शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

बीड जिल्ह्यात कर्जास कंटाळून दोन शेतकऱ्यांनी संपविली जीवयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 18:54 IST

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

बीड/पाटोदा : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी जीनयात्रा संपविल्याच्या घटना बीड जिल्ह्यात घडल्या. याप्रकरणी संबंधीत पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

मच्छिंद्र ज्ञानोबा वीर (४० रा. पाटोदा) या शेतकऱ्यास केवळ दोन एकर जमीन आहे. नेहमीच्या दुष्काळी परिस्थितीला तोंड देताना शेतीसह आधार म्हणून हमाली करण्याचा व्यवसाय ते करत होते. काही दिवसांपूर्वी पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी उसनवारी करत मोठ्या मुलीचे लग्न केले. लहरी निसर्गाने धोका दिल्याने शेतात पिके आली नाहीत, त्यामुळे केलेली उसनवारी आणि कर्ज फिटले नाही. गुरुवारी बाजार असल्याने हमालीमधून चांगले पैसे मिळतील या आशेने ते बाजारात गेले. मात्र केवळ १०० रूपये मिळाले. अशा परिस्थितीत दुसऱ्या मुलीचे लग्न कसे करायचे, याची चिंता त्यांना होती. याच नैराश्यातून त्यांनी गळफास घेत गुरूवारी सायंकाळी जीवनयात्रा संपविली. लखन वीर यांच्या खबरीवरून पाटोदा ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. 

दुसरी घटना बीड तालुक्यातील सुर्डीथोट येथे घडली.  युवराज अभिमन्यू थोटे (२८ रा.सुडीर्थोट ता.बीड) या तरूण शेतकऱ्यास चार एकर जमीन आहे. घरात आई-वडिल,पत्नी आणि एक भाऊ असा परिवार आहे. युवराज यांनी शेतीसाठी गावातील सेवा सोसायटीकडून दीड लाख, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वडवणी शाखेतून २५ हजाराचे कर्ज घेतले होते. दुष्काळामुळे शेतीतून उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे युवराज हा नैराश्यात होता. गुरुवारी सायंकाळी तो शेतात गेला होता. त्या ठिकाणी त्याने विषारी द्रव प्राशन केले. हा प्रकार चुलत भाऊ कैलास थोटे यांना कळाल्यानंतर त्यांनी व काही ग्रामस्थांनी तातडीने शेतात धाव घेवून युवराजला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करुन त्यास मयत घोषीत केले. दरम्यान कैलास थोटे यांच्या खबरेवरुन जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत याप्रकरणी नोंद करण्यात आली.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याBeedबीड