शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सुटयात मावशीकडे आलेल्या दोन बहिणींचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 15:41 IST

माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथील घटना

माजलगाव (बीड) : तालुक्यातील महातपुरी येथे मावशीकडे गेवराई व परतूर तालुक्यातून आलेल्या दोन मावस बहिणींचा गोदावरी बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली.

सध्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या असल्याने काही दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथील दिपाली गंगाधर बरबडे ( 20 ) व आनंदगाव ( ता. परतुर ) येथील स्वाती अरुण चव्हाण ( 12 ) या मावस बहिणी माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथील आपल्या मावशीकडे आल्या होत्या. मावशी आणि आईसोबत दोघीही गोदावरी नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी जात असत. 

आज सकाळी स्वाती बंधाऱ्यात आंघोळ करत असताना पाण्यात बुडाली. हे पाहून तिला पकडण्यासाठी दिपालीने प्रयत्न केले. मात्र, दोघीही पाण्यात बुडाल्या. हे पाहून बंधाऱ्यावरील महिलांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले. तोपर्यंत दोघी पाण्यात बुडाल्या होत्या. त्यांना सापडण्यासाठी जवळपास एक तास लागला. त्यांना बाहेर काढून माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून दोघींना मृत घोषित केले. त्यानंतर या ठिकाणी त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या मृत्यू प्रकरणी लक्ष्मण रामभाऊ शिंगाडे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पो.काँ. माणीक राठोड करत आहेत.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू