शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

'ती' लग्नासाठी जयपूरहून बीडला आली; मात्र 'कोवळे' प्रेम पाहून आल्या पाऊली परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 19:26 IST

चार महिन्यांपुर्वीच फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झाले. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, असे समजल्यावर ‘ती’ बीडला आली.

बीड : चार महिन्यांपुर्वीच फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झाले. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, असे समजल्यावर ‘ती’ बीडला आली. ‘त्याची’ भेट घेताच आपला प्रियकर अवघ्या १७ वर्षाचा असून आपण त्याप्रेक्षा ९ वर्षांनी मोठे आहोत, हे समजले. ही सर्व परिस्थिती अनुभवल्यानंतर मुलाच्या कुटूंबियांच्या मदतीनेच ती आल्या पाऊली परतली. हा प्रकार शुक्रवारी बालेपीर भागात घडला. मात्र प्रेमात वेडा झालेला मुलगा बेपत्ता असून याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

प्रत्येकाच्या हाती अँड्रॉईड मोबाईल आले आहेत. मोबाईलमध्ये इंटरनेट असल्याने सर्व सुविधा मोबाईलमध्येच उपलब्ध झाल्या. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर याच्या माध्यमातून सर्व जग जवळ आले आहे. यातील फेसबुकच्या आहारी बीड शहरातील बालेपीर भागात राहणारा कलीम (नाव बदललेले) गेला. सध्या बारावीच्या वर्गात तो शिक्षण घेत आहे. मागील चार महिन्यांपूर्वीच त्याची फेसबुकवरून राजस्थानमधील जयपुर येथील मनिषा (नाव बदललेले) या २६ वर्षीय तरूणीसोबत ओळख झाली. दोघांची चॅटींग वाढली. यातून त्यांची चांगलीच मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले, हे त्यांनाही समजले नाही. 

आपण दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही, हे समजल्यावर त्यांनी लग्नाचा विचार केला. दोघांकडूनही लग्नासाठी होकार मिळाला. हा सर्व प्रकार केवळ मनिषा आणि कलीम या दोघांमध्येच होता. याची दोघांच्याही कुटूंबियांना तिळमात्र कल्पना नव्हती. ठरल्याप्रमाणे मनिषाला बीडला बोलविण्यात आले. शुक्रवारी ती एका चिमुकलीला घेऊन बीडला आली. कलीमने तिला बसस्थानकावरून घरी नेले. अचानक आपला मुलगा एका मुलीला घरी घेऊन आल्याने कुटूंबियही चक्रावले. कलीमने सर्व हकिकत सांगितल्यावर त्यांना धक्काच बसला. परंतु त्यांनी यावर शांत राहणे पसंत केले.

सर्व माहिती घेतल्यावर मनिषा ही कलीमपेक्षा ९ वर्षांनी मोठी असल्याचे समजले. मनिषाने तात्काळ लग्नाला नकार दिला आणि आपल्याला औरंगाबादला सोडण्याची विनंती कलीमच्या कुटूंबियांकडे केली. त्यांनी तिला औरंगाबादला नेऊन सोडले. परंतु त्यानंतर अवघ्या काही तासांतच कलीमही घरातून बेपत्ता झाला. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही. नातेवाईकांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलाला अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली. ही घटना सध्या बीड शहरात चर्चचा विषय बनली आहे.

लग्नासाठी धरला हट्ट

मनिषाच्या वयाची माहिती घेतल्यावर कुटूंबियांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला. परंतु कलीम मनिषाच्या प्रेमात वेडा झाला होता. मला मनिषाची सोबतच लग्न करायचे आहे, असा हट्ट त्याने कुटूंबियांकडे धरला होता. परंतु यात त्याला अपयश आले. त्यानंतर तो बेपत्ता झाला. मग त्याने स्वता:हून पलायन केले की त्याला कोणी पळवून नेले? याचा तपास पोलीस करीत आहेत.     

शोध सुरु आहे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार घेतली आहे. या सर्व प्रकरणाची माहिती घेतली आहे. लवकरच याचा तपास पूर्ण करू. मुलाचा शोध घेणे सुरू आहे. अद्याप तो मिळालेला नाही.- आर.ए. शेख, पोउपनि, शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड