शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

टँकर निविदा दर वाढवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:35 IST

जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाई आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने टँकर मागणीचे प्रस्ताव देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देतीव्र पाणी टंचाई : टँकर सुरू करण्याची मागणी; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाई आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने टँकर मागणीचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाकडून प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यासाठी दिरंगाई होत आहे. तसेच जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यासाठी दर कमी असताना चढ्या दराने भरलेल्या टँकरच्या निविदा रद्द केल्यानंतर, शासनाने बुधवारी नव्याने टँकर निविदा दर वाढवले आहेत. त्यामुळे पुन्हा फेरनिविदा भरल्या जाणार आहेत. मात्र पाणीटंचाई तीव्र असल्यामुळे तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ टँकर सुरु करण्याची मागणी ग्रामीण भागातील नागरिक करत आहेत. त्याप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावरुन टँकर मागणीचे प्रस्ताव दिले आहेत, तसेच तात्काळ मंजुरी मिळावी, यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना टँकर प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार दिलेले आहेत. मात्र तरी देखील शेकडो प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. टँकर सुरु नसले तरी प्रशासकीय मान्यता तरी तात्काळ देण्यात यावी अशी मागणी सरपंचांच्या वतीने करण्यात येत आहे.चढ्या दराने भरलेल्या निविदा जिल्हाधिकाºयांनी रद्द केल्यानंतर, बुधवारी आलेल्या शासन निर्णयानुसार टंचाई भागात पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारे टँकरचे प्रतिटन दर वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा फेरनिविदा भराव्या लागणार आहेत.शासनाचे पुर्वीचे दर २०१२ या वर्षातील होते मात्र यावर्षातील डिझेल व वाहतुकीचे दर वाढलेले असल्यामुळे शासनाने निविदा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी फेरनिविदा भराव्या लागणार आहेत. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन टँकर सुरु होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. मात्र टंचाई परिस्थितीमध्ये स्थानिक प्रशासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे देखील पाणी टंचाईच्या तीव्रतेपासून व नागरिकांना होणाºया त्रासापासून जिल्हा प्रशासन व शासन अनभिज्ञ आहे, अशी प्रतिक्रिया खडकी घाट येथील सरपंच महारुद्र वाघ व पालसिंगण येथील सरपंच विक्रम खंडागळे यांनी दिली. तसेच तात्काळ निर्णय घेऊन पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करावेत, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई