शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दुस-या टप्प्यात ३१५ कोटींचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:49 IST

दुस-या टप्प्यात ३१५ कोटी ७ लक्ष ४५ हजार रुपये इतके अनुदान जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यावेळी अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जवळपास ६२५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यात १४४ कोटी १८ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले असून, बँकेकडे वर्ग करण्यात आले आहे. तर दुस-या टप्प्यात ३१५ कोटी ७ लक्ष ४५ हजार रुपये इतके अनुदान जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळणार आहे. परंतु, पहिल्या टप्प्यातील अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जवळपास ७ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये महत्त्वाचे सोयाबीन, कापूस, बाजरी, कडधान्य ही पिके हातची गेली होती. मागील दोन वर्षात सलग दुष्काळी परिस्थिती आणि खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे बळीराजा हतबल झाला होता. त्यामुळे शासनाकडून तात्काळ अतिवृष्टीबाधित शेतक-यांना अनुदान द्यावे अशी मागणी केली जात होता. दरम्यान या परिस्थितीचा आढावा केंद्राच्या पथकाने तसेच कृषी, विभागीय आयुक्तांनी व संबंधित अधिका-यांनी घेतला होता. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करुन तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अतिवृष्टीबाधित शेतक-यांच्या अनुदानासाठी ६२५ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली होती.या मागणीनुसार पहिल्या टप्प्यात १४४ कोटी १८ लक्ष रुपयांचे अनुदान जिल्ह्यात प्राप्त झाले आहे. त्याचे वाटप बँकेच्या माध्यमातून सरु आहे. परंतु, पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त होऊन एक महिना होत आहे. अजूनही अनेक पात्र शेतक-यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. तालुकास्तरावरून शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याचे अहवाल जिल्हा प्रशासनाकडे आले आहे. मात्र, बँकेकडून ही अनुदानाची रक्कम अजूनही शेतक-यांना दिलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बँक दिलेल्या वेळेत शेतक-यांपर्यंत अनुदानाची रक्कम पोहोचवत नसेल तर बँकेवर कारवाई करावी अशी मागणी शेतक-यांमधून होत आहे.अनुदान वाटपाचे काम हे प्रामुख्याने जिल्हा बँके कडे आहे. यापुर्वीचे देखील अनेक अनुदानाच्या व विम्याच्या रकमा याच बँकेतून शेतक-याच्या खात्यावर गेल्या आहेत.मात्र, अनुदानाची रक्कम बँकेत येऊन देखील ती वाटप केली जात नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले होते.त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी अनुदानाची रक्कम जर वेळेत शेतक-यांना मिळाली नाही व ती वाटपाअभावी बँकेत पडून राहिली तर अपहार केल्याचा ठपका ठेऊन कारवाई करण्याचा इशारा दिला होता.बँकेकडे पहिल्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम वर्ग होऊन १ महिना होत आहे. त्यामुळे वंचित असलेल्या शेतक-यांनी प्रशासनाकडे तक्रारी कराव्यात असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे यांनी केले आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाfundsनिधीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रBanking Sectorबँकिंग क्षेत्र