शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

गेवराई खरेदी-विक्री संघामार्फत ज्वारी, हरभरा खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST

गेवराई : गेवराई तालुका खरेदी-विक्री संघामार्फत ज्वारी आणि हरभरा खरेदी सुरू करण्यात आली असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला माल शासकीय ...

गेवराई : गेवराई तालुका खरेदी-विक्री संघामार्फत ज्वारी आणि हरभरा खरेदी सुरू करण्यात आली असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला माल शासकीय खरेदी केंद्रावरच विक्रीसाठी आणावा, जेणेकरून मालाला चांगली किंमत मिळेल, असे प्रतिपादन माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. गेवराई येथील शासकीय गोडाऊन येथे ज्वारी आणि हरभरा खरेदीचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

तालुका खरेदी-विक्री संघामार्फत शासकीय गोडाऊन येथे ज्वारी व हरभरा खरेदीचा शुभारंभ २२ जून रोजी जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष तथा जि. प. सदस्य फुलचंद बोरकर, नायब तहसीलदार श्यामसुंदर रामदासी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी विजयसिंह पंडित म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी शासन कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय आतापर्यंत झाले आहेत. शेतमालाला जास्तीत जास्त भाव देण्यासाठी शासनाने पूर्ण तयारी केली असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रावरच विक्रीसाठी माल आणावा. ज्वारीची खरेदी शासकीय गोडाऊन येथे तर हरभरा खरेदी-विक्री संघ गेवराई येथे खरेदी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

या वेळी श्रीराम आरगडे, रमेश खोपडे, राजेंद्र जगताप, गोपाळ तौर, शेख अनिस, दयानंद पाडुळे, दत्ता दाभाडे, अक्षय पवार, संदीप मडके, वैजिनाथ टकले, जगदीश मराठे, श्याम रुकर, वसीम फारोकी, शेख शाहरुख, सरवर पठाण, गोरख चव्हाण, खरेदी-विक्री संघाचे सचिव गरड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

===Photopath===

220621\img-20210622-wa0311_14.jpg