शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांना मदतीऐवजी राज्य सरकारकडून घोषणांची 'अतिवृष्टी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 15:51 IST

Rain in Beed : जिल्ह्यातील ६३ मंडळापैकी ५० मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून १३ मंडळामध्ये पावसाचे कमी प्रमाण आहे.

आष्टी ( बीड ) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे ( Heavy rain in Beed ) अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील पंचानामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी. आघाडी सरकारच्या काळात शेतक-यांना काहीच लाभ मिळाला नाही. सरकारकडे आमदाराचे फंड देण्यासाठी पैसा आहे. पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही. हे सरकार केवळ घोषणांची अतिवृष्टी करत असल्याची टिका आ. सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी पत्रकार परिषदेत केली.

पुढे बोलताना आ. धस म्हणाले की, जिल्ह्यातील ६३ मंडळापैकी ५० मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून १३ मंडळामध्ये पावसाचे कमी प्रमाण आहे. ५० मंडळामध्ये जेवढी पेर झाली ते सर्व पिक आता पाण्याने सडले आहे. आष्टी तालुक्यातील ६ मंडळ अतिवृष्टी झाली असून पाटोदा, शिरुर कासार भयानक परिस्थिती आहे. ५० मंडळामधील क्षेत्र सरसकट नुकसान भरपाई देण्यास पात्र आहेत. या भागातील शेतक-यांच्या हातात नाही सापडणार नाही. कापूस, तुर, कांदा, पिकांचे सडून अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, नुकसानीचे पंचनामे करणारे अधिकारी नदीच्या कडेने फिरतात. नुकसान भरपाई कोकणच्या धर्तीवर द्यावी. ई - पिक पाहणी नको, पंचनामे कशासाठी जिल्हाधिकारी यांनी सरसकट नुकसान झाल्याचा अहवाल द्यावा. 

पिक विम्यावरील शेतक-यांचा विश्वास उडाला आहे. मागिल वर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी विमा भरलेलाच नाही. पिक विम्याचे नाटक आणू नये. सरसकट राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी. आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचा मोबाईल वाजायचा बंद झाला. शेतक-यांना पिक विमा,अनुदान, मिळालेच नाही. मोदी सरकारच्या किसान सन्मान या योजनेचा २ हजार रुपये हप्ता आला तरच मोबाईलची टोन वाजत आहे. या राज्य सरकारच्या काळात सर्व काही बंद झाले. १ रुपयाचा लाभ नाही, सत्ता टिकवण्यासाठी आमदाराचे फंड देण्यासाठी निधी आहे. पण नुकसान भरपाई देण्यासाठी पैसा नाही. सरकार घोषणांची 'अतिवृष्टी' पाडत असल्याची टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसagricultureशेतीFarmerशेतकरीBeedबीड