शहरं
Join us  
Trending Stories
1
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
2
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
3
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
4
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
5
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
6
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
7
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
8
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
9
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
10
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
11
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
12
पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग! 
13
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
14
Video: विराट - गंभीरमधील वाद ताणला गेला का? एअरपोर्टवर सिलेक्टरशी किंग कोहलीशी गंभीर चर्चा
15
कर्जमुक्त असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, २०% चं अपर सर्किट; ₹३३ वर आली किंमत
16
"प्रत्येक नागरिकाच्या फोनमध्ये प्रवेश कशाला?"; 'संचार साथी' ॲपवरुन प्रियांका गांधींचा केंद्राला थेट सवाल
17
कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? 
18
१५ डिसेंबरपूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; अन्यथा भरावा लागेल मोठा दंड
19
'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
20
अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय तव्यावरील सत्तेची भाकरी फिरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:32 IST

बीड : राजकारणात २०२० हे सरते वर्ष अनेकांना लाभदायी ठरले असले तरी मातब्बरांना सत्तेपासून दूर ठेवत अनपेक्षित धक्का दिला. ...

बीड : राजकारणात २०२० हे सरते वर्ष अनेकांना लाभदायी ठरले असले तरी मातब्बरांना सत्तेपासून दूर ठेवत अनपेक्षित धक्का दिला. विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना तर परळीत बहीण-भावाच्या लढतीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत करीत राज्याचे लक्ष बीड जिल्ह्यांकडे वेधले. विशेष म्हणजे, युतीतील दोघेही कॅबिनेट मंत्री पराभूत झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना या सरत्या वर्षाने भाजपाच्या तत्कालीन कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध मोठ्या फरकाने विजयश्रीच मिळवून दिली नाही तर कॅबिनेट त्र्यांची माळ गळ्यात घालून जिल्ह्याचे पालकमंत्री दिले. याउलट पंकजा मुंडेंना सरत्या वर्षात सातत्याने संघर्ष करावा लागला. गोपीनाथगडावरून एकनाथ खडसे यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यजमान पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमक्ष जोरदार हल्ला केला. या प्रकाराची गंभीर दखल पक्षाने घेतली आणि त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकीय फटका पंकजा मुंडेंना बसला. विधान परिषदेवर त्यांना घेतले जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच रमेश कराड यांना घेतले. इकडे सत्तेत येताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद ताब्यात घेऊन मागच्या पराभवाची परतफेड केली.

पुतण्याकडून काका पराभूत

परळीप्रमाणेच बीडमध्येही या सरत्या वर्षाने इतिहास घडविला. संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवित बीड विधानसभा मतदारसंघात तत्कालीन कॅबिनेटमंत्री आणि आपले सख्खे काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करून जिल्ह्याला हादरा दिला. विशेष म्हणजे, जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवसेनेत आले होते. इकडे आष्टीतही राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब आजबे यांना लाॅटरी लागली. त्यांनी तत्कालीन विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांचा पराभव केला. इकडे माजलगावातही भाजपाचे रमेश आडसकर यांना प्रकाश सोळंके यांनी पराभूत करीत भाजपाची जागा हिसकावली. राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या नमिता मुंडे यांना या सरत्या वर्षाने साथ देत विधानसभेवर निवडून दिले. या सरत्या वर्षात भाजपाची पिछेहाट झाली. विधानसभेचे संख्याबळ हे पाचवरून दोनवर आले तर राष्ट्रवादीचे संख्याबळ एकवरून चारवर गेले. जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आणि अध्यक्षपदी शिवकन्या सिरसाठ विराजमान झाल्या.