शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सासू रागावल्याने सुनेकडून भयंकर कृत्य; दोन चिमुकल्यांना विष पाजले, स्वतःही केले प्राशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 20:00 IST

दोन्ही मुलांचा मृत्यू, आईची प्रकृती स्थिर, अंबाजोगाई तालुक्यातील घटना

अंबाजोगाई : 'स्वयंपाक जास्त का केला' याचा सासूने जाब विचारल्याचा राग मनात धरून विवाहितेने पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना विषारी द्रव पाजले. त्यानंतर स्वतः विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असून विवाहितेवर उपचार सुरू आहे. पतीच्या फिर्यादीवरून पत्नीविरोधात बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे शुक्रवारी रात्री घडली.

कौशल्या भीमराव दोडतले (वय २३, रा. टेकडी गल्ली, बर्दापूर) असे विवाहितेचे नाव आहे. शुक्रवारी रात्री पती भीमराव निवडणुकीच्या सभेला गेला होता. यावेळी घरात असलेल्या सासूने स्वयंपाक जास्त का केलास असे कौशल्याला विचारले. याचा राग धरून कौशल्याने मुलगा कार्तिक (वय २) आणि मुलगी प्रांजल (वय ३) यांना खोलीत नेले. तिथे दोन्ही मुलांना विषारी द्रव पाजले. सभा संपून भीमराव घरी आल्यानंतर आईने त्याला कौशल्या रुसून खोलीत बसल्याचे सांगितले. भीमराव खोलीत गेला असता मुलांच्या नाकाला फेस आल्याचे दिसले. त्यावर मुलांच्या नाकाला व्हॅसलिन लावल्याचे कौशल्याने सांगितले.

परंतु, मुलांच्या नाकातून रक्त येत असल्याने आणि मुले काहीच हालचाल करत नसल्याने भीमरावने मुलांना खांद्यावर घेत बाहेर आणले. आरडाओरडा करून गल्लीतील लोकांना बोलावले. यावेळी कौशल्याने वरच्या खोलीत जाऊन विषारी द्रव प्राशन केले. भीमराव आणि शेजाऱ्यांनी तिघांनाही लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून कार्तिक आणि प्रांजल यांना मयत घोषित केले. तर, कौशल्यावर उपचार असून तिची प्रकृती स्थिर आहे. भीमराव दोडतले यांच्या फिर्यादीवरून पत्नी कौशल्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय ठाकूर करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड