शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उसाने कर्जबाजारी केलं, वीज पडून दोन्ही बैल दगावले; शासकीय मदतीसाठी शेतकऱ्याची भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 13:52 IST

प्रशासनाच्या बेफिकीर कारभाराचा फटका : आता घेतला बेमुदत उपोषणाचा निर्णय

- अनिल महाजनकिल्लेधारूर  (बीड) : शेतातील उभा ऊस साखर कारखान्यास जात नव्हता. त्यातच कोरोनाचे संकट आणि अवकाळी पावसात झालेल्या विजेच्या गडगडाटात वीज पडून दोन बैल जागीच मरण पावले. ही घटना घडली १९ मार्च २०२१ रोजी. त्यास आता दोन वर्षे झाले तरी शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहे. प्रशासनाकडे चकरा मारून थकल्यामुळे तहसीलदारांना निवेदन देत आता महाराष्ट्र दिनापासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.  

धारूर तालुक्यातील आरणवाडी गावातील शेतकरी वामन शिनगारे यांची शेतात बांधलेली बैलजोडी वीज पडून  19 मार्च 2021 रोजी मरण पावली होती. या घटनेची माहिती शासकीय यंत्रणेला देण्यात आली. पशुवैद्यकीय विभागाने शवविच्छेदन करीत अहवाल दिला. त्यानुसार शेतकरी मदतीसाठी पात्र ठरला. सुरुवातीला कोरोनाचे संकट सांगून लवकरच मदत मिळेल असे सांगण्यात आले. यासाठी सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून घेतली. त्यास दोन वर्ष झाले. मदत मिळण्याच्या आशेपोटी शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारून बेजार आहेत. प्रशासन  कोरोना काळातील मदत शासनाने अद्याप पर्यंत दिली नसल्यामुळे शेतकऱ्यास मदत मिळाली नसल्याचे कारण सांगते. वीज पडून माणूस किंवा जनावर दगावल्यास दोन ते तीन दिवसात संबंधितास मदत दिली जाते. मात्र दोन वर्षे उलटून ही मदत मिळत नसल्याने व तहसील कार्यालयात चकरा मारूनही बेजार झाल्याने अखेर वामन शिनगारे यांनी १ मे पासून धारूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचे निवेदन तहसीलदारांना वामन शिनगारे यांनी दिले आहे. यावेळी आरणवाडीचे सरपंच भागवत शिनगारे, माजी सरपंच लहू फुटाणे उपस्थित होते.

शेतातच उभा राहिला ऊसराज्यात २०२१ मध्ये ऊसाचे पीक जास्त झाल्यामुळे अनेकांचा ऊस साखर कारखान्याना गेलाच नाही. शेवटच्या टप्प्यात ऊस गेला त्यांना पदरमोड करावी लागली. वामन शिनगारे यांचा ही २०२१ मध्ये पाच एकर ऊस जून पर्यत शेतातच उभा होता. कर्ज काढून तो घालवावा लागला. या संकटामुळे कर्जबाजारी झालेले असतानाच नैसर्गिक संकटात शेती कसण्याचे साधन असलेली बैलजोडी मरण पावली. त्यात शासकीय मदतीपासून ही वंचित राहिले आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड