शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सुविधांमुळे सिद्धीविनायक संकुल परिसर ‘हार्ट आॅफ सिटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:17 IST

सहयोगनगर, स्नेहनगरची मागील काळात काय परिस्थिती होती याची आपल्या सर्वांना कल्पना असून, सिध्दीविनायक संकुलाच्या उभारणीनंतर या भागाची ‘हार्ट आॅफ सिटी’ म्हणून ओळख निर्माण झाल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देभारतभूषण क्षीरसागर : व्यापाऱ्यांच्या बैठकीत स्थैर्य, शांतता विकासाची ग्वाही

बीड : पूर्वी लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आपल्याला बाहेरगावी जावे लागत होते. पण शहरात व्यापाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे शहरातील बाजारपेठा फुलत आहेत. सहयोगनगर, स्नेहनगरची मागील काळात काय परिस्थिती होती याची आपल्या सर्वांना कल्पना असून, सिध्दीविनायक संकुलाच्या उभारणीनंतर या भागाची ‘हार्ट आॅफ सिटी’ म्हणून ओळख निर्माण झाल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.शिवसेना, भाजपा, मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार जयदत्तअण्णा क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ शहरातील स्नेहनगर भागातील दिलीप लोढा यांच्या निवासस्थानी कॉर्नर बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.कालीदास थिगळे, नगरसेवक विष्णू वाघमारे, बाळासाहेब अंबेकर, सत्यनारायण कासट, महावीर समदरिया, राजेश बंब, पारस छाजेड, मनोज कोटेचा, आनंद छाजेड, दिलीप लोढा, प्रकाश दामा आदींची उपस्थिती होती.यावेळी डॉ.क्षीरसागर म्हणाले, १९८५ पासून शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम करीत असून, मला कधीही आमदारकीचे स्वप्न पडले नाही. स्व.काकू- नानानंतर अण्णा हे घराचे कर्ते आणि मोठे बंधू असून, आम्ही घराची परंपरा पाळण्याचे काम केले. रा.काँ.पक्षाने घरात दुही निर्माण केली तर तब्बल चार निवडणुकीत पडलेल्यांना विरोधी पक्ष नेता केले तर जनतेतून निवडून आलेल्या अण्णांची पक्षात नेहमीच अवहेलना झाली. या बाबीला कंटाळून पक्ष सोडण्याचा निर्णय झाला.शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी अण्णांना मंत्रीपदाची संधी दिली. मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी एकाच बैठकीत जिल्ह्यासह शहर विकासासाठी भरघोस निधी दिला. आमच्या परिवाराने कधीही जाती, पातीचे राजकारण केले नाही तर स्व.काकूंनी दिलेल्या मानवता धर्माच्या आदर्श शिकवणीचे पालन करीत असल्याचे ते म्हणाले.शहरातील सुभाष रोड, सहयोगनगर, बसस्टँडच्या मागील काँक्र ीट रस्त्याचे काम झाले असून, दळणवळणाची सोय झाली असून, सटवाई मैदान, मित्रनगर, नाट्यगृह रोडवरील रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रात महायुतीचे सरकार असून राज्यातही युतीचेच सरकार येणार आहे. नव्याने येणाºया सरकारमध्ये अण्णा हे कॅङ्मबनेटमंत्री होणार असून, त्याचा लाभ आपल्याला शहराच्या स्थैर्य आणि विकासासाठी होणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर