शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

फेरमुल्यांकनासाठी तेलगावात शेतकरी-रेल्वे संघर्ष कृती समितीचे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 16:58 IST

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या बीड, वडवणी, धारुर, परळी तालुक्यातील जमिनींचे पुर्नमुल्यांकन करावे, सन 2003 च्या सुधारित कायद्यानुसार मावेजा द्यावा तसेच बाजार भावाच्या सहा पट रक्कम द्यावी या मागण्यांसाठी आज दुपारी तेलगाव चौफळा येथे शेतकरी रेल्वे संघर्ष कृती समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

माजलगाव (बीड) : अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या बीड, वडवणी, धारुर, परळी तालुक्यातील जमिनींचे पुर्नमुल्यांकन करावे, सन 2003 च्या सुधारित कायद्यानुसार मावेजा द्यावा तसेच बाजार भावाच्या सहा पट रक्कम द्यावी या मागण्यांसाठी आज दुपारी तेलगाव चौफळा येथे शेतकरी रेल्वे संघर्ष कृती समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी संपादित केलेल्या काही जमिनी ह्या कुंडलिका व अप्पर कुंडलिका धरणाच्या सिंचन खालील येत आहेत. शासनाने शेतकऱ्यांना निजामकालीन मावेजा दिला आहे. वास्तविक पाहता या भागातील जमिनीचा बाजार भाव लाखोच्या घरात आहे यामुळे या जमिनींचे फेर मुल्यांकन करावे अशी मागणी शेतकरी व रेल्वे संघर्ष समिती यांनी केली. तसेच मावेजा सन 2003 च्या सुधारित कायद्यानुसार मावेजा देण्यात यावा व बाजार भावाच्या सहा पट रक्कम देण्यात यावी व कुटुंबातील एका व्यक्तीस रेल्वे विभागात नौकरीस घ्यावे अशा मागण्याही आंदोलकांनी यावेळी केल्या. आंदोलनाने जवळपास दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.  

अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही सततचा दुष्काळ आणि त्यात तुटपुंजा मावेजा यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. वडवणी येथील शेतकरी मनोहर लक्ष्मण पतंगे या शेतकऱ्याचा रेल्वेचा योग्य मावेजा मिळत नसल्या संबंधीच्या धास्तीने ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले तरी सुध्दा संबंधित अधिकाऱ्याने याची कुठलीही दखल घेतली नाही असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. 

काम होऊ देणार नाही मागील महिन्यात दिनांक 19 मार्च रोजी शेतकऱ्यांनी रेल्वेचे काम बंद आंदोलन केले होते. तरीही संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी त्याची कुठलीच दखल घेत नसल्यामुळे रेल्वे संघर्ष समितीच्या व शेतकऱ्यांच्या वतीने जो पर्यंत योग्य मावेजा मिळत नाही व सदरील कुटुंबातील एका व्यक्तीस रेल्वे विभागात नौकरी देण्यात येत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांनी रेल्वेचे कुठलेच काम चालु देणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.  

यावेळी शेतकरी रेल्वे संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष विनायक शेळके, सचिव विठ्ठल मस्के, शामसुंदर इंदाणी, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, जि.प.सदस्य जयसिंह सोळंके, शिवसेनेचे आप्पासाहेब जाधव, विनायक मुळे, बाळासाहेब मेंडके, सुनिलराव खंडागळे, भाजपाचे नितीन नाईकनवरे,डाॅ.उध्दव नाईकनवरे,डाॅ.रणजीत मस्के,विठ्ठल लगड,प्रशांत सावंत,बप्पासाहेब डावकर यांच्यासह सर्व पक्षीय नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते व हजारो शेतकऱ्यांनी या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला होता. मौजे मोची पिंपळगांव, घोडकाराजुरी, शिवणी, जरुड, बाभुळखुंटा, मौज, ब्रम्हगाव, ढेकणमोहा, बकरवाडी, घाटसावळी, पोखरी, मैंदा, परभणीतांडा, वडवणी, बाहेगव्हाण, मोरवड, हिवरगव्हाण, पुसरा, बाबी, उपळी, लोणवळ,तेलगाव, कोथिंबीरवाडी, भोपा, चाटगाव या गावातील शेतकरी सहभागी होते 

टॅग्स :agitationआंदोलनState Governmentराज्य सरकारBeedबीडMONEYपैसा