शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीडमध्ये धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:29 IST

बीड : जिल्ह्यामध्ये गत वर्षामध्ये झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी देखील बोंडअळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसून येत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर धडक मोहीम सुरू केली आहे. तसेच शेतकऱ्यांनी कापसाच्या शेतात कामगंध सापळे लावण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.जून ...

ठळक मुद्देकामगंध सापळे लावण्यावर द्यावा भर

बीड : जिल्ह्यामध्ये गत वर्षामध्ये झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी देखील बोंडअळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसून येत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर धडक मोहीम सुरू केली आहे. तसेच शेतकऱ्यांनी कापसाच्या शेतात कामगंध सापळे लावण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जून महिन्यात अल्प पावसावर कापूस लागवड झाली होती. पीक उगवल्यानंतर काही दिवसात पानांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार असल्याचे लक्षात आले. बोंडअळी तयार होण्यासाठी आवश्यक पतंग कामगंध सापळ््यात अडकतात. त्यामुळे बोंडअळी प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. बोंडअळीमुळे गत वर्षातील उत्पादनातील घट पाहता कृषी विभागाने जिल्हाभरात जनजागृती व उपाययोजना मोहीम राबवली आहे.हे आहेत उपायकापसावरील गुलाबी बोंडअळी प्रादूर्भाव रोखण्यासठी एकरी आठ कामगंध सापळे लावावेत. त्यानंतर सलग तीन दिवस आठ ते दहा पतंग प्रति सापळा सापडले आढळले तर नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस १५ मिली किंवा थायोडीकार्ब ७५, डब्ल्यू पी १२ प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिल्याचे आत्माचे बी. एम. गायकवाड म्हणाले.जिनिंग मालकांवर होऊ शकते कारवाईबोंडअळी रोखण्यासाठी राबवण्यात येणाºया मोहिमध्ये जिनिंग मालकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आदेश बैठक घेऊन सर्वांना जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. तसेच जिनिंग परिसरात कामगंध सापळे लावत बोंडअळी नियंत्रण देखील करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी न होणाºया जिनिंग मालकांवर कारवाई होण्याचे संकेत दिले आहेत.

सरपंचांना कृषी आयुक्तांचे आवाहनबोंडअळी निर्मुलन मोहिमेत गावातील सरपंचांनी देखील सहभाग नोंदवावा असे आवाहन कृषी आयुक्तांनी पत्राद्वारे केले आहे. तसेच शेतमध्ये कामगंध सापळे बसवण्यासाठी गावातील शेतकºयांना प्रवृत्त करावे जेणेकरून बोंडअळीचा प्रादूर्भाव रोखण्यात यश येईल व होणारे नुकसान टळता येईल.पावसाने ओढ दिल्यामुळे पिके सुकण्याची भिती आहे. या काळात किडीचा हल्ला देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोटॅशियम नायट्रेट ५० गॅ्रम १० लिटर पाण्यात फवारणी करण्याचा सल्ला तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिला आहे.

टॅग्स :BeedबीडcottonकापूसFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा