शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

तीन वर्षांत ‘लाल परी’चे २०३ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:05 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास सुखकर आणि आरामदायी मानला जातो. मात्र, मागील तीन वर्षांतील माहिती घेतली असता बीड जिल्ह्यात तब्बल २०३ अपघात झाले आहेत. पैकी ३४ अपघातांत प्रवाशांना जीव गमवावा लागलेला आहे.

ठळक मुद्देप्रवास ठरतोय धोक्याचा। ३४ अपघातांमध्ये प्राणहानी; एसटीचा प्रवास सुरक्षित करण्याची गरज

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास सुखकर आणि आरामदायी मानला जातो. मात्र, मागील तीन वर्षांतील माहिती घेतली असता बीड जिल्ह्यात तब्बल २०३ अपघात झाले आहेत. पैकी ३४ अपघातांत प्रवाशांना जीव गमवावा लागलेला आहे. २१६ अपघात हे गंभीर स्वरूपाचे आहेत. या आकडेवारीवरून ‘लाल परी’चा प्रवास धोक्याचा ठरत असल्याचे समोर आले आहे.‘बसचा प्रवास, सुखकर प्रवास’ समजला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळांच्या बस गाड्यांच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बसने प्रवास करताना प्रवाशांच्या मनात एक प्रकारे भीती निर्माण होत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच केज तालुक्यात जीप व बसचा अपघात झाला होता. यात तब्बल तीन प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. तर अनेक प्रवासी जखमी झाले होते. हाच धागा पकडून माहिती घेतली असता मागील तीन वर्षांत बीड जिल्ह्यात तब्बल २०३ अपघात झाल्याचे समोर आले आहे. ३९ अपघात किरकोळ असल्याची नोंद असून ३४ अपघातांत प्रवाशांचा जीव गेला आहे. गतवर्षांत तब्बल १०० अपघात झाले आहेत. अपघातांत किती जखमी झाले, किती मयत झाले आणि किती प्रवाशांना मदत केली, याची माहिती मात्र, रापमकडून वेळेअभावी मिळू शकली नाही.रस्ता सुरक्षा सप्ताह नावालाचअपघात रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ, आरटीओ कार्यालय आणि वाहतूक पोलीस यांच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात सामान्यांना माहिती देण्यासह चालकांनाही मार्गदर्शन केले जाते. मात्र, या सप्ताहात चालकांना परिपूर्ण माहिती दिली जात नाही. तसेच वर्षभरातही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी होत नसल्याने अपघात होत असल्याचे एका चालकाने सांगितले.

टॅग्स :Beedबीडstate transportएसटीAccidentअपघात