शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वीज जोडणी पूर्ववत करा, अन्यथा शेतकरी पायतानाने झोडपून काढतील : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 16:28 IST

Raju Shetty : महावितरण कंपनीच्या अन्यायाविरुद्ध सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी तोंडाला कुलूप लावून गप्प का ?

केज ( बीड ) : महावितरणने पूर्वसूचना न देता सक्तीची वीज बील वसुली सुरु केल्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. हा अन्याय तात्काळ थांबवून महावितरणने पूर्ववत वीज जोडून द्यावी, अन्यथा शेतकरी पायतांन घेऊन अधिकाऱ्यांना झोडपून काढतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty ) यांनी दिला. ते तालुक्यातील नाव्होली येथील शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करत होते. 

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना व बळीराजा सामाजिक प्रतिष्ठान, नाव्होली यांच्या संयुक्त विद्यमाने "शेतकरी संताप मेळाव्याचे" आयोजन शुक्रवारी  सायंकाळी 7 वाजता  करण्यात आले होते. माजी खासदार शेट्टी पुढे म्हणाले, रब्बी हंगामात कुठलीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे महावितरणने शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे वीज कनेक्शन कापले, सक्तीची वीज बील वसुली करणाऱ्या महावितरण कंपनीच्या अन्यायाविरुद्ध येथील सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी तोंडाला कुलूप लावून गप्प का ? गेल्या महिनाभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने झालेल्या मराठवाडा -विदर्भात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या परिषदेमुळे व  रविकांत तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनामुळे राज्य सरकारने सोयाबीनवरील स्टॉक लिमिट उठविण्याचा निर्णय घेतला असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे संघटित होऊन थोडा संयम बाळगावा सोयाबीनचे दर आणखीन वाढतील आश्‍यकतेनुसार सोयाबीनची विक्री करावी असे आवाहन ही शेट्टी यांनी केले. यावेळी मंचावर जेष्ठ नेत्या प्रा.सुशीलाताई मोराळे, जिल्हाध्यक्ष(पक्ष) कुलदीप करपे, गजानन बंगाळे, पूजा मोरे, रवींद्र इंगळे,(संघटना) जिल्हाध्यक्ष अनिल रांजनकर, अशोक गीते, प्रमोद पांचाळ, अशोक साखरे, सामाजिक कार्यकर्ते जे. डी. शहा, सी.बी.एस. इनामदार, मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस आदींची उपस्थिती होती.  

सोमवारी महावितरण कार्यालयावर 'हल्लाबोल मोर्चा' महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या जुलमी अन्यायाविरुद्ध व सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात अंबाजोगाईत महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर सोमवारी ( दि.29 ) सकाळी 11  वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने "हल्लाबोल"मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला सर्व शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून ताकतीने यावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले. मेळावा यशस्वीतेसाठी बळीराजा प्रतिष्ठान चे सी.बी.एस.इनामदार, रणजित बिक्कड, अंकुश बिक्कड, कल्याण केदार, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे केज शहराध्यक्ष फेरोजभाई पठाण, भागवत पवार, सुग्रीव करपे, नवनाथ काकडे, चंद्रकांत अंबाड,भारत मुळे, बिभीषण इंगळे,विश्वास जाधव आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीBeedबीडmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी