शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या टप्प्यातील बोंडअळी अनुदानाचे आले ८५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:55 IST

गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रदुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. पहिल्या दोन टप्प्यातील पैसे एप्रिल व जुलै महिन्यात आले होते.

ठळक मुद्देबीड जिल्हा बँकेचा हलगर्जीपणा : शेवटच्या टप्प्यातील पैसे तात्काळ वाटप करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रदुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. पहिल्या दोन टप्प्यातील पैसे एप्रिल व जुलै महिन्यात आले होते. त्याचे वाटप सुरु आहे, तसेच तिस-या टप्प्यातील ८५ कोटी ५३ लाख अनुदन गुरुवारी आले आहे. पहिल्या दोन टप्प्यातील अनुदानाचे पैसे वाटप करण्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अक्षम्य हलगर्जीपणा झाला असून, याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.बोंडअळी अनुदानासाठी पहिल्या टप्प्यात ६८ कोटी रुपये, तर दुसºया टप्प्यात १०२.६४ कोटी रुपये अनुदान जुलै महिन्यात बँकेत जमा झाले होते. मात्र तिसºया टप्प्यातील अनुदानाची रक्कम न आल्यामुळे हजारो शेतकरी मदतीपासून वंचीत होते. तिसºया टप्प्यातील अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी शेतकºयांनी वेळोवेळी आंदोलन केले होते. दुष्काळी परिस्थितीमध्ये अनुदानाच्या पैशामुळे शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, अनुदानाची रक्कम वेळेवर दिली जात नाही त्यामुळे गैरसोय होत असल्याची महिती शेतकºयांनी दिली.जिल्ह्यात गत वर्षात ३ लाख ७८ हजार हेक्टरवर कपूस लागवड करण्यात आली होती. जिल्ह्याचे अर्थकारण कापूस पिकावर अवलंबून आहे. मात्र, बोंडअळी व इतर रोगांच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी लागवडीचा खर्च देखील शेतकºयांना मिळाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे खरिप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून, रबी हंगामातील पिकांची लागवड झाली नाही. त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील अनुदान एप्रिल महिन्याच्या शेवटी तर दुसºया टप्प्यातील अनुदान जुलै महिन्यात वर्ग केले होते. तर तिसºया व शेवटच्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम आॅक्टोबर महिना अखेर देण्यात आली आहे. पहिल्या दोन टप्प्यातील वाटपाचा अनुभव लक्षात घेता, मिळालेले बोंडअळी अनुदानाच्या तिन्ही टप्प्यातील पैसे विलंब न करता तात्काळ वाटप करण्याची मागणी शेतकºयांमधून होऊ लागली आहे.अनुदान वाटपात जिल्हा बँकेचा चालढकलपणाबोंडअळी अनुदान वाटप करण्याची जबाबदारी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेक डे देण्यात आली आहे. परंतु, पहिल्या दोन टप्प्यातील अनुदानाची रक्कम बँकेत जमा होऊन जवळपास ५ महिने झाले, तरी देखील शेतकºयांना पैसे वाटप करण्याची प्रक्रिया अजूनही सुरुच आहे. पैसे मिळत नसल्यामुळे शेतकºयांकडून बँकेकडे विचारणा केली असता, राष्ट्रीयकृत बँकांकडून रोख रक्कम मिळत नसल्याचे कारण मध्यवर्ती बँकेकडून पुढे करण्यात येते. त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून अजूनही वंचीत आहेत, याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तवीने करण्यात आली आहे.बीड १७ कोटी ५३ लाखगेवराई १६ कोटी ६६ लाखशिरुर का. ६ कोटी ६१ लाखआष्टी ६ कोटी २५ लाखपाटोदा ४ कोटी ९६ लाखमाजलगाव ८ कोटी३९ लाखधारुर ५ कोटी ३६ लाखवडवणी ५ कोटीकेज ८ कोटी ८७ लाखअंबाजोगाई १ कोटी ७२ लाखपरळी ४ कोटी १३ लाखएकूण ८५ कोटी ५३ लाख

टॅग्स :BeedबीडState Governmentराज्य सरकारfundsनिधीcottonकापूस