कामगारांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत कोयता उंचावून उसतोड कामगारांनी धनुष्यबाणाला साथ देण्याचा निर्णय घेतला. यावेळी ऊस तोडणी कामगार महामंडळाचे अध्यक्ष केशवराव आंधळे, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, श्रीमंत जायभाये, गोरख रसाळ, राणा डोईफोडे आदी उपस्थित होते.जयदत्त क्षीरसागर म्हणाले, बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांचा आशिर्वाद असल्याशिवाय गुलाल लागत नाही हा इतिहास आहे. सोशल मिडियावर अफवा पसरविण्याचे काम सध्या विरोधक करत आहेत. त्यांना काय करायचे ते करू द्या, आपण आपली दिशा ठरवून काम करूया. २४ तारखेला त्यांचा सामुदायिक रडण्याचा कार्यक्रम होईल हे नक्की. मुकादम संघटना आणि ऊसतोड कामगार माझ्या पाठीशी उभी राहिली त्यामुळे मला मोठे मताधिक्य मिळेल यात दुमत नाही. धनुष्यबाणाला मतदान करून मला पाठबळ द्या असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी केले.लालासाहेब घुगे यांनी ऊसतोड मुकादम संघटनेला भविष्यात मदत व्हावी, त्यांचे प्रश्न सोडवावेत त्यासाठी जयदत्त क्षीरसागरांचे पाठबळ आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले तर माजी आ. केशवराव आंधळे म्हणाले, ऊसतोड कामगार आणि मुकादमांची बैठक होत असते. या बैठकीत निर्णय ठरतो आणि त्या निर्णयाप्रमाणे आम्ही उमेदवार निवडत असतो. आता आमचे ठरले आहे. शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर हेच आपले उमेदवार आहेत. त्यांना निवडून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे ते म्हणाले. यावेळी दत्तोबा भांगे, नितीन धांडे, रतन गुजर आदी उपस्थित होते.पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या प्रकल्पाची गरजऊसतोड कामगार आणि संघटनेच्या भविष्यात अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सकारात्मक भूमिका ठेऊ. पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. तो सुटणे काळाची गरज आहे. त्यासाठी मोठे प्रकल्प होणे आवश्यक आहेत. म्हणूनच केंद्रात आणि राज्यात जे सरकार येणार आहे त्या सरकारमध्ये आपण सहभागी झाले पाहिजे, अशी भूमिका मांडत जयदत्त क्षीरसागर यांनी मतदारसंघात भविष्यामध्ये कराव्या लागणाऱ्या विकासकामांची माहिती दिली.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना