शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करावा : कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:28 IST

बीड : आजच्या आधुनिक काळात तरुण युवकांनी आपल्याकडे असलेल्या शेतीत पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे ...

बीड : आजच्या आधुनिक काळात तरुण युवकांनी आपल्याकडे असलेल्या शेतीत पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे आवश्यक असल्याचे मत प्रगतिशील शेतकरी कल्याणराव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते वडवणी तालुक्यातील खळवट लिमगांव येथील जागतिक कृषी महोत्सव कृषी शास्त्र विभाग श्री स्वामी समर्थ आयोजित कृषी महोत्सव कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, महादेव अंबुरे, अनिल वाघमारे, आण्णासाहेब जगताप, दत्तात्रय चव्हाण, प्रल्हाद गवारे यांची उपस्थिती होती.

यावेळी कुलकर्णी म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील पश्चिम महाराष्ट्र म्हटल की, हा भाग सुजलाम् सुफलाम् असे वर्णन आपण करतो आणि त्या भागातील सर्वच शेतकऱ्यांना आपण प्रगतिशील शेतकरी म्हणून उपमा देतो. कारण या भागातील शेतकरी आज हा शेतीकडे उद्योग म्हणून पाहतो आहे. आपल्या भागात मात्र हे चित्र दिसून येत नाही. शेतकरी हे पारंपरिक पद्धतीचा अवलंब करीत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनाही फळबागांना प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील शेतकरी आपल्या शेतीची काळजी घेत नाहीत. आपल्या शेतीची सर्व जबाबदारी कुटुंबावर सोपवितो. महिलांना कामे सांगितले जाते. स्वतःदेखील आपल्या शेताची चांगली काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगून ज्येष्ठ शेतकऱ्यांऐवजी आता युवकांनी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि एक यशस्वी शेती उद्योजक बनावे, असे मतही शेवटी प्रगतिशील शेतकरी कल्याणराव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. यावेळी एस. एम. देशमुख, महादेव अंबुरे आणि शेतीविषयक तज्ज्ञांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण देशमुख, शाहूराव काजवे, गणेश टकले, बाळासाहेब अंबुरे, सखाराम कणेरकर, राहुल अंबुरे, नचिकेत जाधव, ओम जाधव, दत्ता जाधव, शंकर झाडे, नारायण जाधव यांच्यासह वडवणी आणि खळवट लिंबगाव पंचक्रोशीतील शेतकरी, सेवेकरी परिवार व महिला यांनी परिश्रम घेतले.