शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

तिसऱ्या टप्प्यातील बोंडअळी अनुदानाचे आले ८५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:55 IST

गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रदुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. पहिल्या दोन टप्प्यातील पैसे एप्रिल व जुलै महिन्यात आले होते.

ठळक मुद्देबीड जिल्हा बँकेचा हलगर्जीपणा : शेवटच्या टप्प्यातील पैसे तात्काळ वाटप करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रदुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. पहिल्या दोन टप्प्यातील पैसे एप्रिल व जुलै महिन्यात आले होते. त्याचे वाटप सुरु आहे, तसेच तिस-या टप्प्यातील ८५ कोटी ५३ लाख अनुदन गुरुवारी आले आहे. पहिल्या दोन टप्प्यातील अनुदानाचे पैसे वाटप करण्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अक्षम्य हलगर्जीपणा झाला असून, याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.बोंडअळी अनुदानासाठी पहिल्या टप्प्यात ६८ कोटी रुपये, तर दुसºया टप्प्यात १०२.६४ कोटी रुपये अनुदान जुलै महिन्यात बँकेत जमा झाले होते. मात्र तिसºया टप्प्यातील अनुदानाची रक्कम न आल्यामुळे हजारो शेतकरी मदतीपासून वंचीत होते. तिसºया टप्प्यातील अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी शेतकºयांनी वेळोवेळी आंदोलन केले होते. दुष्काळी परिस्थितीमध्ये अनुदानाच्या पैशामुळे शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, अनुदानाची रक्कम वेळेवर दिली जात नाही त्यामुळे गैरसोय होत असल्याची महिती शेतकºयांनी दिली.जिल्ह्यात गत वर्षात ३ लाख ७८ हजार हेक्टरवर कपूस लागवड करण्यात आली होती. जिल्ह्याचे अर्थकारण कापूस पिकावर अवलंबून आहे. मात्र, बोंडअळी व इतर रोगांच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी लागवडीचा खर्च देखील शेतकºयांना मिळाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे खरिप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून, रबी हंगामातील पिकांची लागवड झाली नाही. त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील अनुदान एप्रिल महिन्याच्या शेवटी तर दुसºया टप्प्यातील अनुदान जुलै महिन्यात वर्ग केले होते. तर तिसºया व शेवटच्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम आॅक्टोबर महिना अखेर देण्यात आली आहे. पहिल्या दोन टप्प्यातील वाटपाचा अनुभव लक्षात घेता, मिळालेले बोंडअळी अनुदानाच्या तिन्ही टप्प्यातील पैसे विलंब न करता तात्काळ वाटप करण्याची मागणी शेतकºयांमधून होऊ लागली आहे.अनुदान वाटपात जिल्हा बँकेचा चालढकलपणाबोंडअळी अनुदान वाटप करण्याची जबाबदारी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेक डे देण्यात आली आहे. परंतु, पहिल्या दोन टप्प्यातील अनुदानाची रक्कम बँकेत जमा होऊन जवळपास ५ महिने झाले, तरी देखील शेतकºयांना पैसे वाटप करण्याची प्रक्रिया अजूनही सुरुच आहे. पैसे मिळत नसल्यामुळे शेतकºयांकडून बँकेकडे विचारणा केली असता, राष्ट्रीयकृत बँकांकडून रोख रक्कम मिळत नसल्याचे कारण मध्यवर्ती बँकेकडून पुढे करण्यात येते. त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून अजूनही वंचीत आहेत, याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तवीने करण्यात आली आहे.बीड १७ कोटी ५३ लाखगेवराई १६ कोटी ६६ लाखशिरुर का. ६ कोटी ६१ लाखआष्टी ६ कोटी २५ लाखपाटोदा ४ कोटी ९६ लाखमाजलगाव ८ कोटी३९ लाखधारुर ५ कोटी ३६ लाखवडवणी ५ कोटीकेज ८ कोटी ८७ लाखअंबाजोगाई १ कोटी ७२ लाखपरळी ४ कोटी १३ लाखएकूण ८५ कोटी ५३ लाख

टॅग्स :BeedबीडState Governmentराज्य सरकारfundsनिधीcottonकापूस