शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नुकसानग्रस्तांना मदतीऐवजी राज्य सरकारकडून घोषणांची 'अतिवृष्टी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 15:51 IST

Rain in Beed : जिल्ह्यातील ६३ मंडळापैकी ५० मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून १३ मंडळामध्ये पावसाचे कमी प्रमाण आहे.

आष्टी ( बीड ) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे ( Heavy rain in Beed ) अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील पंचानामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी. आघाडी सरकारच्या काळात शेतक-यांना काहीच लाभ मिळाला नाही. सरकारकडे आमदाराचे फंड देण्यासाठी पैसा आहे. पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही. हे सरकार केवळ घोषणांची अतिवृष्टी करत असल्याची टिका आ. सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी पत्रकार परिषदेत केली.

पुढे बोलताना आ. धस म्हणाले की, जिल्ह्यातील ६३ मंडळापैकी ५० मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून १३ मंडळामध्ये पावसाचे कमी प्रमाण आहे. ५० मंडळामध्ये जेवढी पेर झाली ते सर्व पिक आता पाण्याने सडले आहे. आष्टी तालुक्यातील ६ मंडळ अतिवृष्टी झाली असून पाटोदा, शिरुर कासार भयानक परिस्थिती आहे. ५० मंडळामधील क्षेत्र सरसकट नुकसान भरपाई देण्यास पात्र आहेत. या भागातील शेतक-यांच्या हातात नाही सापडणार नाही. कापूस, तुर, कांदा, पिकांचे सडून अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, नुकसानीचे पंचनामे करणारे अधिकारी नदीच्या कडेने फिरतात. नुकसान भरपाई कोकणच्या धर्तीवर द्यावी. ई - पिक पाहणी नको, पंचनामे कशासाठी जिल्हाधिकारी यांनी सरसकट नुकसान झाल्याचा अहवाल द्यावा. 

पिक विम्यावरील शेतक-यांचा विश्वास उडाला आहे. मागिल वर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी विमा भरलेलाच नाही. पिक विम्याचे नाटक आणू नये. सरसकट राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी. आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचा मोबाईल वाजायचा बंद झाला. शेतक-यांना पिक विमा,अनुदान, मिळालेच नाही. मोदी सरकारच्या किसान सन्मान या योजनेचा २ हजार रुपये हप्ता आला तरच मोबाईलची टोन वाजत आहे. या राज्य सरकारच्या काळात सर्व काही बंद झाले. १ रुपयाचा लाभ नाही, सत्ता टिकवण्यासाठी आमदाराचे फंड देण्यासाठी निधी आहे. पण नुकसान भरपाई देण्यासाठी पैसा नाही. सरकार घोषणांची 'अतिवृष्टी' पाडत असल्याची टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसagricultureशेतीFarmerशेतकरीBeedबीड