शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

...तर पीक पंचनाम्यासाठी सुशिक्षित तरुणांची मदत घेऊ; संपामुळे कृषीमंत्री सत्तारांचे संकेत

By शिरीष शिंदे | Updated: March 18, 2023 12:54 IST

संप मिटला नाही तर पर्यायी व्यवस्था करावी लागेल, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

बीड: राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे. कृषी सहायक, ग्रामसेवक व तलाठी संपामध्ये असल्याने पीक पंचनाम्यासाठी थोडी अडचण आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपलब्धता नसेल तर पंचनामे करण्यासाठी बीएसस्सी ॲग्री व इतर शिकलेल्या तरुणांकडून काही काम करुन घेता येईल का ? अशी विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आमच्या लोकांनी, शासकीय कर्मचाऱ्यांनी संप परत घेतला नाही तर पर्यायी व्यवस्था करावी लागेल अशी स्पष्ट भूमिका राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मांडली.

बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर शनिवारी सकाळी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्यावतीने मिलेट दौडच्या उद्घाटन प्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. पुढे मंत्री सत्तार म्हणाले की, राज्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसान झाले असल्याने काही ठिकाणी पीक पंचनाम्यांची अंमलबजावणी सुरु आहे तर काही ठिकाणी कर्मचारी नसल्याने अडचण आहे. पंचनाम्यासाठी यंत्रणा नसेल किंवा तुमच्याकडे कर्मचारी येत नसतील तर अशा संकटाच्या काळामध्ये बीएसस्सी ॲग्री व इतर शिकलेल्या तरुणांकडून काही काम करुन घेता येईल का ? अशी विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आमच्या लोकांनी संप परत घेतला नाही तर आम्हाला पर्यायी व्यवस्था करावी लागेल. नुकसानीची दक्षता घेण्याचा आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, त्यावर विचार सुरु असून निर्णय घेणार आहे. मात्र आस्मानी संकटाच्या वेळी आपल्या शेतकरी बांधवांना वेठीस धरु नये असे आवाहन कृषी मंत्र्यांनी केले.

पीक पंचनामे झाले नाही तर त्याची शेतकरी मी जाहीर केलेल्या चार क्रमांकावर कॉल करु शकतील. त्या संदर्भाने एक प्रेस नोट तयार केली आहे. तसेच एक सहाजणांची टीम स्थापन केली असून त्यातील सदस्य शेतकऱ्यांना पीक पंचनाम्यासाठी मदत करतील असेही कृषी मंत्री सत्तार म्हणाले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारRainपाऊसagricultureशेतीBeedबीड