शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

सोयाबीण बियाणे उगवलेच नाही; बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 19:58 IST

पेरणी खर्चासह कंपनीकडून वसुली करण्याची मागणी

बीड : यावर्षी खरीप हंगामात वेळेवर पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त करत खरीप पेरणीची सुरू केली होती. मात्र, जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. 

जिल्ह्याचे खरीप हंगामाचे क्षेत्र ७ लाख ४६ हजार हेक्टर आहे. त्यापैकी कापूस पिकानंतर सर्वाधिक सोयाबीन या पिकाचा पेरा केला जातो. त्यासाठी बाजारात विविध कंपनीचे बियाणे उपलब्ध आहेत. १० जून नंतर मशागतीची कामे उरकल्यावर मोठ्याप्रमाणात सोयबीन पेरणी करण्यात आली. मात्र, अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून येत आहे.

एक एकरला १० हजार रुपये खर्च मागील काही वर्षात दुबार पेरणीचे संकट पाऊस वेळेवर न पडल्यामुळे किंवा पावसाने ओढ दिल्यामुळे आले होते. मात्र, यावर्षी बियाणे न उगवल्यामुळे हे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक असताना आलेले हे संकट मोठे आहे.  सोयबीन पेरणी करताना मशागत व लागवडीला एकरी खर्च अंदाजे १० हजार रुपये इतका येतो. प्रत्येक शेतकऱ्याने किमान २ ते १० एकरवर सोयाबीन पेरले आहे. परंतु, सोयाबीन न उगवल्यामुळे केलेला खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे तात्काळ पंचमाने करावेत व झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

जिल्हाधिकाऱ्याची प्रतिक्रिया नाहीजिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी यासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यासाठी संपर्क केला मात्र, त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

शेतकऱ्यांनी करावी अशी तक्रार बियाणे उगवण क्षमता, गुणवत्ता यासंदर्भात झालेल्या नुकसानासाठी प्रत्येक तालुक्यात तालुका तक्रार निवरन समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती कृषी उपविभीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कर्यरत आहे. त्याचे प्रमुख पंचायत समितीचे कृषी अधिकारी असतात त्यांच्याकडे रितसर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रार करावी. तक्रारीसोबत बियाणे खरेदीची पक्की पावतीची झेरॉक्स जोडावी. त्यामुळे नुकसानभरपाई मिळेल. गावातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांनी सरपंच, तालुका तक्रार निवारण समिती, पं.स.कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यापैकी कुणाकडेही तक्रार करावी, असे सांगण्यात आले.

कृषी सहाय्यकांकडील तक्रार ग्राह्य बियाणांच्या संदर्भात कृषी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. लेखी स्वरूपात तक्रार प्राप्त झाल्या तर, समिती स्थळ पाहणी करून पंचनामा करतील.  शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे तक्रार दिली तरी ग्राह्य धरली जाईल.- राजेंद्र निकम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

पुन्हा पेरणी करावी लागणारएका सोयाबीन बियाणाच्या बॅगची किंमत २५०० रुपये आहे. मी चार एकरमध्ये ग्रीन गोल्ड कंपनीचा पेरा केला होता. त्यासाठी मशागत व पेरणीसाठी ४० हजार रुपये खर्च आला. ५ ते ७ दिवसांत उगवलेले सोयाबीन दिसलं नाही. त्यामुळे पुन्हा पेरणी करावी लागणार आहे. - सतिश जगताप, पालसिंगण

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती