शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

खुंटेफळ साठवण तलावाचा प्रश्न गाजला अधिवेशनात; परब यांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले...

By शिरीष शिंदे | Updated: December 20, 2023 18:48 IST

आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रातील ४५ हेक्टर भूसंपादनात गैरप्रकार झाला

बीड: आष्टी तालुक्यातील साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रातील ४५ हेक्टर भूसंपादन प्रक्रिया संदर्भातील प्रश्न नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आ. अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत सांगितले की, सदरील प्रकरणी अनियमितता झाल्याची तक्रार झाली जलसंपदा विभागास प्राप्त झाली होती. परंतु, जलसंपदा विभागाने निवाड्यातील इतर घटकांच्या मूल्यांकनाची फेर तपासणी करून पाटोदा उपविभागीय अधिकाऱ्यांनी सुधारित निवाडा जाहीर केला असल्याचे सांगितले.

आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रातील ४५ हेक्टर भूसंपादनात गैरप्रकार झाला असून छत्रपती संभाजी नगर येथील कार्यकारी अभियंत्यांनी भूसंपादित जमीन खरेदी करण्यासाठी ३१ मार्च रोजी ३५ कोटी रुपये निधी वर्ग केला होता. हा निधी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यासाठी ८ मे रोजी पत्र दिले होते. कार्यकारी अभियंता यांनी १७ कोटी रुपये जमिनीची खरेदी न करता परस्पर वाटप केले. या प्रकाराची चौकशी केली आहे का? संबंधितावर कारवाई करण्याबाबत कोणती कारवाई केली आहे का? असा प्रश्न आ. परब यांनी उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले की, छत्रपती संभाजी नगर येथील कार्यकारी अभियंता यांनी खुंटेफळ साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रातील भूसंपादित जमीन सरळ खरेदी करण्यासाठी ३१ मार्च रोजी मागणीनुसार ३५.०६ कोटी रुपये निधी वर्ग केला आहे. त्या पैकी १७.१५ कोटी रुपये मोबदला मागणी केलेल्या प्रकल्पबाधितांना शासन निर्णयाप्रमाणे निधी वाटप केला आहे.

त्यानंतर भूसंपादन प्रक्रियेबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने तक्रारींची शहानिशा करणे आवश्यक असल्याने सदरील निधी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्याबाबत नांदूर मधमेश्वर कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कळविले होते. तसेच हा निधी पाटोदा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वर्ग करणे योग्य राहील असे छत्रपती संभाजी नगर येथील पाटबंधारे मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता यांनी बीड जिल्हाधिकारी यांना कळविले होते. पुढे, जलसंपदा विभागाने निवाड्यातील इतर घटकांच्या मूल्यांकनाची फेर तपासणी करून पाटोदा उपविभागीय अधिकाऱ्यांनी सुधारित निवाडा जाहीर केला. उर्वरित मावेजा देऊन थेट खरेदीखत करुन भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण झाली असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडAnil Parabअनिल परब