शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

बीड जिल्ह्यात पेरणीची लगबग; कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:47 IST

जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता. मात्र, गेल्या आठवड्यात सरासरी झालेल्या पावसामुळे शेतकºयांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे. जिल्ह्यात साधारण १० हजार हेक्टरवर पेरणी व कापूस लागवड झाली आहे.

बीड : जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता. मात्र, गेल्या आठवड्यात सरासरी झालेल्या पावसामुळे शेतकºयांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे. जिल्ह्यात साधारण १० हजार हेक्टरवर पेरणी व कापूस लागवड झाली आहे.

जून महिन्याच्या सुरूवातीला पहिला पाऊस झाल्यानंतर शेतीच्या कामांना वेग आला होता. पेरणी व लागवडयुक्त शेतीची मशागत झाल्यानंतर मात्र पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मागच्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावला. पेरणीयोग्य ओल असल्याने शेतकºयांनी वापसे होताच पेरण्या सुरू केल्या.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १२५.२० मिमी इतका पाऊस झालेला आहे. त्यामुळे पेण्यांना वेग आला आहे. शिरूर आणि वडवणी तालुक्यातील ५ मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकºयांनी जमिनीतील ओल तपासावी. तसेच कृषी विभागाचा सल्ला घेऊन पेरणी व कापूस लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहेत.

खरीप हंगामात कापूस, सोयबीन, तूर, बाजरी, कडधान्य या पिकांचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो. आतापर्यंत जिल्ह्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी व लागवड करण्यात आली आहे. शेतकरी पेरणीच्या लगबगीत असून बियाणे व खतांच्या दुकानांवर गर्दी झाली आहे. अद्यापही शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रMarathwadaमराठवाडा