शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अंबाजोगाईसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 17:53 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत अंबाजोगाई शहराच्या स्वच्छतेसाठी ४.९८ कोटींच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली.

ठळक मुद्देदेशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण आणि चांगली आरोग्य मिळावे यासाठी केंद्रातर्फे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. अंबाजोगाईसाठी ४ कोटी ९८ लाख ५४ हजार किमतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे

अंबाजोगाई : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत अंबाजोगाई शहराच्या स्वच्छतेसाठी ४.९८ कोटींच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली. राजकिशोर मोदी यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता. यामुळे कचरामुक्त शहर होण्याच्या दृष्टीने अंबाजोगाईची वाटचाल सुरु झाली आहे.

देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण आणि चांगली आरोग्य मिळावे यासाठी केंद्रातर्फे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. केंद्राच्याच धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत शहरे हागणदारीमुक्त करणे आणि घनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छ करणे यास प्राधान्य आहे. यामध्ये समाविष्ट करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास अंबाजोगाई येथे मान्यता मिळावी यासाठी नगर पालिकेने प्रस्ताव पाठविला होता. यासाठी नगराध्यक्षा रचना मोदी यांच्या वतीने राजकिशोर मोदी यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर या पाठपुराव्यास यश येऊन अंबाजोगाईसाठी ४ कोटी ९८ लाख ५४ हजार किमतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे.९ एप्रिल रोजी शासनाने तसे परिपत्रक काढले आहे. 

अंबाजोगाई नगर परिषदेने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान स्पर्धेत आजवर राज्यस्तरीय आणि विभागीय पातळीवर प्रथम, द्वितीय क्रमांकाची पारितोषिके सातत्याने पटकाविली आहेत. यामुळे देखील अंबाजोगाईच्या प्रकल्प मागणीचा विचार प्राधान्याने करण्यात आला. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत अंबाजोगाईसाठीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता देऊन ‘निरी’ या संस्थेने या प्रकल्पांचे मूल्यांकन केल्यानंतर शासनाने सदर प्रस्तावास मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचा निम्मा खर्च केंद्र सरकार तर निम्मा खर्च राज्य सरकार करणार आहे. प्रकल्पास मान्यता दिल्याबद्दल मोदी यांनी राज्य शासनाचे आणि साथ देणारे सर्व नगर परिषद सदस्य, मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांचे स्वागत केले.

४.९८ कोटींचा निधीकचरा मुक्त शहर होण्याच्या दृष्टीने अंबाजोगाई शहाची वाटचाल सुरू आहे. त्या दृष्टीने राजकिशोर मोदी यांनी पाठपुरावा करुन अंबाजोगाईसाठी ४ कोटी ९८ लाख ५४ हजार किंमतीच्या या प्रकल्पास मंजुरी मिळाली.९ एप्रिल रोजी शासनातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAmbajogaiअंबाजोगाईfundsनिधीState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजना