शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

धक्कादायक; बीडमध्ये पाच दिवसाला एक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 01:37 IST

बीड जिल्ह्यात महिला व मुली असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मागील पाच वर्षांत बलात्काराच्या ३६३ तर विनयभंगाच्या १२२१ घटनांची नोंद पोलीस दप्तरी आहे. सरासरीनुसार जिल्ह्यात प्रत्येक पाच दिवसाला एक बलात्कार, तर तीन दिवसाला विनयभंगाच्या दोन घटना घडत आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बीड : जिल्ह्यात महिला व मुली असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मागील पाच वर्षांत बलात्काराच्या ३६३ तर विनयभंगाच्या १२२१ घटनांची नोंद पोलीस दप्तरी आहे. सरासरीनुसार जिल्ह्यात प्रत्येक पाच दिवसाला एक बलात्कार, तर तीन दिवसाला विनयभंगाच्या दोन घटना घडत आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

धक्कादायक म्हणजे बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपी हे नात्यातील व ओळखीचेच असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. आरोपींना शिक्षेपर्यंत कसे पोहचविले जाईल यासाठी पोलिसांकडून कसोशिने प्रयत्न केले जात आहेत. वाढत्या घटनांमुळे महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शासनाकडून महिला व मुलींवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी विविध माध्यमांमार्फत जनजागृती करुन त्यांना संरक्षण दिले जात आहे. कायद्यातही कडक तरतूद केली आहे. असे असले तरी बीड जिल्ह्यातील महिला व मुलींवरील अत्याचार काही केल्या कमी होत नसल्याचे समोर आले आहे. पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवसेंदिवस जिल्ह्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. कायद्यात कडक तरतूद झाली असली तरी नराधम व वासनांध झालेल्यांना याचा फारसा फरक पडला नसल्याचे दिसून येत आहे.

घरात कोणी नसणे, निर्मनुष्य ठिकाण अशा विविध ठिकाणी संधी साधून नराधमांकडून महिला व मुलींवर अत्याचार केले जात आहेत. याची वाच्यता केली तर त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचे दाखल गुन्ह्यांमधून समोर आले आहे. त्यामुळे महिला व मुली आजही असुरक्षित असल्याचे दिसून येते.

या घटनांना आळा घालण्यासाठी व नराधमांचा कठोर सामना करण्यासाठी महिला व मुलींनी सक्षम होण्याची गरज आहे. तसेच आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आत्मविश्वासाने लढण्याची तयारी ठेवावी. झालेल्या अन्याय व अत्याचारावर वाचा फोडण्यासाठी तात्काळ तक्रार देऊन संबंधिताला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. एखाद्या गुन्ह्यात कठोर शिक्षा झाल्याचे पाहून इतर नराधम असा प्रकार करण्यास धजावणार नाहीत. तसेच महिला व मुलींनी स्व-संरक्षणाचे धडेही घेण्याची गरज आहे.

चालू वर्षात ३२ बलात्कारजानेवारी ते जून २०१८ या कालावधीत तब्बल ३२ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. तसेच १३३ विनयभंग झाले आहेत. १३१ विवाहितांचा छळ झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे.

छेडछाडीमुळेही भीतीयुक्त वातावरणएकटी असणे, जबरदस्ती करणे, रस्त्यावरुन जाताना महिला व मुलींची छेड काढली जात आहे. तसेच त्यांच्याकडे वाईट उद्देशाने पाहून लगट केली जाते. यामुळेही महिलांच्या मनात भीतीयुक्त वातावरण आहे. मागील पाच वर्षात तब्बल १२२१ विनयभंगाचे गुन्हे नोंद आहेत.

प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कारशाळा-महाविद्यालयातील तरुण एकमेकांकडे आकर्षिले जातात. सुरुवातीला त्यांच्यात प्रेम होते. त्यानंतर त्यांच्यात शरीरसंबंध येतात. सुरुवातीला असणारे प्रेम नंतर अत्याचारात बदलते. आपल्यावर जबरदस्ती झाल्याचे समजताच पीडिता तात्काळ पोलीस ठाणे गाठून संबंधिताविरोधात फिर्याद दिली. आधी प्रेम आणि नंतर बलात्काराचा गुन्हा अशी अनेक उदाहरणे जिल्ह्यात घडलेली आहेत.

महिला व मुलींच्या मनात भीतीशाळा - शिकवणी, महाविद्यालयात जाणाऱ्या मुली तसेच विविध कामांसाठी बाहेर पडणाºया महिला या मनात भीती घेऊनच घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. आपले काम आटोपून आपण घरी सुरक्षित कधी पोहचू याबाबत त्यांच्या मनांत चिंता असते. ठिकठिकाणी महिला व मुलींना वासनांध पुरुषांच्या वाईट नजरेचे शिकार बनावे लागत आहे.चार भिंतीत विवाहितांचा छळलग्नानंतर काही दिवसच विवाहितांना चांगली वागणूक दिली जाते. त्यानंतर हुंडा व इतर कारणे पुढे करीत माहेरहून पैसे आणण्यासाठी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला जातो. त्यांना उपाशीपोटी ठेवून घराबाहेर हाकलले जाते. पाच वर्षांमध्ये तब्बल १६९८ विवाहितांचा छळ झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. यावरुन चार भिंतीतही महिलांचा छळ होत असल्याचे दिसून येत आहे.

ओळखीच्यांकडूनच सर्वाधिक अन्याय - अत्याचारमहिला व मुलींवर अत्याचार केलेल्या घटनांमध्ये बोटावर मोजण्याइतकेच गुन्हे अनोळखी लोकांकडून घडले आहेत. अन्यथा बाकी सर्व नात्यातील किंवा ओळखीच्याच लोकांचा आरोपीत समावेश आहे. सुरुवातीला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि नंतर अत्याचार करायचा असा काहीसा प्रकार घडल्याचे गुन्हे आहेत.

पोलीस महासंचालकांकडून विभागप्रमुखांना आदेशलैंगिक छळाच्या घटनांमध्ये स्थानिक पातळीवर गांभिर्याने पाहिले जात नाही. दोषारोपपत्र पाठविताना अधीक्षक दर्जाच्या अधिकाºयाने त्याची संपूर्ण तपासणी करणे आवश्यक असल्याची सूचना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने पोलीस महासंचालकांना केली आहे. हाच धागा पकडून पोलीस महासंचालकांकडे मॅटच्या या सूचनांकडे गांभिर्याने पाहण्याचे आदेश सर्व विभाग प्रमुखांना नुकतेच दिले आहेत. त्या दृष्टीने बीड जिल्हा पोलीस दल कामाला लागले आहे.

टॅग्स :BeedबीडRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला