शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

राजकीय तव्यावरील सत्तेची भाकरी फिरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:32 IST

बीड : राजकारणात २०२० हे सरते वर्ष अनेकांना लाभदायी ठरले असले तरी मातब्बरांना सत्तेपासून दूर ठेवत अनपेक्षित धक्का दिला. ...

बीड : राजकारणात २०२० हे सरते वर्ष अनेकांना लाभदायी ठरले असले तरी मातब्बरांना सत्तेपासून दूर ठेवत अनपेक्षित धक्का दिला. विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना तर परळीत बहीण-भावाच्या लढतीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत करीत राज्याचे लक्ष बीड जिल्ह्यांकडे वेधले. विशेष म्हणजे, युतीतील दोघेही कॅबिनेट मंत्री पराभूत झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना या सरत्या वर्षाने भाजपाच्या तत्कालीन कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध मोठ्या फरकाने विजयश्रीच मिळवून दिली नाही तर कॅबिनेट त्र्यांची माळ गळ्यात घालून जिल्ह्याचे पालकमंत्री दिले. याउलट पंकजा मुंडेंना सरत्या वर्षात सातत्याने संघर्ष करावा लागला. गोपीनाथगडावरून एकनाथ खडसे यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यजमान पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमक्ष जोरदार हल्ला केला. या प्रकाराची गंभीर दखल पक्षाने घेतली आणि त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकीय फटका पंकजा मुंडेंना बसला. विधान परिषदेवर त्यांना घेतले जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच रमेश कराड यांना घेतले. इकडे सत्तेत येताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद ताब्यात घेऊन मागच्या पराभवाची परतफेड केली.

पुतण्याकडून काका पराभूत

परळीप्रमाणेच बीडमध्येही या सरत्या वर्षाने इतिहास घडविला. संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवित बीड विधानसभा मतदारसंघात तत्कालीन कॅबिनेटमंत्री आणि आपले सख्खे काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करून जिल्ह्याला हादरा दिला. विशेष म्हणजे, जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवसेनेत आले होते. इकडे आष्टीतही राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब आजबे यांना लाॅटरी लागली. त्यांनी तत्कालीन विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांचा पराभव केला. इकडे माजलगावातही भाजपाचे रमेश आडसकर यांना प्रकाश सोळंके यांनी पराभूत करीत भाजपाची जागा हिसकावली. राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या नमिता मुंडे यांना या सरत्या वर्षाने साथ देत विधानसभेवर निवडून दिले. या सरत्या वर्षात भाजपाची पिछेहाट झाली. विधानसभेचे संख्याबळ हे पाचवरून दोनवर आले तर राष्ट्रवादीचे संख्याबळ एकवरून चारवर गेले. जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आणि अध्यक्षपदी शिवकन्या सिरसाठ विराजमान झाल्या.