शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

आपले सरकार सातबारा कोरा करणार- उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:47 IST

परतीच्या पावसाने शेतकºयाच्या हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. यात पीक विमा कंपनी या कागदी घोडे नाचवण्याचे काम करीत आहेत परंतु आता हे कागदी घोडे नाचवले जाणार नाहीत आपले सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल, असे सूचक विधान पावसाने नुकसान झालेल्या पाहणी दौºयात माजलगाव याठिकाणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिला धीर : सर्व अडचणी सोडवण्यास शिवसेना वचनबद्ध; टोकाचे पाऊल न उचलण्याचे केले आवाहन

माजलगाव : परतीच्या पावसाने शेतकºयाच्या हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. यात पीक विमा कंपनी या कागदी घोडे नाचवण्याचे काम करीत आहेत परंतु आता हे कागदी घोडे नाचवले जाणार नाहीत आपले सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल, असे सूचक विधान पावसाने नुकसान झालेल्या पाहणी दौºयात माजलगाव याठिकाणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.परतीच्या पावसाने शेतकºयाचे कंबरडे मोडले आहे. यात शेतकरी संपूर्ण खचून गेला आहे. पावसाने शेतकºयाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. असे असताना पीक विमा कंपन्या ह्या कागदी घोडे नाचवण्याचे काम करीत आहेत.परंतु आजच्या पाहणी दौºयात जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्याने यापुढे या विमा कंपन्या कागदी घोडे नाचवणार नाहीत. यंत्रणेचे सर्व लोक हे बांधावर येऊन पंचनामे करतील आणि नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होतील. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना बँक या शेतकºयांना नोटीस पाठवत आहेत परंतु शेतकºयाने या नोटीसकडे लक्ष देऊ नये. खचून न जाता हिमतीने या अस्मानी संकटाचा सामना आपण करू. शिवसेनाही कायम शेतकºयाच्या खांद्याला खांदा लावून सोबत राहील. शेतकºयांच्या सर्व अडीअडचणी या सोडवण्यात येतील आणि त्यासाठी शिवसेना ही कायम वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी अनेक शेतक-यांनी उद्धव ठाकरे यांना निवेदने दिली.ठाकरे यांच्यासोबत मंत्री एकनाथ शिंदे, अनिल देसाई, जयदत्त क्षीरसागर, चंद्रकांत खैरें, मिलिंद नार्वेकर, राजेश देशमुख, शिवाजीराव गुट्टे, दिनकर मुंडे, श्रीहरी मुंडे, जीवराज ढाकणे, नामदेवराव आघाव, प्रा.विजय मुंडे, शिवसेनेचे व्यंकटेश शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, बाळासाहेब पिंगळे, राजेश देशमुख, रमेश आडसकर, रमेश पोकळे, माऊली फड, तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, शालिनी कराड शांतीलाल जैन, विकासराव डूबे, अशोक जैन, अनिल जगताप, माजलगावचे अप्पासाहेब जाधव, अमोल डाके, अशोक आळणे, शिवमूर्ती कुंभार, पापा सोळंके, दत्ता रांजवण उपस्थित होते. ठाकरे यांनी अतिवृष्टी भागास भेटी दिल्या. त्यांनी परळी- बीड रस्त्यावरील गोपीनाथ गड येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. ठाकरे हे गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शनासाठी येणार असल्याने मंगळवारी सकाळी गडाचे सेवक विठ्ठल दगडोबा मुंडे (रा.लिंबोटा) यांनी कमळ-धनुष्यबाणाची रांगोळी साकारली. ही रांगोळी प्रसारमाध्यमांतून चर्चेत राहिली.कौटुंबिक जिव्हाळा कायम राहो : पंकजा मुंडेभाजपच्या कोअर कमिटीची बैठक असल्याने राज्याच्या ग्रामविकास आणिमहिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे मुंबईत होत्या. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, आदरणीय उद्धवजी ठाकरे गोपीनाथगड येथे पोहोचले आहेत. मी त्यांचे स्वत: प्रत्यक्षात स्वागत करण्यासाठी नाही. पण मनापासून स्वागत !! राजकारणापलीकडे हा वैयक्तिक जिव्हाळा आपल्या परिवारात नेहमी होता. मुंडेसाहेबांच्या पश्चात आपण तो तसाच ठेवलात. ते प्रेम सदैव कायम राहो! परळीत पाच वाजता उद्धव ठाकरे यांचा गोपीनाथगडावर दौरा होता, त्यामुळे तीन वाजल्यापासून कार्येकर्ते गडावर जमण्यास सुरु वात झाली. परंतु ते सव्वातीन तास उशिरा पोहोचले.. दरम्यान ते कधी येणार , आणि काय बोलणार, उपस्थित सेना- भाजप कार्यकर्त्यांची संवाद साधणार का, अशी उत्सुकता होती, परंतु ते मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन गाडीत बसून निघून गेले. त्यांना बोलण्यासाठी टेबल खुर्ची, माइकही लावून ठेवले होते, कार्येकर्ते पदाधिकारी ते बोलणार म्हणून खुर्चीवर चार तास बसून राहिले

टॅग्स :BeedबीडUddhav Thackerayउद्धव ठाकरेAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस