शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

तीन वर्षांत ९ हजार लाभार्थ्यांना मिळाले हक्काचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:34 IST

बीड : पंतप्रधान आवास (ग्रामीण) योजेनेंतर्गत जिल्ह्यात ९ हजार २० घरे पूर्ण झाली असून, काबाडकष्ट करणाऱ्या कुटुंबाना ...

बीड : पंतप्रधान आवास (ग्रामीण) योजेनेंतर्गत जिल्ह्यात ९ हजार २० घरे पूर्ण झाली असून, काबाडकष्ट करणाऱ्या कुटुंबाना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर मिळाले आहे, तर १५ हजार ६५३ घरांचे काम प्रगतिप‌थावर आहे.

पंतप्रधान आवास ग्रामीण योजनेला २०१६ मध्ये सुरुवात झाली. या योजनेत तेरा निकषांवर पात्रता ठरविण्यात येते. जिल्ह्यात १९ हजार ३१९ लाभार्थी पात्र ठरले. यापैकी १८ हजार ३० लाभार्थ्यांना घरे मंजूर झाली. एकूण १५ हजार ६५३ लोकांना निधीचे वाटप करण्यात आल्याची माहिती ग्रामीण विकास यंत्रणेकडून मिळाली. आतापर्यंत तीन वर्षांत नऊ हजार वीस घरांचे काम पूर्ण झाले असून, लाभार्थ्यांना हक्काचे घरकूल मिळाले आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत विविध टप्प्यांमध्ये निधी दिला जातो. १५ हजार, ४५ हजार, ४० हजार आणि २० हजार, याप्रमाणे १ लाख २० हजार रुपयांचा निधी लाभार्थ्यांना दिला जातो, याशिवाय एमआरइजीएसमधून १८ हजार रुपये, तर स्वच्छ भारत मिशनमधून १२ हजार रुपये दिले जातात. असे एकूण दीड लाखांचे अनुदान लाभार्थ्याला दिले जाते.

कोरोना आपत्तीमध्ये लॉकडाऊनमुळे पंतप्रधान आवास योजनेत निधी मंजुरीला काही महिने विलंब झाला होता. आता मंजुरी आली असून, निधीचे वाटपही करण्यात आलेले आहे. एकही हप्ता थांबला नसल्याचे ग्रामीण विकास यंत्रणेकडून सांगण्यात आले.

जिओ टॅगिंगनुसार घरकूल बांधकामाच्या टप्प्यांनुसार शासनाचा हा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जातो, त्यामुळे निधीबाबत तक्रारी येत नाही.

---------

२०१८-१९ मध्ये ७,९०४ घरकुले मंजूर झाली. ७,८९४ लाभार्थ्यांना निधीचे वाटप झाले. ७,१९४ घरांचे काम पूर्ण झाले आहे.

२०१९-२० मध्ये ३,५३४ घरकुले मंजूर झाली. ३,३२० लाभार्थ्यांना निधीचे वाटप झाले. १,७९६ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.

२०२०-२१ मध्ये ६,५५२ घरकुले मंजूर झाली. ४,४३९ लाभार्थ्यांना निधीचे वाटप झाले. ३० लाभार्थ्यांची घरे पूर्ण झाली आहेत.

------------------

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत एकूण घरे मंजूर १८०३३

प्रगतिपथावरील घरे १५,६५३

पूर्ण झालेली घरे ९,०२०

--------

१,२५० लाभार्थी दूरच

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १८,०३० लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत. १९ हजार ३१९ लाभार्थी पात्र ठरलेले आहेत. १,२५० लाभार्थ्यांपैकी काहींनी स्थलांतर केलेले असून, काही लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची अडचण येत आहे, तर अर्ज केलेले काही लाभार्थी मयत झाल्याने वारस नसल्यामुळे किंवा घरकुलासाठी ते इच्छुक नसल्यामुळे या लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध होण्यास अडचणी आहेत.

---------

घरकुलाचे दीड लाख रुपये मिळाले, तर वैयक्तिक ७० हजार रुपये खर्च केले. सहा महिन्यांत घर बांधकाम झाले. सरकारची योजना नसती, तर घर झाले नसते. एक वर्षापासून नव्या घरात राहतो.

- गणेश महादेव शिंदे, खासगी वाहन चालक, कोळवाडी, ता. बीड

---------------

माझे आधी कुडाचे घर होते. नवे घर बांधून दहा महिने झाले. शासनाचे पैसे मिळाले. दीड महिन्यांपूर्वी शेवटचा हप्ता २० हजारांचा मिळाला. सध्या ऊसतोडणीला कराड येथे आहे. स्कीममुळे चांगले झाले, अन्यथा घर झाले नसते.

-शहादेव गोपीनाथ जाधव, कोळवाडी, ता. बीड