शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

ग्रामस्थांच्या आंदोलनास यश; आरणवाडी तलावाचा फोडलेला सांडवा बांधण्यास सुरूवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 17:12 IST

राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्त्याचे काम अर्धवट असल्याने रस्त्याला पाण्यापासून धोका होऊ नये म्हणूण पाणी विसर्ग करण्याचे पञ देताच पाटबंधारे विभागाने सांडवा फोडला होता

धारूर : ग्रामस्थांच्या आंदोलनास यश आले असून आरणवाडी साठवण तलावाचा फोडलेला सांडवा बांधण्यास सुरुवात झाली आहे. जनरेट्यामुळे पाटबंधारे विभागाने दहाच दिवसात सांडवा पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले आहे. सांडव्याची उंची पूर्ववत करण्यात येत असल्याने ग्रामस्थांच्या आंदोलनास मोठे यश आले आहे. यामुळे ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत. शनिवारी या कामाची प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. 

आरणवाडी साठवण तलावाचे काम तब्बल सतरा वर्षानंतर पूर्ण झाले. तलाव पूर्ण भरल्याने आरणवाडी, चोंराबा, पहाडी पारगाव, थेटेगव्हान, ढगेवाडी येथील ग्रामस्थ समाधानी होते. माञ, रस्तेविकास महामंडळ व पाटबंधारे विभाग यांच्यातील बेबनावामुळे अनर्थ झाला आणि तलावाचा सांडवा फोडण्यात आला. राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्त्याचे काम अर्धवट असल्याने रस्त्याला पाण्यापासून धोका होऊ नये म्हणूण पाणी विसर्ग करण्याचे पञ देताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. साठवण तलाव जुना असल्याने तलावाच्या दगडी भिंतीतून पाणी झिरपण्याची भिती व्यक्त करत खालील गावांच्या सुरक्षितेच्या नावाखाली सांडवा फोडण्याचा निर्णय घेण्यात आला. याला तलावा खालील पाचही गावातील नागरिकांनी कडाडून विरोध केला. विरोधाला न जुमानता सांडावा फोडत लाखो लिटर पाणी सोडून देण्यात आले. यानंतर ग्रामस्थांनी पेटून उठून सांडावा पूर्ववत करावा, राज्य रस्तेविकास महामंडळ आणि पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करत आंदोलन उभारले. 

रमेशराव आडसकर यांनी 15 ऑगस्ट पूर्वी सांडवा पूर्ववत न केल्यास शेतकऱ्यांसह साठवण तलावात जलसमाधी घेण्याचा इशारा रस्तारोकोत आंदोलनात दिला होता. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने महसुलने दोन्ही विभागाचे अधिकारी आणि आंदोलक यांच्यात बैठक झाली. यात पाटंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलावाचा धोका कमी झाला असून १४ ऑगस्टपूर्वी सांडवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर शनिवारी सांडव्याची उंची पूर्ववत करण्याचे काम सुरु झाले.आक्टोबरपर्यंत सांडवा पूर्ववत करता येणार नाही म्हणणाऱ्या पाटबंधारे विभागास बाराच दिवसात तलाव सुरक्षित वाटला आणि उंची वाढविण्याचे काम सुरु झाले. 

पाच गावात हरीत क्रांती होणार या तलावामुळे अनेक वर्षाचे स्वप्न डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे पूर्ण झाले आहे. सांडवा फोडल्याने स्वप्न उधळली होती. जनरेट्यामुळे अधिकारशाही झुकली व सांडवा पूर्ववत होत असल्याने डोंगरात हरीतक्रांती होण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. हे आंदोलन कोणाविरूध्द नव्हते नियम व कायद्याने हक्कासाठी होते. हा मोठा विजय आहे अशा भावना सुनिल शिनगारे, बालासाहेब चव्हाण, विजय शिनगारे, सादेक इनामदार यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :BeedबीडWaterपाणी