शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

...तर पीक पंचनाम्यासाठी सुशिक्षित तरुणांची मदत घेऊ; संपामुळे कृषीमंत्री सत्तारांचे संकेत

By शिरीष शिंदे | Updated: March 18, 2023 12:54 IST

संप मिटला नाही तर पर्यायी व्यवस्था करावी लागेल, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

बीड: राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे. कृषी सहायक, ग्रामसेवक व तलाठी संपामध्ये असल्याने पीक पंचनाम्यासाठी थोडी अडचण आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपलब्धता नसेल तर पंचनामे करण्यासाठी बीएसस्सी ॲग्री व इतर शिकलेल्या तरुणांकडून काही काम करुन घेता येईल का ? अशी विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आमच्या लोकांनी, शासकीय कर्मचाऱ्यांनी संप परत घेतला नाही तर पर्यायी व्यवस्था करावी लागेल अशी स्पष्ट भूमिका राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मांडली.

बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर शनिवारी सकाळी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्यावतीने मिलेट दौडच्या उद्घाटन प्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. पुढे मंत्री सत्तार म्हणाले की, राज्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसान झाले असल्याने काही ठिकाणी पीक पंचनाम्यांची अंमलबजावणी सुरु आहे तर काही ठिकाणी कर्मचारी नसल्याने अडचण आहे. पंचनाम्यासाठी यंत्रणा नसेल किंवा तुमच्याकडे कर्मचारी येत नसतील तर अशा संकटाच्या काळामध्ये बीएसस्सी ॲग्री व इतर शिकलेल्या तरुणांकडून काही काम करुन घेता येईल का ? अशी विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आमच्या लोकांनी संप परत घेतला नाही तर आम्हाला पर्यायी व्यवस्था करावी लागेल. नुकसानीची दक्षता घेण्याचा आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, त्यावर विचार सुरु असून निर्णय घेणार आहे. मात्र आस्मानी संकटाच्या वेळी आपल्या शेतकरी बांधवांना वेठीस धरु नये असे आवाहन कृषी मंत्र्यांनी केले.

पीक पंचनामे झाले नाही तर त्याची शेतकरी मी जाहीर केलेल्या चार क्रमांकावर कॉल करु शकतील. त्या संदर्भाने एक प्रेस नोट तयार केली आहे. तसेच एक सहाजणांची टीम स्थापन केली असून त्यातील सदस्य शेतकऱ्यांना पीक पंचनाम्यासाठी मदत करतील असेही कृषी मंत्री सत्तार म्हणाले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारRainपाऊसagricultureशेतीBeedबीड