शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पुण्यातील साखर संकुलसमोर शिवसेनेचे 'रसवंती आंदोलन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 19:36 IST

ऊस गाळप सुरु होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला

माजलगाव (बीड ) : शिवसेनेच्या वतीने माजलगाव मतदारसंघातील तिन्ही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या गाळप झालेल्या ऊसाची बिल अदा न केल्यामुळे पुणे येथील साखर संकुल, साखर आयुक्त कार्यालयासमोर आज सकाळी 11 वाजल्यापासून 'रसवंती आंदोलन' करण्यात येत आहे. तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर शेतकरी व शिवसैनिकांचा या आंदोलनात सहभाग आहे.

माजलगाव मतदारसंघातील जय महेश साखर कारखाना पवारवाडी, छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव या तिन्ही कारखान्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या ऊस गाळपास सुरुवात केली मात्र दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला असून कारखान्यांना 15 दिवसात ऊस बील देणे देणे बंधनकारक असताना देखिल अद्याप शेतकऱ्यांना ऊस बीलाचे पैसे न मिळाल्याने या तिन्ही कारखान्यांच्या विरोधात शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव, शिवसैनिक आणि शेकडो शेतकऱ्यांचे आज पासून शिवाजीनगर पुणे येथील साखर संकुल साखर आयुक्त कार्यालयासमोर 'रसवंती आंदोलन' करण्यात येत आहे. 

आंदोलनात वडवणी तालुकाप्रमुख संदीप माने, रामदास ढगे , दयानंद शिंदे, नामदेव सोजे, मुंजाबा जाधव, तिर्थराज पांचाळ, अनिल धुमाळ, हनुमान सरवदे, उध्दव धुमाळ, महेश खेटे, गजानन गिराम, महादेव सुरवसे, गणेश राऊत, निलेश मुळे, गणेश शिंदे, शिवाजी सावंत, जयराम राऊत, नाना बामपारे, गोविंद काळे, करण थोरात आदींचा सहभाग आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेShiv SenaशिवसेनाBeedबीड