शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत १२१ बस ४२ हजार कि.मी. धावल्या; हाती पडले केवळ नऊ लाख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाची चेन ब्रेक करताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसलाही ब्रेक लागला आहे. प्रवासी नसल्याने मोजक्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोनाची चेन ब्रेक करताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसलाही ब्रेक लागला आहे. प्रवासी नसल्याने मोजक्यास बस धावत आहेत. त्यामुळे रापमला लाखो रुपयांचा दररोज फटका बसत आहे. मागील दोन दिवसांत विकेंड लॉकडाऊन होते. या दोन दिवसांत १२१ बस ४२ हजार किलोमीटर धावल्या आहेत. यात केवळ ९ लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात रापमच्या ५१८ बस आहेत. लॉकडाऊनपूर्वी या बस धावत होत्या. यात दररोज ४० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळत होेते; परंतु सध्या लॉकडाऊनमुळे आणि मोजक्याच प्रवाशांना परवानगी असल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या दोन दिवसांत केवळ ९ लाख ८ हजार रुपयांचे उत्पन्न रापमला मिळाले आहे. तर निम्मेच कर्मचारी कर्तव्यावर बोलविले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

निम्मेच कर्मचारी कामावर

बस जागेवर असल्याने चालक, वाहक, तंत्रज्ञ आदी कर्मचारी कामावर येत नाहीत. शासनाच्या नियमावलीनुसार ५० टक्केच कर्मचारीही कार्यालयात असतात.

चालक, वाहकांना रोटेशननुसार कर्तव्यास बोलावले जात आहे. तर काहींना मुंबई बेस्टसाठी पाठविण्यात आलेले आहे. सध्या निम्मेच कर्मचारी कर्तव्यावर येत असल्याचे दिसते.

कोरोनाची चेन ब्रेक करताना तोटा

n जिल्ह्यात धावणाऱ्या बसमधून महामंडळाला दररोज सरासरी ४० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळत होते.

n परंतु गतवर्षीपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने रापम तोट्यात आहे. मध्यंतरी बस धावत असल्याने काही प्रमाणात परिस्थिती पूर्ववत होत होती; परंतु आता पुन्हा ‘जैसे थे’ झाले आहे.

n शासनाने कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी जाहीर केलेल्या नियमावलीचा रापमच्या बसलाही फटका बसत आहे. प्रवासी नसल्याने रापम सध्या तोट्यात आहे. आजही केवळ आठ आगारांतून बोटावर मोजण्याइतक्याच बस धावत असल्याचे सांगण्यात आले.

बसची तासनतास प्रतीक्षा

प्रवासी नसल्याने बस वेळेवर निघत नाहीत. ३० प्रवासी झाल्याशिवाय बस हलणार नाही, असे चालक, वाहक सांगतात. त्यामुळे ही संख्या पूर्ण होईपर्यंत बसमध्येच तासनतास बसावे लागत आहे. यामुळे वेळ लागत असून चिडचिडेपणा वाढला आहे.

- अभिमान पंडित, प्रवासी, बीड