शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शिरूर कासार तालुक्यात सिंदफणेला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 23:43 IST

बीड : जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी विविध ठिंकाणी चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे२४ दिवसांत केवळ ४९० मि.मी. पाऊस : सोमवारी सकाळपर्यंत १४ मंडळांमध्ये ३० मि.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद

बीड : जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी विविध ठिंकाणी चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. शिरुरकासार तालुक्यात दोन वर्षानंतर सिंदफणा नदीला पूर आलेला पहावयास मिळाला. १ ते २४ जूनपर्यंत एकूण ४९० मिमी पाऊस नोंदला गेला आहे. उशिरा आगमनामुळे पावसाचा पल्ला गतवर्षीच्या तुलनेत जरी कमी असलातरी लवकरच पेरण्यांना सुरुवात होऊ शकेल अशी चिन्हे आहेत. तर काही भागात पेरण्यांना सुरुवात झाली आहे.चौदा मंडळात दमदार पाऊसजिल्ह्यातील केज तालुक्यात तीन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस केज, हरिश्चंद्र पिपरी आणि होळ मंडळात झाला. तर इतर ११ मंडळात ३० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. बीड आणि चौसाळा मंडळात ४० मिमी, पेंडगाव, मांजरसुंबा मंडळात ३७ मिमी पाऊस झाला. पाटोदा मंडळात ३० तर दासखेड मंडळात ४० मिमी पावसाची नोंद झाली. आष्टी मंडळात ३९ तर धामणगावात ४७ मिमी पाऊस झाला. गेवराई मंडळात ४२, शिरुर मंडळात ३९, दिंद्रुड मंडळात ५० मिमी पाऊस नोंदला गेला.बीड जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६६.३६ मिमी आहे. यावर्षी आतापर्यंत ४४.६ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीतील प्रमाण १२५. २ मिमी इतके होते. झालेला पाऊस कमी असला तरी शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.धूळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासागंगामसला : तब्बल सतरा दिवसांच्या खंडानंतर मृग नक्षत्राच्या उत्तरार्धात झालेल्या दमदार पावसामुळे माजलगाव तालुक्यात काही गावांमध्ये पेरणीला वेग आला आहे.काही महसूल मंडळांमध्ये मोठा तर काही महसूल मंडळांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अनेक शेतकºयांनी धूळपेरणी केली होती. त्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.बागायती व जिरायती क्षेत्र असलेल्या शेतकºयांनी कपाशी लागवडीला पसंती दिल्याचे पहावयास मिळत आहे.आष्टी तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊसकडा : अनेक महिन्यांपासून नदी-नाले, बंधारे यांना पाण्याची प्रतीक्षा होती; पण पाऊस काही केल्या पडत नसल्याने जनता हवालदिल झाली होती. या पार्श्वभूमीवर जूनच्या शेवटच्या आठवड्यात शनिवार, रविवार व सोमवार या तीन दिवसांत झालेल्या पहिल्याच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाटण सांगवीसह परिसरातील बंधारे तुडूंब भरले. आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.आष्टी तालुक्यात भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना पाण्याविना जनतेची मोठी तारांबळ उडाली असल्याने शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत होता.जून महिना कोरडाच चालला असल्याने तो अधिकच हवालदिल झाला होता. मात्र, जूनच्या शेवटच्या आठवड्यात शेरी, खाकाळवाडी, वटणवाडी, दादेगाव कासारी, पिंपरी आष्टी, मांडवा, केरूळ, मोरेवाडी, डोईठाण, निमगाव चोभा, हातोला, पाटसरा, पाटण सांगवी, शिराळ, डोंगरगण, घाटापिंपरी, गौखेल, वेलतुरी, सावरगांव, देऊळगाव घाट, हरेवाडी, मराठवाडी, दौलावडगांव, अंभोरा, धानोरा, लोणी, पिपळा, पुडी वाहिरा, शिरापुर, मेहकरी यासह अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली.अनेक महिन्यांपासून पाण्याच्या थेंबासाठी आसुसलेले ठिकठिकाणचे बंधारे तुडुंब भरल्याने शेतकरी खुश झाल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर याच पावसावर आता परिसरात शेतकरी चाड्यावर मूठ धरण्याची त्याची तयारी दिसून येत आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसFarmerशेतकरी