शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

बीड जिल्ह्यात ‘बीडीओ’विना चालतात सहा पंचायत समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:36 IST

बीड जिल्ह्यातील ११ पैकी ३ पंचायत समितींचा कारभार गटविकास अधिकाऱ्यांविना सुरू आहे. तसेच इतर तीन पंचायत समिती गटविकास अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. अधिकारी नसल्यामुळे पंचायत समितींमध्ये कामकाज सुरळीत होत नाही. परिणामी ग्रामीण भागातील विकासांच्या कामांना खीळ बसत असल्याचे सरपंचांचे म्हणणे आहे.

बीड : जिल्ह्यातील ११ पैकी ३ पंचायत समितींचा कारभार गटविकास अधिकाऱ्यांविना सुरू आहे. तसेच इतर तीन पंचायत समिती गटविकास अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. अधिकारी नसल्यामुळे पंचायत समितींमध्ये कामकाज सुरळीत होत नाही. परिणामी ग्रामीण भागातील विकासांच्या कामांना खीळ बसत असल्याचे सरपंचांचे म्हणणे आहे.

बीड जिल्ह्यात ११ पंचायत समिती आहेत. त्यापैकी परळी, आष्टी, शिरुर, माजलगाव व वडवणी या पाच पं. स. मध्येच गटविकास अधिकारी कार्यरत आहेत. अंबाजोगाई, वडवणी, व धारुर येथील गटविकास अधिकारी यांची इतर जिल्ह्यात बदली झाली आहे. तसेच बीड, केज व पाटोदा या पंचायत समितींचा कारभार गत अनेक महिन्यांपासून गटविकास अधिका-यांविना सुरू आहे. याठिकाणी गटविकास अधिकारी पदावर इतर विभागातील अधिका-यांना प्रभारी पद दिले आहे.

प्रभारी पदभार असणा-या अधिका-यांना त्याच्या विभागातील कामाचा ताण असल्यामुळे त्यांना पंचायत समितीमध्ये पूर्णवेळ लक्ष देता येत नाही. त्यामुळे ग्रामीण विकासाला मोठ्या प्रमाणात खीळ बसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण विकासाची व्यवस्था ही पंचायत समितीवर अवलंबून आहे. त्यामुळे कायमस्वरुपी गटविकास अधिकारी देण्याची मागणी अनेक वेळा ग्रामस्थांकडून करण्यात आली होती.

नांदेड येथे कार्यरत असलेल्या अधिका-यांची बदली होऊन त्यांना बीड पंचायत समितीमध्ये पदभार घेण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते अद्याप रुजू झालेले नाहीत. असाच प्रकार केज आणि पाटोदा पंचायत समितीमध्ये घडला. सध्या दुस-या विभागातील अधिकाºयांना येथील प्रभारी पदभार सोपवण्यात आलेला आहे.येथे येण्यास अधिकारी आहेत अनुत्सुकजिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमधील कार्यपद्धती, तसेच राजकीय नेत्यांचा वाढता हस्तक्षेप, पदावर कार्यरत असलेल्या अधिकाºयांवर येत असलेला दबाव या कारणांमुळे इतर जिल्ह्यातील अधिकारी बीड जिल्ह्यात नेमणूक अथवा बदली दिलेली असतानाही रुजू होण्यास धजावत नाहीत किंवा अनुत्सुक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रुजू न होताच करुन घेतली बदलीबीड, केज, पाटोदा या पंचायत समितीमध्ये इतर जिल्ह्यातील गटविकास अधिकाºयांना पदभार घेण्यास सांगितले होते. मात्र, ते नेमलेल्या ठिकाणी रुजू झालेच नाहीत. दरम्यानच्या काळात त्यांनी इतर ठिकाणी स्वत:ची बदली करुन घेतल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

बदली झाली, कार्यमुक्त मात्र नाहीजिल्ह्यातील अंबाजोगाई, वडवणी, गेवराई या पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी तसेच नरेगा गटविकासअधिकारी सुधीर भागवत यांची बदली झाली आहे. मात्र, त्यांच्या जागेवर इतर ठिकाणचे अधिकारी अद्याप रुजू न झाल्यामुळे त्यांना जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी अद्यापही कार्यमुक्त केलेले नाही.

 

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडा