शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उसाने कर्जबाजारी केलं, वीज पडून दोन्ही बैल दगावले; शासकीय मदतीसाठी शेतकऱ्याची भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 13:52 IST

प्रशासनाच्या बेफिकीर कारभाराचा फटका : आता घेतला बेमुदत उपोषणाचा निर्णय

- अनिल महाजनकिल्लेधारूर  (बीड) : शेतातील उभा ऊस साखर कारखान्यास जात नव्हता. त्यातच कोरोनाचे संकट आणि अवकाळी पावसात झालेल्या विजेच्या गडगडाटात वीज पडून दोन बैल जागीच मरण पावले. ही घटना घडली १९ मार्च २०२१ रोजी. त्यास आता दोन वर्षे झाले तरी शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहे. प्रशासनाकडे चकरा मारून थकल्यामुळे तहसीलदारांना निवेदन देत आता महाराष्ट्र दिनापासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.  

धारूर तालुक्यातील आरणवाडी गावातील शेतकरी वामन शिनगारे यांची शेतात बांधलेली बैलजोडी वीज पडून  19 मार्च 2021 रोजी मरण पावली होती. या घटनेची माहिती शासकीय यंत्रणेला देण्यात आली. पशुवैद्यकीय विभागाने शवविच्छेदन करीत अहवाल दिला. त्यानुसार शेतकरी मदतीसाठी पात्र ठरला. सुरुवातीला कोरोनाचे संकट सांगून लवकरच मदत मिळेल असे सांगण्यात आले. यासाठी सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून घेतली. त्यास दोन वर्ष झाले. मदत मिळण्याच्या आशेपोटी शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारून बेजार आहेत. प्रशासन  कोरोना काळातील मदत शासनाने अद्याप पर्यंत दिली नसल्यामुळे शेतकऱ्यास मदत मिळाली नसल्याचे कारण सांगते. वीज पडून माणूस किंवा जनावर दगावल्यास दोन ते तीन दिवसात संबंधितास मदत दिली जाते. मात्र दोन वर्षे उलटून ही मदत मिळत नसल्याने व तहसील कार्यालयात चकरा मारूनही बेजार झाल्याने अखेर वामन शिनगारे यांनी १ मे पासून धारूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचे निवेदन तहसीलदारांना वामन शिनगारे यांनी दिले आहे. यावेळी आरणवाडीचे सरपंच भागवत शिनगारे, माजी सरपंच लहू फुटाणे उपस्थित होते.

शेतातच उभा राहिला ऊसराज्यात २०२१ मध्ये ऊसाचे पीक जास्त झाल्यामुळे अनेकांचा ऊस साखर कारखान्याना गेलाच नाही. शेवटच्या टप्प्यात ऊस गेला त्यांना पदरमोड करावी लागली. वामन शिनगारे यांचा ही २०२१ मध्ये पाच एकर ऊस जून पर्यत शेतातच उभा होता. कर्ज काढून तो घालवावा लागला. या संकटामुळे कर्जबाजारी झालेले असतानाच नैसर्गिक संकटात शेती कसण्याचे साधन असलेली बैलजोडी मरण पावली. त्यात शासकीय मदतीपासून ही वंचित राहिले आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड