शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

पित्याचा शब्द पुत्राने निभावला; स्वतःची १६ गुंठे जमीन दान करत वीरशैव स्मशानभूमीचा प्रश्न सोडवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 17:36 IST

वीरशैवतेली समाजाच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने या समाजाची मोठी कुचंबना,व विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या.

अंबाजोगाई-:गेल्या अनेक वर्षांपासून वीरशैवतेली  स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने विविध अडचणी चा सामना वीरशैवतेली समाजाला करावा लागत असे. या स्मशानभूमी लगत असलेली १६ गुंठे शेतजमीन सारंग पुजारी व कुटुंबियांनी दानपत्र देत हा वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न मार्गी लावला.वीरशैवतेली समाजानेही पुजारी कुटुंबियांचा सत्कार करत  ऋण व्यक्त केले

येथील  वीरशैवतेली समाजाच्या वतीने चौभारा परिसरातील विठ्ठलरुक्मिणी मंदिरात पुजारी कुटुंबीयांच्या ऋणनिर्देश समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आ.नमिता मुंदडा, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा,श्रीमती ललीता पुजारी,श्रीमती राजश्री पुजारी,माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी,कृष्णा पुजारी,माजी नगरसेवक दिनेश परदेशी, नगरसेविका संगीता व्यवहारे,बालासाहेब पाथरकर, शेख ताहेर,डॉ.निशिकांत पाचेगांवकर, कल्याण काळे,संतोष लोमटे,शंकरराव व्यवहारे,सुनील व्यवहारे,गिरीश हजारी यांची उपस्थिती होती.

वीरशैवतेली समाजाच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने या समाजाची मोठी कुचंबना,व विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या.या स्मशानभूमीलगत पुजारी कुटुंबियांची शेतजमीन आहे.शहरातील जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असतानाही पुजारी कुटुंबीयांनी सामाजिक दायित्व जोपासत आपल्या मालकीची १६ गुंठे शेतजमीन स्मशानभूमीसाठी दान दिली.आता रस्ता उपलब्ध झाल्याने अनेक प्रश्न व समस्या मार्गी लागल्या आहेत. याचे ऋण व्यक्त करण्यासाठी पुजारी कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ललिता पुजारी व राजश्री पुजारी यांनी दानपत्राचे हस्तांतरण समाजाकडे केले. या वेळी बोलताना सारंग पुजारी म्हणाले की, कोणत्याही समाजाची उपेक्षा होऊ नये.केवळ राजकारण नको तर राजकारणास समाजकारणाची जोड देण्याची शिकवण वडील स्व.नगराध्यक्ष अरुण पुजारी यांच्या कडुन मिळाली.त्यांच्या विचारावरच मार्गक्रमण करून आगामी काळातही  सामाजिक कार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी दिनेश परदेशी,कृष्णा पुजारी,उमाकांत राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन बाळासाहेब राऊत यांनी केले.तर उपस्थितांचे आभार नंदकुमार देशमाने यांनी मानले.या कार्यक्रमास वीरशैवतेली समाजातील महिला व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

पित्याने दिलेला शब्द पुत्राने पूर्ण केलास्व.नगराध्यक्ष अरुण पुजारी यांनी वीरशैवतेली समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा देण्यास संमती दिली होती.मात्र तांत्रिक अडचणी व दस्तऐवज यामुळे ही प्रक्रिया रखडली होती.त्यातच अरुण पुजारी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सारंग पुजारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन पित्याने दिलेला हा शब्द पुत्राने पूर्ण केला.

टॅग्स :SocialसामाजिकBeedबीड