शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उसाने कर्जबाजारी केलं, वीज पडून दोन्ही बैल दगावले; शासकीय मदतीसाठी शेतकऱ्याची भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 13:52 IST

प्रशासनाच्या बेफिकीर कारभाराचा फटका : आता घेतला बेमुदत उपोषणाचा निर्णय

- अनिल महाजनकिल्लेधारूर  (बीड) : शेतातील उभा ऊस साखर कारखान्यास जात नव्हता. त्यातच कोरोनाचे संकट आणि अवकाळी पावसात झालेल्या विजेच्या गडगडाटात वीज पडून दोन बैल जागीच मरण पावले. ही घटना घडली १९ मार्च २०२१ रोजी. त्यास आता दोन वर्षे झाले तरी शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहे. प्रशासनाकडे चकरा मारून थकल्यामुळे तहसीलदारांना निवेदन देत आता महाराष्ट्र दिनापासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.  

धारूर तालुक्यातील आरणवाडी गावातील शेतकरी वामन शिनगारे यांची शेतात बांधलेली बैलजोडी वीज पडून  19 मार्च 2021 रोजी मरण पावली होती. या घटनेची माहिती शासकीय यंत्रणेला देण्यात आली. पशुवैद्यकीय विभागाने शवविच्छेदन करीत अहवाल दिला. त्यानुसार शेतकरी मदतीसाठी पात्र ठरला. सुरुवातीला कोरोनाचे संकट सांगून लवकरच मदत मिळेल असे सांगण्यात आले. यासाठी सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून घेतली. त्यास दोन वर्ष झाले. मदत मिळण्याच्या आशेपोटी शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारून बेजार आहेत. प्रशासन  कोरोना काळातील मदत शासनाने अद्याप पर्यंत दिली नसल्यामुळे शेतकऱ्यास मदत मिळाली नसल्याचे कारण सांगते. वीज पडून माणूस किंवा जनावर दगावल्यास दोन ते तीन दिवसात संबंधितास मदत दिली जाते. मात्र दोन वर्षे उलटून ही मदत मिळत नसल्याने व तहसील कार्यालयात चकरा मारूनही बेजार झाल्याने अखेर वामन शिनगारे यांनी १ मे पासून धारूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचे निवेदन तहसीलदारांना वामन शिनगारे यांनी दिले आहे. यावेळी आरणवाडीचे सरपंच भागवत शिनगारे, माजी सरपंच लहू फुटाणे उपस्थित होते.

शेतातच उभा राहिला ऊसराज्यात २०२१ मध्ये ऊसाचे पीक जास्त झाल्यामुळे अनेकांचा ऊस साखर कारखान्याना गेलाच नाही. शेवटच्या टप्प्यात ऊस गेला त्यांना पदरमोड करावी लागली. वामन शिनगारे यांचा ही २०२१ मध्ये पाच एकर ऊस जून पर्यत शेतातच उभा होता. कर्ज काढून तो घालवावा लागला. या संकटामुळे कर्जबाजारी झालेले असतानाच नैसर्गिक संकटात शेती कसण्याचे साधन असलेली बैलजोडी मरण पावली. त्यात शासकीय मदतीपासून ही वंचित राहिले आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड