शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:37 IST

दीड वर्षांपासून शाळा बंद : मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला दीड वर्षांपासून शाळा बंदचा परिणाम : टीव्ही, मोबाईलच्या आहारी गेली मुले ...

दीड वर्षांपासून शाळा बंद : मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला

दीड वर्षांपासून शाळा बंदचा परिणाम : टीव्ही, मोबाईलच्या आहारी गेली मुले

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने मुले घरातच आहेत. मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकाग्रता कमी होणे, हट्टीपणा वाढत चालल्याने पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे समोर येत आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता गेल्यावर्षी पहिले ते चौथीचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंदच राहिले. चौथी ते बारावीच्या शाळा काही दिवसांसाठी सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या. यावर्षीदेखील विद्यार्थ्यांसाठी शाळा बंदच आहेत. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. मुले घरातच असल्याने मोबाईल व टीव्हीचे मोठे व्यसन त्यांना जडत आहे. याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास नसणे, नैराश्य, चिडचिडेपणा वाढीस लागला आहे. एकलकोंडेपणा, हट्टीपणा, कशातच मन न लागणे. अशा विविध समस्या मुलांमध्ये जाणवत आहेत. परिणामी या सर्व स्थितीमुळे पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे समोर येत आहे.

मुलांच्या समस्या

शाळा बंद असल्याने मुलांना मित्रांबरोबर प्रत्यक्ष जाऊन खेळता येत नाही. त्यामुळे खेळणे थांबले आहे. त्यामुळे मुले एकलकोंडी होत चालली आहेत. मुलांमधील ऊर्जेला सद्यस्थितीत पुरेशी वाट मिळत नाही. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. मुले जास्त हट्टी होत आहेत. मोबाईल, संगणक, टॅबच्या आहारी गेली आहेत.

पालकांच्या समस्या

शाळा बंद असल्याने पालकांना मुलांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता सतावत आहे. यातूनच नैराश्य, चिडचिडेपणाही वाढत असल्याचे समोर येत आहे. मुले मोबाईलच्या आहारी जात असल्याचे पाहून, पालकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

मुलांमधील चिडचिड वाढली आहे. मोबाईलच्या अति वापरामुळे डोळ्यांवर परिणाम होत आहेत. मुले एकलकोंडी होत आहेत. सकारात्मक चर्चा हवी, ती होत नाही. तसेच शिक्षक व विद्यार्थी संवाद गांभीर्याने होत नाहीत.

:डॉ. राजेश इंगोले,

मानसोपचार तज्ज्ञ, अंबाजोगाई

मुलांमध्ये मन न लागणे आदी समस्या जाणवत आहेत. पालकांचेही मानसिक आणि मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. आळशीपणा वाढत आहे. बुद्धिमत्तेची चंचलता कमी होणे, द्विधा स्थिती निर्माण होत आहे. कमजोरी, थकवा, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात.

-डॉ. शिवराज पेस्टे,

मानसोपचार तज्ज्ञ, अंबाजोगाई.

वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली - ४४,८७७

दुसरी - ५०,७९०

तिसरी- ५३,२९७

चौथी-- ४८,८९५

पाचवी- ५२,८३३

सहावी- ५२,८९७

सातवी- ५२,०१४

आठवी- ५१,८०२

नववी- ४९,८९३

दहावी- ४८,९८३

----------

शाळेच्या निर्णयाकडे लक्ष

शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे शासनाच्या वतीने सांगितले जात आहे. ग्रामीण भागातील काही शाळा सुरूही झाल्या आहेत. मात्र, नगर परिषदेच्या हद्दीतील शाळा बंदच आहेत. त्या कधी सुरु होतील? याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.