शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! एकाच ट्रॅव्हल्समधून कोरोनाग्रस्तांसोबत ४० जणांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 19:52 IST

हे सर्व माजलगाव व वडवणी तालुक्यातील रहिवाशी आहेत

ठळक मुद्दे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जासुरक्षेवर प्रश्नचिन्ह

बीड : माजलगाव तालुक्यातील कवडगाव थडी येथील दोन कोरोनाग्रस्त हे एका ट्रॅव्हल्समधून मुंबईहून गावी आले. याच ट्रॅव्हल्समध्ये तब्बल ४० प्रवासी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढ्या लोकांना प्रशासनाने परवानगी दिलीच कशी? आणि दिली नसेल तर रस्त्यात चेकपोस्ट व इतर गस्तीवरील पोलिसांनी अडवले का नाही, अशी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तब्बल ४० जणांनी सोबत प्रवास केल्याने सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट आहे. या सर्वांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. त्यामुळे बीडकरांची धाकधूक वाढली आहे. 

माजलगाव तालुक्यातील कवडगाव थडी येथील एक कुटूंब लॉकडाऊनच्या अगोदर दोन दिवसांनी मुंबईला गेले होते. लॉकडाऊन वाढत गेल्याने ते तिथेच अडकले. ११ मे रोजी ते एका खाजगी ट्रॅव्हल्समधून गावी आले. या ट्रॅव्हल्समध्ये कोरोनाग्रस्तांच्या कुटूंबातील चौघे व इतर ३६ लोक होते. हे सर्व माजलगाव व वडवणी तालुक्यातील रहिवाशी होते. मुंबईहून निघाल्यानंतर त्यांना रस्त्यात कोठेही अडविले किंवा हटकले नसल्याचे सांगण्यात येत आहे. गावात आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी त्यांना लक्षणे जाणवू लागली. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केल्यानंतर प्रयोगशाळेत स्वॅब पाठविण्यात आले. यात ते पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेले सर्वच प्रवासी व गावात आल्यानंतर संपर्कात आलेले सर्व नातेवाईकांना स्वॅब घेण्यासाठी माजलगाव व बीडला पाठविण्यात आले आहे. ट्रॅव्हल्समध्ये असलेले सर्वच प्रवासी त्यांच्या अगदी जवळून संपर्कात आल्याने अहवालाबाबत धाकधूक वाढली आहे. 

व्यक्तिगत नव्हे तर सार्वजनिक परवानगीआरोग्य विभागाच्या पथकाने या कोरोनाग्रस्तांची माहिती घेतली. एका खाजगी सराव करणाऱ्या डॉक्टरचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे होते. परंतु, येण्यासाठी व्यक्तीगत परवानगी नव्हती. ट्रॅव्हल्सवाल्यांकडेच ही परवानगी असल्याचे समजते. परंतु, असे असले तरी एका ट्रॅव्हल्समध्ये एवढ्या लोकांना परवानगी दिलीच कशी? आणि नसेल दिली तर गावी येईपर्यंत कोणीच कसे हटकले नाही, असा प्रश्न उपस्थित होते. या सर्व प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

दोघांचे स्वॅब दुसऱ्यांदा घेणारयाच कोरोनाग्रस्तांच्या सोबत मुंबईहून आलेल्या त्यांच्याच कुटूंबातील दोघांचे स्वॅब १७ मे रोजी घेतले होते. परंतु त्याचा निष्कर्ष निघत नसल्याने ४८ तासांनी पुन्हा स्वॅब घेण्यास प्रयोगशाळेकडून सांगण्यात आले. त्याप्रमाणे त्या दोघांचे मंगळवारी रात्री दुसऱ्यांदा स्वॅब घेतले जाणार होते. त्यांना लक्षणे जाणवत असल्याचेही समजते. त्यामुळे अहवाल काय येतो? याकडे लक्ष लागले आहे. 

कवडगाव थडी येथे मुंबईहून आलेल्या लोकांना तात्काळ क्वारंटाईन केले. लक्षणे जाणवताच स्वॅब घेण्यासाठी पाठविले. त्यांच्या कागपत्रांची तपासणी केली असता एका खाजगी डॉक्टरचे प्रमाणपत्र होते. वैयक्तिक परवानगी नाही दिसली.  सार्वजनिक परवानगीबद्दल सांगता येणार नाही. एकाच ट्रॅव्हल्समध्ये ४० लोक आल्याचे ते सांगतात. त्यांच्या संपर्कातील लोकांची यादी काढली आहे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कारवाई केली जात आहे. - डॉ.आकाश राठोड, वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र, टाकरवण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड