शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

चोर समजून बीड जिल्ह्यात दोघांना बेदम मारहाण, मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 7:20 AM

मुले चोरणारी टोळी जिल्ह्यात आली असून अनेक गावांतील मुलांना त्यांनी पळवून नेले आहे, या अफवेवर विश्वास ठेवून माजलगाव शहरात व माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे दोघांना बेदम मारहाण करण्यात आली.

बीड : मुले चोरणारी टोळी जिल्ह्यात आली असून अनेक गावांतील मुलांना त्यांनी पळवून नेले आहे, या अफवेवर विश्वास ठेवून माजलगाव शहरात व माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जित्तू बाशु ईश्वर (४० रा.तमिळनाडू) यांच्यासह अन्य एका मतीमंद तरूणाला मारहाण झाली आहे. सध्या सोशल मीडियावरून मुले पळविणारी टोळी बीड जिल्ह्यात आल्याची अफवा पसरू लागली आहे. औरंगाबाद, परभणी, जालना नंतर आता बीडमध्येही दोघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे एक मतीमंद तरूण गावात फिरत असताना काही लोकांनी मुले पळविण्यासाठी आला आहे, असे समजून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांनी माजलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी नाना तौर व अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच बुधवारी सकाळी ११च्या सुमारास जित्तु ईश्वर याला पात्रुड येथे मारहाण केली. जित्तू हा गर्दीच्या ठिकाणी उभा होता. काही लोकांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी कसलीच खात्री न करता बेदम मारहाण करून ग्रामीण ठाण्यात हजर केले. येथील पोलिसांनी त्याला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर जिल्हा रूग्णालयात हलविले. त्याची भाषा समजत नसल्याने रात्री उशिरापर्यंत ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.गेवराईतही महिलेला चोपगेवराई शहरातील आठवडी बाजारात एका भोळसर महिलेला मुले धरणारी समजून मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता घडली. तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ही महिला मुले पकडणारी नसल्याचे तपासाअंती सिद्ध आले. तालुक्यातील अंतरवाली येथे दोन जणांना नागरिकांनी मुले पकडणारे समजून मारहाण केली होती. त्यानंतर सिरसदेवी येथे सहा ते सात मुले पळवून नेली जात असल्याच्या संशयातून जीपला नागरिकांनी अडविले होते. मात्र नंतर त्यात तथ्य आढळले नव्हते.