शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

सोयाबीण बियाणे उगवलेच नाही; बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 19:58 IST

पेरणी खर्चासह कंपनीकडून वसुली करण्याची मागणी

बीड : यावर्षी खरीप हंगामात वेळेवर पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त करत खरीप पेरणीची सुरू केली होती. मात्र, जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. 

जिल्ह्याचे खरीप हंगामाचे क्षेत्र ७ लाख ४६ हजार हेक्टर आहे. त्यापैकी कापूस पिकानंतर सर्वाधिक सोयाबीन या पिकाचा पेरा केला जातो. त्यासाठी बाजारात विविध कंपनीचे बियाणे उपलब्ध आहेत. १० जून नंतर मशागतीची कामे उरकल्यावर मोठ्याप्रमाणात सोयबीन पेरणी करण्यात आली. मात्र, अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून येत आहे.

एक एकरला १० हजार रुपये खर्च मागील काही वर्षात दुबार पेरणीचे संकट पाऊस वेळेवर न पडल्यामुळे किंवा पावसाने ओढ दिल्यामुळे आले होते. मात्र, यावर्षी बियाणे न उगवल्यामुळे हे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक असताना आलेले हे संकट मोठे आहे.  सोयबीन पेरणी करताना मशागत व लागवडीला एकरी खर्च अंदाजे १० हजार रुपये इतका येतो. प्रत्येक शेतकऱ्याने किमान २ ते १० एकरवर सोयाबीन पेरले आहे. परंतु, सोयाबीन न उगवल्यामुळे केलेला खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे तात्काळ पंचमाने करावेत व झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

जिल्हाधिकाऱ्याची प्रतिक्रिया नाहीजिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी यासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यासाठी संपर्क केला मात्र, त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

शेतकऱ्यांनी करावी अशी तक्रार बियाणे उगवण क्षमता, गुणवत्ता यासंदर्भात झालेल्या नुकसानासाठी प्रत्येक तालुक्यात तालुका तक्रार निवरन समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती कृषी उपविभीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कर्यरत आहे. त्याचे प्रमुख पंचायत समितीचे कृषी अधिकारी असतात त्यांच्याकडे रितसर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रार करावी. तक्रारीसोबत बियाणे खरेदीची पक्की पावतीची झेरॉक्स जोडावी. त्यामुळे नुकसानभरपाई मिळेल. गावातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांनी सरपंच, तालुका तक्रार निवारण समिती, पं.स.कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यापैकी कुणाकडेही तक्रार करावी, असे सांगण्यात आले.

कृषी सहाय्यकांकडील तक्रार ग्राह्य बियाणांच्या संदर्भात कृषी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. लेखी स्वरूपात तक्रार प्राप्त झाल्या तर, समिती स्थळ पाहणी करून पंचनामा करतील.  शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे तक्रार दिली तरी ग्राह्य धरली जाईल.- राजेंद्र निकम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

पुन्हा पेरणी करावी लागणारएका सोयाबीन बियाणाच्या बॅगची किंमत २५०० रुपये आहे. मी चार एकरमध्ये ग्रीन गोल्ड कंपनीचा पेरा केला होता. त्यासाठी मशागत व पेरणीसाठी ४० हजार रुपये खर्च आला. ५ ते ७ दिवसांत उगवलेले सोयाबीन दिसलं नाही. त्यामुळे पुन्हा पेरणी करावी लागणार आहे. - सतिश जगताप, पालसिंगण

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती