शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बीड जिल्ह्यात व्यसनापायी तरुणाईचे गुन्हेगारीकडे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:12 IST

परिस्थिती आणि दारू, गांजा यासरख्या व्यसनांमुळे तरूणाई गुन्हेगारीकडे पाऊले टाकत आहे. मागील तीन गुन्ह्यांतून हे उघड झाले आहे. व्यसनापायी दागिने लंपास करणे, चोरी करणे लुटमार करणे यासारखे गंभीर गुन्हे तरूण करू लागले आहेत.

ठळक मुद्देतीन गुन्ह्यांतून उघड : दागिने लंपास, चोरी, लुटमारीचे केले गुन्हे; गुन्हेगारीऐवजी चांगले कार्य करीत नाव कमविण्याचे आवाहन

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परिस्थिती आणि दारू, गांजा यासरख्या व्यसनांमुळे तरूणाई गुन्हेगारीकडे पाऊले टाकत आहे. मागील तीन गुन्ह्यांतून हे उघड झाले आहे. व्यसनापायी दागिने लंपास करणे, चोरी करणे लुटमार करणे यासारखे गंभीर गुन्हे तरूण करू लागले आहेत. या चारही गुन्ह्यांतील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, तरूणाचे गुन्हेगारीकडे पडणारे हे पाऊल थांबविण्यासाठी उपाययोजना करून त्यांचे मनपरिवर्तन करण्याची गरज आहे.पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शखाली शाळा, महाविद्यालयात जावून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाते. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून कायदा व सुव्यवस्थेबद्दल माहिती दिली जाते. मात्र तरीही काही तरूण गुन्हेगारी वळत असल्याचे दिसत आहे.हे गुन्हेगार रेकॉर्डवर नसल्याने त्यांचा तपास लावण्याचे आव्हानही पोलिसांसमोर रहात आहे. आतापर्यंत तरी हे आव्हान पोलिसांनी यशस्वी पेलली आहेत, मात्र नवखे गुन्हेगार वाढल्यास गुन्हेगारीचा टक्काही वाढल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चत...!घटना क्रमांक - १साधारण पंधरा दिवसांपूर्वी दिलीप बाजीराव सुरासे (रा.खोकडपुरा, औरंगाबाद) हे कार चालक पान खाण्यासाठी नगर नाक्यावरील टपरीवर आले. मात्र सर्व पानटपऱ्या झाल्याने सुरासे हे तिथेच कारमध्ये मोबाईलवर बोलत बसले होते. याचवेळी विकी राजू कांबळे (२५ रा.राजुरीवेस, बीड) व सुयोग मच्छिंद्र प्रधान (१८ रा.साईपॅलेसच्या पाठिमागे, बीड) या दोन चोरट्यांनी त्यांना लुटले. त्यांनी रोख १० हजार रुपए आणि दोन मोबाईल असा ३० हजार रूपंयाचा ऐवज लंपास केला होता. पोलीस तपासातून त्यांनी ही चोरी केवळ गांजा पिण्यासाठी पैसे नसल्याने केल्याचे निष्पन्न झाले होते.घटना क्रमांक - २केवळ दारू आणि गांजा पिण्यासाठी पैसे नसल्याने शेख जुबेर शेख अब्दुल (२० रा.मसरतनगर) व अमीर खान अकबर खान (रा.इस्लामपुरा) हे दोन तरूण लुटमारीचा गुन्हा करू लागले. २० सप्टेंबर रोजी श्रीराम नगर भागात अश्विनी रमेश लाखे या घरासमोर झाडू मारत होत्या. याचवेळी हे दोघे तिथे दुचाकीवरून आले. आजुबाजुला कोणी नसल्याची संधी साधून त्यांनी लाखे यांच्या गळ्यातील गंठन हिसकावून घेत पोबारा केला. भल्या पहाटे ही घटना घडल्याने दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजवरून दोघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत.घटना क्रमांक - ३तिसरी घटना परळीत घडली. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर किशोर नामदेव केदार (२३, रा. पिंपरखेड ता.घनसावंगी जि.जालना) याला दारूचे व्यसन जडले. जुगारही खेळायाचा. हे खेळण्यासाठी व दारू पिण्यासाठी पैसे कमी पडल्याने किशोरने दीड महिन्यांपासून दुचाकीचोरी करणे सुरू केले. चार दुचाकी चोरल्याही. मात्र पाचवी दुचाकी चोरण्यापूर्वीच बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या. केवळ दारू आणि जुगार खेळण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने तो गुन्हेगारीकडे वळल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासावरुन समोर आले आहे.पालकांनी लक्ष देण्याची गरजपालकांनी आपला पाल्य कोठे जातो, काय करतो, कोणासोबत असतो, त्याला व्यसन आहे का, ते पूर्ण करण्यासाठी तो पैसा कोठून आणतो, घरून पैसे दिले जात नसतील तो ऐश कोणत्या पैशांवर करतो, यासारखी विविध माहिती पालकांनी ठेवणे गरजेचे आहे.सर्वच पाल्य वाईट नाहीत, मात्र मागील काही घटनांवरून पालकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसते. सर्वांनी सजग राहणे ही काळाची गरज असून यामुळे गुन्हेगारी नक्कीच कमी होईल.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी