शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत ‘लाल परी’चे २०३ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:05 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास सुखकर आणि आरामदायी मानला जातो. मात्र, मागील तीन वर्षांतील माहिती घेतली असता बीड जिल्ह्यात तब्बल २०३ अपघात झाले आहेत. पैकी ३४ अपघातांत प्रवाशांना जीव गमवावा लागलेला आहे.

ठळक मुद्देप्रवास ठरतोय धोक्याचा। ३४ अपघातांमध्ये प्राणहानी; एसटीचा प्रवास सुरक्षित करण्याची गरज

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास सुखकर आणि आरामदायी मानला जातो. मात्र, मागील तीन वर्षांतील माहिती घेतली असता बीड जिल्ह्यात तब्बल २०३ अपघात झाले आहेत. पैकी ३४ अपघातांत प्रवाशांना जीव गमवावा लागलेला आहे. २१६ अपघात हे गंभीर स्वरूपाचे आहेत. या आकडेवारीवरून ‘लाल परी’चा प्रवास धोक्याचा ठरत असल्याचे समोर आले आहे.‘बसचा प्रवास, सुखकर प्रवास’ समजला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळांच्या बस गाड्यांच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बसने प्रवास करताना प्रवाशांच्या मनात एक प्रकारे भीती निर्माण होत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच केज तालुक्यात जीप व बसचा अपघात झाला होता. यात तब्बल तीन प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. तर अनेक प्रवासी जखमी झाले होते. हाच धागा पकडून माहिती घेतली असता मागील तीन वर्षांत बीड जिल्ह्यात तब्बल २०३ अपघात झाल्याचे समोर आले आहे. ३९ अपघात किरकोळ असल्याची नोंद असून ३४ अपघातांत प्रवाशांचा जीव गेला आहे. गतवर्षांत तब्बल १०० अपघात झाले आहेत. अपघातांत किती जखमी झाले, किती मयत झाले आणि किती प्रवाशांना मदत केली, याची माहिती मात्र, रापमकडून वेळेअभावी मिळू शकली नाही.रस्ता सुरक्षा सप्ताह नावालाचअपघात रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ, आरटीओ कार्यालय आणि वाहतूक पोलीस यांच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात सामान्यांना माहिती देण्यासह चालकांनाही मार्गदर्शन केले जाते. मात्र, या सप्ताहात चालकांना परिपूर्ण माहिती दिली जात नाही. तसेच वर्षभरातही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी होत नसल्याने अपघात होत असल्याचे एका चालकाने सांगितले.

टॅग्स :Beedबीडstate transportएसटीAccidentअपघात