शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
2
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
3
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
4
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
5
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
6
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
7
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
8
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
9
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
10
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
11
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
12
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
13
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
15
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
16
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
17
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
18
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
19
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
20
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."

दुष्काळ ते अतिवृष्टी अंबाजोगाई तालुक्याचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:55 IST

पावसाळ्यातील तीन महिने अत्यल्प पाऊस झाल्याने शासनाने अंबाजोगाई तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला. इकडे तालुक्यात दुष्काळ जाहीर होताच परतीच्या पावसाने अक्षरश: अंबाजोगाई तालुक्याला धोधो पावसाने झोडपून काढले.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने रबी हंगाम लांबला : निसर्गानं दिलं ते पावसानं हिरावलं; परतीच्या पावसाने केले पिकांचे नुकसान

अविनाश मुडेगावकर।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : पावसाळ्यातील तीन महिने अत्यल्प पाऊस झाल्याने शासनाने अंबाजोगाई तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला. इकडे तालुक्यात दुष्काळ जाहीर होताच परतीच्या पावसाने अक्षरश: अंबाजोगाई तालुक्याला धोधो पावसाने झोडपून काढले. जी काही पिके आली होती. ती झालेल्या मुसळधार पावसाने पाण्यात तरंगली.सोयाबीन, कापूस, पिवळा, बाजरी, या पिकांची या पावसाने अतोनात नुकसान झाले. परिणामी रबी हंगामही परतीच्या पावसाने लांबला आहे. तालुक्यात तळ्यांमध्ये नव्हे तर पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. कोरडा दुष्काळ ते अतिवृष्टी असा प्रवास अंबाजोगाई तालुक्याचा झाला आहे.तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस अत्यल्प पाऊस झाला. या पावसावर अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या. मात्र, पुन्हा जो पाऊस उघडला तो सप्टेंबर महिना संपेपर्यंत आलाच नाही. आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. प्रारंभीच्या काळात परतीचाही पाऊस तसा तुरळकच राहिला. यामुळे रबीच्या पेरण्या चांगल्या होतील. अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होता. मात्र, सलग दोन दिवस परतीच्या पावसाने हाहा:कार केला व सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. एकाच दिवसात नव्वद मिलिमीटरपर्यंत पावसाचे नोंद झाली. तालुक्यात ८४ हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे. जुलैमध्ये कशाबशा ७० हजार हेक्टरपर्यंत पेरण्या झाल्या. मात्र, परतीच्या पावसाने या सर्व पिकांवर पाणी फेरले. पेरणीचा खर्च, काढणीचा खर्च, कसा काढायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना तीव्रतेने भेडसावू लागला आहे. सततच्या पावसाने शेतात वाढलेले तण काढण्यासाठीही मोठा खर्च येतो. त्यात पीकविम्याची रक्कमही अद्यापही अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाली नाही. सलग दोन वर्षे झालेले दुष्काळाचे सावट आता झालेल्या पावसानेही रबी हंगाम लांबणीवर पडला आहे. शेतात पिकांपेक्षा तण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या सर्व समस्यांनी शेतकरी ग्रासलेला आहे. शेतकºयांच्या खिशात खडखडाट असताना नवनवीन संकटे समोर येत आहेत. वाढता खर्च भागवायचा कसा? हे नवीन संकट उभे राहिले आहे. शेताची पाहणी, नुकसानीचे पंचनामे सुरू असले शेतकºयांना मदत मिळणार की केवळ मदतीचा फार्स होणार?

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र