शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यातील ५ तालुके होणार पाणीदार; समृद्ध ग्राम योजनेत समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 17:00 IST

या गावांना भेटी देऊन पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ यांनी नुकतेच मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देपाच तालुक्यांमधील १२७ गावे स्पर्धेसाठी पात्र ठरणार

धारूर (जि.बीड) : पाणी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते समृद्ध ग्राम स्पर्धा राज्यात राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातून ४० तालुक्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. यात बीड जिल्ह्यातील ५ तालुक्यांचा समावेश असून स्पर्धेच्या माध्यमातून ही गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहेत. या गावांना भेटी देऊन पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ यांनी नुकतेच मार्गदर्शन केले.

पाणी फाऊंडेशनच्या वतीने राज्यात वॉटर कप स्पर्धेत काम केलेले बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, केज, धारूर आणि आष्टी या पाच तालुक्यांमधील १२७ गावे या स्पर्धेसाठी पात्र असणार आहेत. धारूर तालुक्यातील आमला, देवठाणा, अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ, धानोरा बीड तालुक्यातील मांडवखेल, देवऱ्याचीवाडी, केज तालुक्यातील बनसारोळा, आवसगाव, पळसखेडा, दीपेवडगाव व आष्टी तालुक्यातील आनंदवाडी, सराटे वडगाव या गावांमध्ये समृद्ध गाव स्पर्धेसाठी गावसभा घेण्यात आल्या. त्यादरम्यान सत्यजित भटकळ यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. आता प्रवेश फॉर्म भरून घेण्याची प्रकिया सुरु आहे.

मार्च व एप्रिल महिन्यांत ४ दिवसाचे निवासी प्रशिक्षण पाच ते सात गावकऱ्यांना देण्यात येणार आहे, त्याचा लाभ गावकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विभागीय समन्वयक संतोष शिनगारे यांनी मार्गदर्शन केले. शासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, गावातील लोक एकत्र येऊन कसा चमत्कार घडवू शकतात, हे या स्पर्धेमधून बळीराजा समृद्ध करण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

१८ महिन्यांत करावे लागणार सामूहिक  प्रयत्नया गावांमध्ये जल व्यवस्थापन, कृषी उत्पादन वाढ, आर्थिक सुबत्ता आणण्याच्या दृष्टिकोनातून रोपांची लागवड व संगोपन करणे, गवताची लागवड करणे, मातीचा सेंद्रिय पोत सुधारण्यासाठी १८ महिन्यांच्या कालखंडात या स्पर्धेच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. च्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्नांतून यशाचा मार्ग स्वीकारावा या उद्देशाने नुकताच पाणी फाऊंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ यांनी दौरा केला आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :BeedबीडWaterपाणीdroughtदुष्काळ