शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

लढवय्या भूमिपुत्रासाठी अश्रूंचा बांध फुटला; बीडमध्ये कडकडीत बंद, अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय

By संजय तिपाले | Updated: August 15, 2022 13:56 IST

शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून राज्यभर कीर्ती गाजविणाऱ्या नेत्यासाठी बीडकरांच्या अश्रूंचा बांध फुटला.

बीड: राजेगाव ते मुंबई असा वादळी प्रवास करणारे शिवसंग्रामचे संस्थापक व माजी आमदार विनायक मेटे यांच्या जाण्याने बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता शिवसंग्राम भवन येथून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. लढवय्या नेत्याला अंतिम निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय सहभागी आहे. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून राज्यभर कीर्ती गाजविणाऱ्या नेत्यासाठी बीडकरांच्या अश्रूंचा बांध फुटला.

मराठा आरक्षणासाठी विनायक मेटे यांनी अखेरपर्यंत लढा दिला. आरक्षण प्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीला जातानाच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता त्यांचे अपघाती निधन झाले. सामान्य शेतकरी कुटुंबातील विनायक मेटे यांनी कार्यकर्ता ते आमदार असा उत्तुंग प्रवास केला. अपवाद वगळता सलग पाचवेळा विधानपरिषदेत पोहोचलेल्या मेटे यांनी राज्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवला होता.

अमर रहे... अमर रहे.. मेटे साहेब अमर रहे या घोषणांसह अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रेला सुरुवात झाली. फुलांची आरास केलेल्या भव्य रथात विनायक मेटे यांचा पार्थिवदेह ठेवला होता. यावेळी कुटुंबातील सदस्य या रथात होते. टाळ-मृदंगाचा गजर व विनायक मेटे यांचा जयघोष करत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बशीरगंज, बलभीम चौक,माळीवेस,सुभाष रोड, शाहूनगर मार्गे अंत्ययात्रा कॅनॉल रोडवरील रामदेव बाबा मैदानाजवळ पोहोचणार आहे.अंत्यविधीला मातब्बर नेते येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा दौरा निश्चित आहे. मात्र, ऐनवेळी काही मंत्री, आमदार येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेBeedबीड