शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
4
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
5
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
6
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
7
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
8
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
10
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
11
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
13
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
14
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
15
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
16
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
17
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
18
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
19
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
20
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!

राजकीय तव्यावरील सत्तेची भाकरी फिरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:32 IST

बीड : राजकारणात २०२० हे सरते वर्ष अनेकांना लाभदायी ठरले असले तरी मातब्बरांना सत्तेपासून दूर ठेवत अनपेक्षित धक्का दिला. ...

बीड : राजकारणात २०२० हे सरते वर्ष अनेकांना लाभदायी ठरले असले तरी मातब्बरांना सत्तेपासून दूर ठेवत अनपेक्षित धक्का दिला. विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना तर परळीत बहीण-भावाच्या लढतीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत करीत राज्याचे लक्ष बीड जिल्ह्यांकडे वेधले. विशेष म्हणजे, युतीतील दोघेही कॅबिनेट मंत्री पराभूत झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना या सरत्या वर्षाने भाजपाच्या तत्कालीन कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध मोठ्या फरकाने विजयश्रीच मिळवून दिली नाही तर कॅबिनेट त्र्यांची माळ गळ्यात घालून जिल्ह्याचे पालकमंत्री दिले. याउलट पंकजा मुंडेंना सरत्या वर्षात सातत्याने संघर्ष करावा लागला. गोपीनाथगडावरून एकनाथ खडसे यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यजमान पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमक्ष जोरदार हल्ला केला. या प्रकाराची गंभीर दखल पक्षाने घेतली आणि त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकीय फटका पंकजा मुंडेंना बसला. विधान परिषदेवर त्यांना घेतले जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच रमेश कराड यांना घेतले. इकडे सत्तेत येताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद ताब्यात घेऊन मागच्या पराभवाची परतफेड केली.

पुतण्याकडून काका पराभूत

परळीप्रमाणेच बीडमध्येही या सरत्या वर्षाने इतिहास घडविला. संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवित बीड विधानसभा मतदारसंघात तत्कालीन कॅबिनेटमंत्री आणि आपले सख्खे काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करून जिल्ह्याला हादरा दिला. विशेष म्हणजे, जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवसेनेत आले होते. इकडे आष्टीतही राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब आजबे यांना लाॅटरी लागली. त्यांनी तत्कालीन विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांचा पराभव केला. इकडे माजलगावातही भाजपाचे रमेश आडसकर यांना प्रकाश सोळंके यांनी पराभूत करीत भाजपाची जागा हिसकावली. राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या नमिता मुंडे यांना या सरत्या वर्षाने साथ देत विधानसभेवर निवडून दिले. या सरत्या वर्षात भाजपाची पिछेहाट झाली. विधानसभेचे संख्याबळ हे पाचवरून दोनवर आले तर राष्ट्रवादीचे संख्याबळ एकवरून चारवर गेले. जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आणि अध्यक्षपदी शिवकन्या सिरसाठ विराजमान झाल्या.