शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा माजलगाव तहसिलवर धडकला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 19:43 IST

उसाला रास्त भाव द्या, बोंडअळीग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई द्या यासह शेतक-यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेन आज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. यात शिवसेना पदाधिका-यांसोबत तालुक्यातील शेतकरी २०० बैलगाड्यातून सहभागी झाले होते  

माजलगाव (बीड) : उसाला रास्त भाव द्या, बोंडअळीग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई द्या यासह शेतक-यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेन आज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. यात शिवसेना पदाधिका-यांसोबत तालुक्यातील शेतकरी २०० बैलगाड्यातून सहभागी झाले होते  

माजलगाव तालुका सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत प्रगत आहे त्यामुळे येथे उसाचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर होते. मात्र कारखान्यांनी शेतकर्‍यांच्या हिताच्या 265 जातीच्या ऊसाची नोंद घेणे बंद केले आहे याची नोंद घ्यावी, उसाला ३००० रुपये भाव द्या. तसेच बोंडअळीमुळे झालेले नुकसानिची भरपाई द्यावी,  विज बील माफ करण्यात यावे, 24 तास विज पुरवठा करावा, शेतीमाल विक्रीसाठी लादण्यात आलेली ऑनलाईन प्रक्रिया रद्द करावी आदी मागण्या या मोर्चात करण्यात आल्या. 

याप्रसंगी बोलतांना सचिन मुळूक म्हणाले, प्रशासन शेतकर्‍यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री व स्थानिक आमदारांना शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांशी देणे घेणे नाही. प्रास्ताविकात आप्पासाहेब जाधव बोलतांना म्हणाले, सक्तीची वीज बिल वसुली करत महावितरणने लुट चालवली आहे. 

यात सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत नवले, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, उपजिल्हाप्रमुख नारायण काशिद, तालुकाप्रमुख सतिष सोळंके, शहरप्रमुख अशोक आळणे, युवासेनेचे तालुकाअधिकारी अ‍ॅड.दत्ता रांजवण, डॉ.उध्दव नाईकनवरे, रमेश खामकर, प्रल्हाद सोळंके, विश्‍वनाथ नंदिकोल्हे, अमोल डाके, अनंत सोळंके, दासु पाटील बादाडे, संजय शिंदे, माऊली काशिद, विठ्ठल जाधव, सतिष बोठे, सुनिल खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

२०० बैलगाड्यांचा सहभाग तालुक्यात शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी प्रथमच शिवसेनेच्या वतीने भव्य असा बैलगाडी मोर्चा निघाला होता. यात जवळपास 200 बैलगाड्या सहभागी होत्या. यामुळे शहरात 2 कि.मी. पर्यंत बैलगाड्यांची रांग लागली होती. 

टॅग्स :FarmerशेतकरीShiv Senaशिवसेना