शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जिल्हाबाहेरील कॅनॉलची दुरूस्ती करण्यासाठी मांजरा धरणाच्या ताब्यातील मशिनरी नेण्याच्या हालचाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 13:14 IST

जिल्ह्याबाहेरील मोठ्या धरणावरील कॅनॉलची दुरूस्ती करण्यासाठी मांजरा धरणाच्या ताब्यात असणारी मशिनरी नेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

ठळक मुद्दे पैठण, औरंगाबाद व जालना परिसरात या मशिनरी घेऊन जाण्यासाठी मांजरा प्रशासनाकडे  मागणीही करण्यात आली आहे. येथील मशिनरी इतरत्र हलविली तर या परिसरातील कॅनॉलची दुरूस्ती व देखभालीचे काम रखडेल.यामुळे जे पाणी शेतक-यांना नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे ते पुन्हा जानेवारीतच उपलब्ध होईल.

- अविनाश मुडेगावकरअंबाजोगाई (बीड): जिल्ह्याबाहेरील मोठ्या धरणावरील कॅनॉलची दुरूस्ती करण्यासाठी मांजरा धरणाच्या ताब्यात असणारी मशिनरी नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. पैठण, औरंगाबाद व जालना परिसरात या मशिनरी घेऊन जाण्यासाठी मांजरा प्रशासनाकडे  मागणीही करण्यात आली आहे. येथील मशिनरी इतरत्र हलविली तर या परिसरातील कॅनॉलची दुरूस्ती व देखभालीचे काम रखडेल. याचा फटका  शेतक-यांना निमूटपणे सहन करावा लागेल. जे पाणी शेतक-यांना  नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे. ते पुन्हा जानेवारीतच उपलब्ध होईल. सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या बोटचेपे धोरणाचा फटका शेतक-यांना बसतो आहे. 

धनेगाव येथील मांजरा धरण यावर्षी तुडुंब भरले. धरण भरल्यामुळे पाण्याच्या अपेक्षेवर या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड सुरू झाली. तसेच रब्बी हंगामातील पिकांनाही कॅनॉलच्या  सुटणा-या पाण्याचा मोठा दिलासा मिळू शकतो. रब्बी हंगामासाठी सुटणारे पहिले पाणी नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यात सुटेल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. मात्र यासाठी कॅनॉलची दुरूस्ती होणे गरजेचे आहे. अद्याप इथल्याच कॅनॉलच्या दुरूस्तीचे काम सुरू होण्यापूर्वीच येथील मशिनरी पैठण, जालना व औरंगाबाद परिसरातील कॅनॉलच्या दुरूस्तीसाठी देण्यात यावी, अशा आशयाचे पत्र व या संदर्भातील पाठपुरावा त्या ठिकाणांहून सुरू आहे. येथील मशिनरी त्या परिसरात गेल्यास येथील कामे रखडली जाऊन तब्बल एक ते दीड महिन्याचा उशीर पाणी सुटण्यासाठी होईल. कॅनॉलचे पहिलेच पाणी जर जानेवारीत गेले तर पेरलेल्या पिकांना पाणी न मिळाल्यास पुन्हा रबी हंगाम संकटात सापडणार आहे. अशा स्थितीत मांजरा धरणाच्या ताब्यातील मशिनरी इतरत्र न हलवता, परिसरातील दुरूस्तीचे कामे तात्काळ सुरू झाली तरच या परिसरातील शेतकºयांना धरणाच्या पाण्याचा लाभ होईल, अन्यथा याचा मोठा फटका शेतकºयांना निमूटपणे सहन करावा लागणार आहे. 

१८,२२३ हेक्टर शेतजमीन येते ओलिताखालीमांजरा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यावर एकूण १८ हजार २२३ हेक्टर शेतजमीन  सिंचनाखाली येते. डाव्या कालव्यावर १० हजार ५५८ हेक्टर तर उजव्या कालव्यावर ७ हजार ६६५ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येते. गेल्या तीन वर्षात मांजरा धरणात पाणी नसल्याने या परिसरातील शेतक-यांची उपेक्षा झाली होती. आता धरणात मुबलक पाणी आले तर मशिनरी हलविण्याचा घाट घातल्याने लाभक्षेत्रात येणा-या शेतक-यांची घोर उपेक्षा होणार आहे. 

औरंगाबादच्या बैठकीत दिले होते आदेशपैठण, जालना व  औरंगाबाद येथील कॅनॉलची दुरूस्ती करण्यासाठी मांजरा धरणाच्या ताब्यातील मशिनरी पाठवून देऊन या परिसरातील दुरूस्ती करून घ्यावी, असे तोंडी आदेश औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत देण्यात आले होते. या आदेशानुसारच या परिसरातील मशिनरी इतरत्र हलविण्याची मागणी झाली. या संदर्भात मांजरा धरणाचे उपअभियंता महेंद्र जोशी यांच्याकडे विचारणा केली असता या वृत्त्तास त्यांनी दुजोरा दिला.

मशिनरी हलवू देणार नाही - नंदकिशोर मुंदडा मांजरा धरणाची निर्मिती बीड जिल्ह्याच्याच भूमित झाली आहे. येथील शेतक-यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी धरणासाठी अधिग्रहण झाल्या त्यांना या पाण्याचा लाभ मिळणे क्रमप्राप्त आहे.  मांजरा धरणाच्या मशिनरी जर इतरत्र हलवून येथील शेतक-यांची उपेक्षा होणार असेल तर त्या मशिनरी इतरत्र हलवू दिल्या जाणार नाहीत. यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करू तसेच या संदर्भात न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कै. विमलताई मुंदडा विचारमंचचे  प्रमुख नंदकिशोर मुंदडा यांनी दिला.

टॅग्स :WaterपाणीDamधरण