शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

तिसऱ्या टप्प्यातील बोंडअळी अनुदानाचे आले ८५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:55 IST

गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रदुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. पहिल्या दोन टप्प्यातील पैसे एप्रिल व जुलै महिन्यात आले होते.

ठळक मुद्देबीड जिल्हा बँकेचा हलगर्जीपणा : शेवटच्या टप्प्यातील पैसे तात्काळ वाटप करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रदुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. पहिल्या दोन टप्प्यातील पैसे एप्रिल व जुलै महिन्यात आले होते. त्याचे वाटप सुरु आहे, तसेच तिस-या टप्प्यातील ८५ कोटी ५३ लाख अनुदन गुरुवारी आले आहे. पहिल्या दोन टप्प्यातील अनुदानाचे पैसे वाटप करण्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अक्षम्य हलगर्जीपणा झाला असून, याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.बोंडअळी अनुदानासाठी पहिल्या टप्प्यात ६८ कोटी रुपये, तर दुसºया टप्प्यात १०२.६४ कोटी रुपये अनुदान जुलै महिन्यात बँकेत जमा झाले होते. मात्र तिसºया टप्प्यातील अनुदानाची रक्कम न आल्यामुळे हजारो शेतकरी मदतीपासून वंचीत होते. तिसºया टप्प्यातील अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी शेतकºयांनी वेळोवेळी आंदोलन केले होते. दुष्काळी परिस्थितीमध्ये अनुदानाच्या पैशामुळे शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, अनुदानाची रक्कम वेळेवर दिली जात नाही त्यामुळे गैरसोय होत असल्याची महिती शेतकºयांनी दिली.जिल्ह्यात गत वर्षात ३ लाख ७८ हजार हेक्टरवर कपूस लागवड करण्यात आली होती. जिल्ह्याचे अर्थकारण कापूस पिकावर अवलंबून आहे. मात्र, बोंडअळी व इतर रोगांच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी लागवडीचा खर्च देखील शेतकºयांना मिळाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे खरिप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून, रबी हंगामातील पिकांची लागवड झाली नाही. त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील अनुदान एप्रिल महिन्याच्या शेवटी तर दुसºया टप्प्यातील अनुदान जुलै महिन्यात वर्ग केले होते. तर तिसºया व शेवटच्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम आॅक्टोबर महिना अखेर देण्यात आली आहे. पहिल्या दोन टप्प्यातील वाटपाचा अनुभव लक्षात घेता, मिळालेले बोंडअळी अनुदानाच्या तिन्ही टप्प्यातील पैसे विलंब न करता तात्काळ वाटप करण्याची मागणी शेतकºयांमधून होऊ लागली आहे.अनुदान वाटपात जिल्हा बँकेचा चालढकलपणाबोंडअळी अनुदान वाटप करण्याची जबाबदारी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेक डे देण्यात आली आहे. परंतु, पहिल्या दोन टप्प्यातील अनुदानाची रक्कम बँकेत जमा होऊन जवळपास ५ महिने झाले, तरी देखील शेतकºयांना पैसे वाटप करण्याची प्रक्रिया अजूनही सुरुच आहे. पैसे मिळत नसल्यामुळे शेतकºयांकडून बँकेकडे विचारणा केली असता, राष्ट्रीयकृत बँकांकडून रोख रक्कम मिळत नसल्याचे कारण मध्यवर्ती बँकेकडून पुढे करण्यात येते. त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून अजूनही वंचीत आहेत, याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तवीने करण्यात आली आहे.बीड १७ कोटी ५३ लाखगेवराई १६ कोटी ६६ लाखशिरुर का. ६ कोटी ६१ लाखआष्टी ६ कोटी २५ लाखपाटोदा ४ कोटी ९६ लाखमाजलगाव ८ कोटी३९ लाखधारुर ५ कोटी ३६ लाखवडवणी ५ कोटीकेज ८ कोटी ८७ लाखअंबाजोगाई १ कोटी ७२ लाखपरळी ४ कोटी १३ लाखएकूण ८५ कोटी ५३ लाख

टॅग्स :BeedबीडState Governmentराज्य सरकारfundsनिधीcottonकापूस