शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

दुष्काळ ते अतिवृष्टी अंबाजोगाई तालुक्याचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:55 IST

पावसाळ्यातील तीन महिने अत्यल्प पाऊस झाल्याने शासनाने अंबाजोगाई तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला. इकडे तालुक्यात दुष्काळ जाहीर होताच परतीच्या पावसाने अक्षरश: अंबाजोगाई तालुक्याला धोधो पावसाने झोडपून काढले.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने रबी हंगाम लांबला : निसर्गानं दिलं ते पावसानं हिरावलं; परतीच्या पावसाने केले पिकांचे नुकसान

अविनाश मुडेगावकर।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : पावसाळ्यातील तीन महिने अत्यल्प पाऊस झाल्याने शासनाने अंबाजोगाई तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला. इकडे तालुक्यात दुष्काळ जाहीर होताच परतीच्या पावसाने अक्षरश: अंबाजोगाई तालुक्याला धोधो पावसाने झोडपून काढले. जी काही पिके आली होती. ती झालेल्या मुसळधार पावसाने पाण्यात तरंगली.सोयाबीन, कापूस, पिवळा, बाजरी, या पिकांची या पावसाने अतोनात नुकसान झाले. परिणामी रबी हंगामही परतीच्या पावसाने लांबला आहे. तालुक्यात तळ्यांमध्ये नव्हे तर पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. कोरडा दुष्काळ ते अतिवृष्टी असा प्रवास अंबाजोगाई तालुक्याचा झाला आहे.तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस अत्यल्प पाऊस झाला. या पावसावर अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या. मात्र, पुन्हा जो पाऊस उघडला तो सप्टेंबर महिना संपेपर्यंत आलाच नाही. आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. प्रारंभीच्या काळात परतीचाही पाऊस तसा तुरळकच राहिला. यामुळे रबीच्या पेरण्या चांगल्या होतील. अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होता. मात्र, सलग दोन दिवस परतीच्या पावसाने हाहा:कार केला व सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. एकाच दिवसात नव्वद मिलिमीटरपर्यंत पावसाचे नोंद झाली. तालुक्यात ८४ हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे. जुलैमध्ये कशाबशा ७० हजार हेक्टरपर्यंत पेरण्या झाल्या. मात्र, परतीच्या पावसाने या सर्व पिकांवर पाणी फेरले. पेरणीचा खर्च, काढणीचा खर्च, कसा काढायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना तीव्रतेने भेडसावू लागला आहे. सततच्या पावसाने शेतात वाढलेले तण काढण्यासाठीही मोठा खर्च येतो. त्यात पीकविम्याची रक्कमही अद्यापही अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाली नाही. सलग दोन वर्षे झालेले दुष्काळाचे सावट आता झालेल्या पावसानेही रबी हंगाम लांबणीवर पडला आहे. शेतात पिकांपेक्षा तण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या सर्व समस्यांनी शेतकरी ग्रासलेला आहे. शेतकºयांच्या खिशात खडखडाट असताना नवनवीन संकटे समोर येत आहेत. वाढता खर्च भागवायचा कसा? हे नवीन संकट उभे राहिले आहे. शेताची पाहणी, नुकसानीचे पंचनामे सुरू असले शेतकºयांना मदत मिळणार की केवळ मदतीचा फार्स होणार?

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र