शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

बीड जिल्ह्यात पेरणीची लगबग; कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:47 IST

जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता. मात्र, गेल्या आठवड्यात सरासरी झालेल्या पावसामुळे शेतकºयांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे. जिल्ह्यात साधारण १० हजार हेक्टरवर पेरणी व कापूस लागवड झाली आहे.

बीड : जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता. मात्र, गेल्या आठवड्यात सरासरी झालेल्या पावसामुळे शेतकºयांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे. जिल्ह्यात साधारण १० हजार हेक्टरवर पेरणी व कापूस लागवड झाली आहे.

जून महिन्याच्या सुरूवातीला पहिला पाऊस झाल्यानंतर शेतीच्या कामांना वेग आला होता. पेरणी व लागवडयुक्त शेतीची मशागत झाल्यानंतर मात्र पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मागच्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावला. पेरणीयोग्य ओल असल्याने शेतकºयांनी वापसे होताच पेरण्या सुरू केल्या.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १२५.२० मिमी इतका पाऊस झालेला आहे. त्यामुळे पेण्यांना वेग आला आहे. शिरूर आणि वडवणी तालुक्यातील ५ मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकºयांनी जमिनीतील ओल तपासावी. तसेच कृषी विभागाचा सल्ला घेऊन पेरणी व कापूस लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहेत.

खरीप हंगामात कापूस, सोयबीन, तूर, बाजरी, कडधान्य या पिकांचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो. आतापर्यंत जिल्ह्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी व लागवड करण्यात आली आहे. शेतकरी पेरणीच्या लगबगीत असून बियाणे व खतांच्या दुकानांवर गर्दी झाली आहे. अद्यापही शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रMarathwadaमराठवाडा