शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

बीड जिल्ह्यातील ५ तालुके होणार पाणीदार; समृद्ध ग्राम योजनेत समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 17:00 IST

या गावांना भेटी देऊन पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ यांनी नुकतेच मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देपाच तालुक्यांमधील १२७ गावे स्पर्धेसाठी पात्र ठरणार

धारूर (जि.बीड) : पाणी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते समृद्ध ग्राम स्पर्धा राज्यात राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातून ४० तालुक्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. यात बीड जिल्ह्यातील ५ तालुक्यांचा समावेश असून स्पर्धेच्या माध्यमातून ही गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहेत. या गावांना भेटी देऊन पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ यांनी नुकतेच मार्गदर्शन केले.

पाणी फाऊंडेशनच्या वतीने राज्यात वॉटर कप स्पर्धेत काम केलेले बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, केज, धारूर आणि आष्टी या पाच तालुक्यांमधील १२७ गावे या स्पर्धेसाठी पात्र असणार आहेत. धारूर तालुक्यातील आमला, देवठाणा, अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ, धानोरा बीड तालुक्यातील मांडवखेल, देवऱ्याचीवाडी, केज तालुक्यातील बनसारोळा, आवसगाव, पळसखेडा, दीपेवडगाव व आष्टी तालुक्यातील आनंदवाडी, सराटे वडगाव या गावांमध्ये समृद्ध गाव स्पर्धेसाठी गावसभा घेण्यात आल्या. त्यादरम्यान सत्यजित भटकळ यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. आता प्रवेश फॉर्म भरून घेण्याची प्रकिया सुरु आहे.

मार्च व एप्रिल महिन्यांत ४ दिवसाचे निवासी प्रशिक्षण पाच ते सात गावकऱ्यांना देण्यात येणार आहे, त्याचा लाभ गावकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विभागीय समन्वयक संतोष शिनगारे यांनी मार्गदर्शन केले. शासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, गावातील लोक एकत्र येऊन कसा चमत्कार घडवू शकतात, हे या स्पर्धेमधून बळीराजा समृद्ध करण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

१८ महिन्यांत करावे लागणार सामूहिक  प्रयत्नया गावांमध्ये जल व्यवस्थापन, कृषी उत्पादन वाढ, आर्थिक सुबत्ता आणण्याच्या दृष्टिकोनातून रोपांची लागवड व संगोपन करणे, गवताची लागवड करणे, मातीचा सेंद्रिय पोत सुधारण्यासाठी १८ महिन्यांच्या कालखंडात या स्पर्धेच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. च्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्नांतून यशाचा मार्ग स्वीकारावा या उद्देशाने नुकताच पाणी फाऊंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ यांनी दौरा केला आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :BeedबीडWaterपाणीdroughtदुष्काळ