शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
2
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
3
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
4
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
5
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
6
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
7
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
8
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
9
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
10
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
11
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
12
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
13
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
14
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
15
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
16
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
17
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
18
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
19
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
20
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई

राजकीय तव्यावरील सत्तेची भाकरी फिरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:32 IST

बीड : राजकारणात २०२० हे सरते वर्ष अनेकांना लाभदायी ठरले असले तरी मातब्बरांना सत्तेपासून दूर ठेवत अनपेक्षित धक्का दिला. ...

बीड : राजकारणात २०२० हे सरते वर्ष अनेकांना लाभदायी ठरले असले तरी मातब्बरांना सत्तेपासून दूर ठेवत अनपेक्षित धक्का दिला. विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना तर परळीत बहीण-भावाच्या लढतीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत करीत राज्याचे लक्ष बीड जिल्ह्यांकडे वेधले. विशेष म्हणजे, युतीतील दोघेही कॅबिनेट मंत्री पराभूत झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना या सरत्या वर्षाने भाजपाच्या तत्कालीन कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध मोठ्या फरकाने विजयश्रीच मिळवून दिली नाही तर कॅबिनेट त्र्यांची माळ गळ्यात घालून जिल्ह्याचे पालकमंत्री दिले. याउलट पंकजा मुंडेंना सरत्या वर्षात सातत्याने संघर्ष करावा लागला. गोपीनाथगडावरून एकनाथ खडसे यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यजमान पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमक्ष जोरदार हल्ला केला. या प्रकाराची गंभीर दखल पक्षाने घेतली आणि त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकीय फटका पंकजा मुंडेंना बसला. विधान परिषदेवर त्यांना घेतले जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच रमेश कराड यांना घेतले. इकडे सत्तेत येताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद ताब्यात घेऊन मागच्या पराभवाची परतफेड केली.

पुतण्याकडून काका पराभूत

परळीप्रमाणेच बीडमध्येही या सरत्या वर्षाने इतिहास घडविला. संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवित बीड विधानसभा मतदारसंघात तत्कालीन कॅबिनेटमंत्री आणि आपले सख्खे काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करून जिल्ह्याला हादरा दिला. विशेष म्हणजे, जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवसेनेत आले होते. इकडे आष्टीतही राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब आजबे यांना लाॅटरी लागली. त्यांनी तत्कालीन विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांचा पराभव केला. इकडे माजलगावातही भाजपाचे रमेश आडसकर यांना प्रकाश सोळंके यांनी पराभूत करीत भाजपाची जागा हिसकावली. राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या नमिता मुंडे यांना या सरत्या वर्षाने साथ देत विधानसभेवर निवडून दिले. या सरत्या वर्षात भाजपाची पिछेहाट झाली. विधानसभेचे संख्याबळ हे पाचवरून दोनवर आले तर राष्ट्रवादीचे संख्याबळ एकवरून चारवर गेले. जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आणि अध्यक्षपदी शिवकन्या सिरसाठ विराजमान झाल्या.