शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

तीन वर्षांत ‘लाल परी’चे २०३ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:05 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास सुखकर आणि आरामदायी मानला जातो. मात्र, मागील तीन वर्षांतील माहिती घेतली असता बीड जिल्ह्यात तब्बल २०३ अपघात झाले आहेत. पैकी ३४ अपघातांत प्रवाशांना जीव गमवावा लागलेला आहे.

ठळक मुद्देप्रवास ठरतोय धोक्याचा। ३४ अपघातांमध्ये प्राणहानी; एसटीचा प्रवास सुरक्षित करण्याची गरज

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास सुखकर आणि आरामदायी मानला जातो. मात्र, मागील तीन वर्षांतील माहिती घेतली असता बीड जिल्ह्यात तब्बल २०३ अपघात झाले आहेत. पैकी ३४ अपघातांत प्रवाशांना जीव गमवावा लागलेला आहे. २१६ अपघात हे गंभीर स्वरूपाचे आहेत. या आकडेवारीवरून ‘लाल परी’चा प्रवास धोक्याचा ठरत असल्याचे समोर आले आहे.‘बसचा प्रवास, सुखकर प्रवास’ समजला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळांच्या बस गाड्यांच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बसने प्रवास करताना प्रवाशांच्या मनात एक प्रकारे भीती निर्माण होत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच केज तालुक्यात जीप व बसचा अपघात झाला होता. यात तब्बल तीन प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. तर अनेक प्रवासी जखमी झाले होते. हाच धागा पकडून माहिती घेतली असता मागील तीन वर्षांत बीड जिल्ह्यात तब्बल २०३ अपघात झाल्याचे समोर आले आहे. ३९ अपघात किरकोळ असल्याची नोंद असून ३४ अपघातांत प्रवाशांचा जीव गेला आहे. गतवर्षांत तब्बल १०० अपघात झाले आहेत. अपघातांत किती जखमी झाले, किती मयत झाले आणि किती प्रवाशांना मदत केली, याची माहिती मात्र, रापमकडून वेळेअभावी मिळू शकली नाही.रस्ता सुरक्षा सप्ताह नावालाचअपघात रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ, आरटीओ कार्यालय आणि वाहतूक पोलीस यांच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात सामान्यांना माहिती देण्यासह चालकांनाही मार्गदर्शन केले जाते. मात्र, या सप्ताहात चालकांना परिपूर्ण माहिती दिली जात नाही. तसेच वर्षभरातही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी होत नसल्याने अपघात होत असल्याचे एका चालकाने सांगितले.

टॅग्स :Beedबीडstate transportएसटीAccidentअपघात