शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

गॅस सिलिंडरच्या दरवाढीनंतर सबसिडीचा लाभही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:51 IST

अंबाजोगाई : केंद्र सरकारकडून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची दरवाढ करण्यात आली आहे. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून गॅसच्या ...

अंबाजोगाई : केंद्र सरकारकडून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची दरवाढ करण्यात आली आहे. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून गॅसच्या सबसिडीचा एक रुपयाही सिलिंडर धारकांच्या खात्यावर जमा झाला नाही. यामुळे सबसिडी गेली कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अगोदरच कोरोनाच्या स्थितीमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनता आर्थिक संकटांचा सामना करीत आहे. अशी स्थिती असतांना गॅसची भाववाढ सातत्याने होत आहे. परिणामी सामान्य नागरिकांचे या भाववाढीमुळे कंबरडे मोडले आहे. शासनाच्या या महागाईच्या धोरणामुळे नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी व झाडांची कत्तल रोखण्यासाठी. तसेच ग्रामीण भागातील महिलांना धुरापासून होणारा त्रास रोखण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस योजना राबविली. या योजनेच्या माध्यमातून गरीबांना मोफत गॅस दिला जात होता. मात्र, अचानकच उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांनाही या लाभापासून वंचित ठेवले. आता त्यांनाही महागडया किंमतीचा गॅस विकत घ्यावा लागणार आहे.

गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे पुन्हा सरपणाची आवश्यकता भासते की काय? अशी स्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. अगोदरच तालुक्याच्या ठिकाणांहून गॅस आणावा लागायचा. आता तो गॅस महाग झाल्याने शोभेची वस्तू होते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.