शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

नुकसानग्रस्तांना मदतीऐवजी राज्य सरकारकडून घोषणांची 'अतिवृष्टी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 15:51 IST

Rain in Beed : जिल्ह्यातील ६३ मंडळापैकी ५० मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून १३ मंडळामध्ये पावसाचे कमी प्रमाण आहे.

आष्टी ( बीड ) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे ( Heavy rain in Beed ) अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील पंचानामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी. आघाडी सरकारच्या काळात शेतक-यांना काहीच लाभ मिळाला नाही. सरकारकडे आमदाराचे फंड देण्यासाठी पैसा आहे. पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही. हे सरकार केवळ घोषणांची अतिवृष्टी करत असल्याची टिका आ. सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी पत्रकार परिषदेत केली.

पुढे बोलताना आ. धस म्हणाले की, जिल्ह्यातील ६३ मंडळापैकी ५० मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून १३ मंडळामध्ये पावसाचे कमी प्रमाण आहे. ५० मंडळामध्ये जेवढी पेर झाली ते सर्व पिक आता पाण्याने सडले आहे. आष्टी तालुक्यातील ६ मंडळ अतिवृष्टी झाली असून पाटोदा, शिरुर कासार भयानक परिस्थिती आहे. ५० मंडळामधील क्षेत्र सरसकट नुकसान भरपाई देण्यास पात्र आहेत. या भागातील शेतक-यांच्या हातात नाही सापडणार नाही. कापूस, तुर, कांदा, पिकांचे सडून अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, नुकसानीचे पंचनामे करणारे अधिकारी नदीच्या कडेने फिरतात. नुकसान भरपाई कोकणच्या धर्तीवर द्यावी. ई - पिक पाहणी नको, पंचनामे कशासाठी जिल्हाधिकारी यांनी सरसकट नुकसान झाल्याचा अहवाल द्यावा. 

पिक विम्यावरील शेतक-यांचा विश्वास उडाला आहे. मागिल वर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी विमा भरलेलाच नाही. पिक विम्याचे नाटक आणू नये. सरसकट राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी. आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचा मोबाईल वाजायचा बंद झाला. शेतक-यांना पिक विमा,अनुदान, मिळालेच नाही. मोदी सरकारच्या किसान सन्मान या योजनेचा २ हजार रुपये हप्ता आला तरच मोबाईलची टोन वाजत आहे. या राज्य सरकारच्या काळात सर्व काही बंद झाले. १ रुपयाचा लाभ नाही, सत्ता टिकवण्यासाठी आमदाराचे फंड देण्यासाठी निधी आहे. पण नुकसान भरपाई देण्यासाठी पैसा नाही. सरकार घोषणांची 'अतिवृष्टी' पाडत असल्याची टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसagricultureशेतीFarmerशेतकरीBeedबीड