शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

फेरमुल्यांकनासाठी तेलगावात शेतकरी-रेल्वे संघर्ष कृती समितीचे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 16:58 IST

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या बीड, वडवणी, धारुर, परळी तालुक्यातील जमिनींचे पुर्नमुल्यांकन करावे, सन 2003 च्या सुधारित कायद्यानुसार मावेजा द्यावा तसेच बाजार भावाच्या सहा पट रक्कम द्यावी या मागण्यांसाठी आज दुपारी तेलगाव चौफळा येथे शेतकरी रेल्वे संघर्ष कृती समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

माजलगाव (बीड) : अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या बीड, वडवणी, धारुर, परळी तालुक्यातील जमिनींचे पुर्नमुल्यांकन करावे, सन 2003 च्या सुधारित कायद्यानुसार मावेजा द्यावा तसेच बाजार भावाच्या सहा पट रक्कम द्यावी या मागण्यांसाठी आज दुपारी तेलगाव चौफळा येथे शेतकरी रेल्वे संघर्ष कृती समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी संपादित केलेल्या काही जमिनी ह्या कुंडलिका व अप्पर कुंडलिका धरणाच्या सिंचन खालील येत आहेत. शासनाने शेतकऱ्यांना निजामकालीन मावेजा दिला आहे. वास्तविक पाहता या भागातील जमिनीचा बाजार भाव लाखोच्या घरात आहे यामुळे या जमिनींचे फेर मुल्यांकन करावे अशी मागणी शेतकरी व रेल्वे संघर्ष समिती यांनी केली. तसेच मावेजा सन 2003 च्या सुधारित कायद्यानुसार मावेजा देण्यात यावा व बाजार भावाच्या सहा पट रक्कम देण्यात यावी व कुटुंबातील एका व्यक्तीस रेल्वे विभागात नौकरीस घ्यावे अशा मागण्याही आंदोलकांनी यावेळी केल्या. आंदोलनाने जवळपास दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.  

अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही सततचा दुष्काळ आणि त्यात तुटपुंजा मावेजा यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. वडवणी येथील शेतकरी मनोहर लक्ष्मण पतंगे या शेतकऱ्याचा रेल्वेचा योग्य मावेजा मिळत नसल्या संबंधीच्या धास्तीने ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले तरी सुध्दा संबंधित अधिकाऱ्याने याची कुठलीही दखल घेतली नाही असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. 

काम होऊ देणार नाही मागील महिन्यात दिनांक 19 मार्च रोजी शेतकऱ्यांनी रेल्वेचे काम बंद आंदोलन केले होते. तरीही संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी त्याची कुठलीच दखल घेत नसल्यामुळे रेल्वे संघर्ष समितीच्या व शेतकऱ्यांच्या वतीने जो पर्यंत योग्य मावेजा मिळत नाही व सदरील कुटुंबातील एका व्यक्तीस रेल्वे विभागात नौकरी देण्यात येत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांनी रेल्वेचे कुठलेच काम चालु देणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.  

यावेळी शेतकरी रेल्वे संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष विनायक शेळके, सचिव विठ्ठल मस्के, शामसुंदर इंदाणी, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, जि.प.सदस्य जयसिंह सोळंके, शिवसेनेचे आप्पासाहेब जाधव, विनायक मुळे, बाळासाहेब मेंडके, सुनिलराव खंडागळे, भाजपाचे नितीन नाईकनवरे,डाॅ.उध्दव नाईकनवरे,डाॅ.रणजीत मस्के,विठ्ठल लगड,प्रशांत सावंत,बप्पासाहेब डावकर यांच्यासह सर्व पक्षीय नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते व हजारो शेतकऱ्यांनी या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला होता. मौजे मोची पिंपळगांव, घोडकाराजुरी, शिवणी, जरुड, बाभुळखुंटा, मौज, ब्रम्हगाव, ढेकणमोहा, बकरवाडी, घाटसावळी, पोखरी, मैंदा, परभणीतांडा, वडवणी, बाहेगव्हाण, मोरवड, हिवरगव्हाण, पुसरा, बाबी, उपळी, लोणवळ,तेलगाव, कोथिंबीरवाडी, भोपा, चाटगाव या गावातील शेतकरी सहभागी होते 

टॅग्स :agitationआंदोलनState Governmentराज्य सरकारBeedबीडMONEYपैसा