शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दुस-या टप्प्यात ३१५ कोटींचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:49 IST

दुस-या टप्प्यात ३१५ कोटी ७ लक्ष ४५ हजार रुपये इतके अनुदान जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यावेळी अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जवळपास ६२५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यात १४४ कोटी १८ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले असून, बँकेकडे वर्ग करण्यात आले आहे. तर दुस-या टप्प्यात ३१५ कोटी ७ लक्ष ४५ हजार रुपये इतके अनुदान जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळणार आहे. परंतु, पहिल्या टप्प्यातील अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जवळपास ७ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये महत्त्वाचे सोयाबीन, कापूस, बाजरी, कडधान्य ही पिके हातची गेली होती. मागील दोन वर्षात सलग दुष्काळी परिस्थिती आणि खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे बळीराजा हतबल झाला होता. त्यामुळे शासनाकडून तात्काळ अतिवृष्टीबाधित शेतक-यांना अनुदान द्यावे अशी मागणी केली जात होता. दरम्यान या परिस्थितीचा आढावा केंद्राच्या पथकाने तसेच कृषी, विभागीय आयुक्तांनी व संबंधित अधिका-यांनी घेतला होता. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करुन तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अतिवृष्टीबाधित शेतक-यांच्या अनुदानासाठी ६२५ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली होती.या मागणीनुसार पहिल्या टप्प्यात १४४ कोटी १८ लक्ष रुपयांचे अनुदान जिल्ह्यात प्राप्त झाले आहे. त्याचे वाटप बँकेच्या माध्यमातून सरु आहे. परंतु, पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त होऊन एक महिना होत आहे. अजूनही अनेक पात्र शेतक-यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. तालुकास्तरावरून शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याचे अहवाल जिल्हा प्रशासनाकडे आले आहे. मात्र, बँकेकडून ही अनुदानाची रक्कम अजूनही शेतक-यांना दिलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बँक दिलेल्या वेळेत शेतक-यांपर्यंत अनुदानाची रक्कम पोहोचवत नसेल तर बँकेवर कारवाई करावी अशी मागणी शेतक-यांमधून होत आहे.अनुदान वाटपाचे काम हे प्रामुख्याने जिल्हा बँके कडे आहे. यापुर्वीचे देखील अनेक अनुदानाच्या व विम्याच्या रकमा याच बँकेतून शेतक-याच्या खात्यावर गेल्या आहेत.मात्र, अनुदानाची रक्कम बँकेत येऊन देखील ती वाटप केली जात नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले होते.त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी अनुदानाची रक्कम जर वेळेत शेतक-यांना मिळाली नाही व ती वाटपाअभावी बँकेत पडून राहिली तर अपहार केल्याचा ठपका ठेऊन कारवाई करण्याचा इशारा दिला होता.बँकेकडे पहिल्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम वर्ग होऊन १ महिना होत आहे. त्यामुळे वंचित असलेल्या शेतक-यांनी प्रशासनाकडे तक्रारी कराव्यात असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे यांनी केले आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाfundsनिधीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रBanking Sectorबँकिंग क्षेत्र