शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाबाहेरील कॅनॉलची दुरूस्ती करण्यासाठी मांजरा धरणाच्या ताब्यातील मशिनरी नेण्याच्या हालचाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 13:14 IST

जिल्ह्याबाहेरील मोठ्या धरणावरील कॅनॉलची दुरूस्ती करण्यासाठी मांजरा धरणाच्या ताब्यात असणारी मशिनरी नेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

ठळक मुद्दे पैठण, औरंगाबाद व जालना परिसरात या मशिनरी घेऊन जाण्यासाठी मांजरा प्रशासनाकडे  मागणीही करण्यात आली आहे. येथील मशिनरी इतरत्र हलविली तर या परिसरातील कॅनॉलची दुरूस्ती व देखभालीचे काम रखडेल.यामुळे जे पाणी शेतक-यांना नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे ते पुन्हा जानेवारीतच उपलब्ध होईल.

- अविनाश मुडेगावकरअंबाजोगाई (बीड): जिल्ह्याबाहेरील मोठ्या धरणावरील कॅनॉलची दुरूस्ती करण्यासाठी मांजरा धरणाच्या ताब्यात असणारी मशिनरी नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. पैठण, औरंगाबाद व जालना परिसरात या मशिनरी घेऊन जाण्यासाठी मांजरा प्रशासनाकडे  मागणीही करण्यात आली आहे. येथील मशिनरी इतरत्र हलविली तर या परिसरातील कॅनॉलची दुरूस्ती व देखभालीचे काम रखडेल. याचा फटका  शेतक-यांना निमूटपणे सहन करावा लागेल. जे पाणी शेतक-यांना  नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे. ते पुन्हा जानेवारीतच उपलब्ध होईल. सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या बोटचेपे धोरणाचा फटका शेतक-यांना बसतो आहे. 

धनेगाव येथील मांजरा धरण यावर्षी तुडुंब भरले. धरण भरल्यामुळे पाण्याच्या अपेक्षेवर या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड सुरू झाली. तसेच रब्बी हंगामातील पिकांनाही कॅनॉलच्या  सुटणा-या पाण्याचा मोठा दिलासा मिळू शकतो. रब्बी हंगामासाठी सुटणारे पहिले पाणी नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यात सुटेल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. मात्र यासाठी कॅनॉलची दुरूस्ती होणे गरजेचे आहे. अद्याप इथल्याच कॅनॉलच्या दुरूस्तीचे काम सुरू होण्यापूर्वीच येथील मशिनरी पैठण, जालना व औरंगाबाद परिसरातील कॅनॉलच्या दुरूस्तीसाठी देण्यात यावी, अशा आशयाचे पत्र व या संदर्भातील पाठपुरावा त्या ठिकाणांहून सुरू आहे. येथील मशिनरी त्या परिसरात गेल्यास येथील कामे रखडली जाऊन तब्बल एक ते दीड महिन्याचा उशीर पाणी सुटण्यासाठी होईल. कॅनॉलचे पहिलेच पाणी जर जानेवारीत गेले तर पेरलेल्या पिकांना पाणी न मिळाल्यास पुन्हा रबी हंगाम संकटात सापडणार आहे. अशा स्थितीत मांजरा धरणाच्या ताब्यातील मशिनरी इतरत्र न हलवता, परिसरातील दुरूस्तीचे कामे तात्काळ सुरू झाली तरच या परिसरातील शेतकºयांना धरणाच्या पाण्याचा लाभ होईल, अन्यथा याचा मोठा फटका शेतकºयांना निमूटपणे सहन करावा लागणार आहे. 

१८,२२३ हेक्टर शेतजमीन येते ओलिताखालीमांजरा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यावर एकूण १८ हजार २२३ हेक्टर शेतजमीन  सिंचनाखाली येते. डाव्या कालव्यावर १० हजार ५५८ हेक्टर तर उजव्या कालव्यावर ७ हजार ६६५ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येते. गेल्या तीन वर्षात मांजरा धरणात पाणी नसल्याने या परिसरातील शेतक-यांची उपेक्षा झाली होती. आता धरणात मुबलक पाणी आले तर मशिनरी हलविण्याचा घाट घातल्याने लाभक्षेत्रात येणा-या शेतक-यांची घोर उपेक्षा होणार आहे. 

औरंगाबादच्या बैठकीत दिले होते आदेशपैठण, जालना व  औरंगाबाद येथील कॅनॉलची दुरूस्ती करण्यासाठी मांजरा धरणाच्या ताब्यातील मशिनरी पाठवून देऊन या परिसरातील दुरूस्ती करून घ्यावी, असे तोंडी आदेश औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत देण्यात आले होते. या आदेशानुसारच या परिसरातील मशिनरी इतरत्र हलविण्याची मागणी झाली. या संदर्भात मांजरा धरणाचे उपअभियंता महेंद्र जोशी यांच्याकडे विचारणा केली असता या वृत्त्तास त्यांनी दुजोरा दिला.

मशिनरी हलवू देणार नाही - नंदकिशोर मुंदडा मांजरा धरणाची निर्मिती बीड जिल्ह्याच्याच भूमित झाली आहे. येथील शेतक-यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी धरणासाठी अधिग्रहण झाल्या त्यांना या पाण्याचा लाभ मिळणे क्रमप्राप्त आहे.  मांजरा धरणाच्या मशिनरी जर इतरत्र हलवून येथील शेतक-यांची उपेक्षा होणार असेल तर त्या मशिनरी इतरत्र हलवू दिल्या जाणार नाहीत. यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करू तसेच या संदर्भात न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कै. विमलताई मुंदडा विचारमंचचे  प्रमुख नंदकिशोर मुंदडा यांनी दिला.

टॅग्स :WaterपाणीDamधरण