शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

धुमेगावच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 01:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : गेवराई तालुक्यातील धुमेगाव येथील एका तरुणाने १० दिवसापुर्वी विष प्राशन केले होते. त्याचा सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेवराई तालुक्यातील धुमेगाव येथील एका तरुणाने १० दिवसापुर्वी विष प्राशन केले होते. त्याचा सोमवारी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. मात्र, त्याने विष प्राशन केले नसून त्याला विष पाजल्याचा संशय मुलाच्या घरच्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईंकांनी घेतला होता. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती आहे.जिजाबा गंगाराम कुलाळ (वय २५ वर्ष रा. धुमेगाव ता. गेवराई ) या तरुणाने २५ डिसेंबर २०१९ रोजी शेतात विषारी द्रव प्राशन केले होते. त्यानंतर त्याला गावातील काही मंडळींनी व चकलंबा पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. कारण, मुलाचे आणि गावातील एका मुलीचे प्रेमप्रकरण होते. या कारणावरून तिच्या घरच्या मंडळींनी त्याला विष पाजल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली.दरम्यान याप्रकरणी पोलीस उपाधीक्षक विजय कबाडे यांची नातेवाईकांनी भेट घेतली. त्यानंतर चकलंबा पोलीस ठाण्याचे प्रमुख सुपोनि देशमुख यांनी देखील पोलीस अधीक्षक कार्यालात धाव घेतली. दरम्यान पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी याप्रकरणी फिर्याद घेण्याचे आदेश देशमुख यांना दिले. त्याप्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली असून, या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, तरुणाने स्वत: विष प्राशन केल्याची चकलांबा पोलिसांची माहिती आहे. तसेच गावातील बघ्याचे म्हणणे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस सखोल तपास करतील त्यानंतर सर्व प्रकार निष्पन्न होणार आहे, असे वरिष्ठांनी सांगितले.‘ठाणे प्रमुखांनी योग्य वागणूक दिली नाही’चकलंबा येथील सपोनि देशमुख यांनी आपल्याला योग्य वागणूक दिली नाही. यापुर्वी काही महिन्यापुर्वी उसतोडणीला जाण्यापुर्वी अशाच प्रकारे भांडणे झाली होती. त्यावेळी चकलंबा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो होतो. परंतु, ठाणेप्रमुख देशमुख यांनी आपल्याला योग्य वागणूक न दिल्याचा आरोप यावेळी मयताचे वडील गंगाराम यांनी केला.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी