शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

ठरलं! बीडमध्ये मास्टरमाईंडच्या अटकेसाठी निघणार सर्वपक्षीय मोर्चा; सरकारची डोकेदुखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 17:12 IST

बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली असून यामध्ये २८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात मोर्चा काढण्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

Beed Murder Case ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला १५ दिवस उलटत आले असले तरी अद्याप तीन आरोपी फरार असल्याने जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली असून यामध्ये २८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात मोर्चा काढण्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हत्या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक व्हावी, ही या मोर्चाची प्रमुख मागणी असणार आहे. याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली.

"संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आज सर्वपक्षीय, सर्व समाज आणि संघटनांची एकत्र बैठक बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित सर्वांना स्व.संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली. बीड जिल्ह्यातील आपल्या बांधवाला न्याय देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारी, दहशत व जातीयवाद मोडीत काढण्यासाठी या बैठकीत अनेक मत सर्व उपस्थितांनी मांडले. हत्येतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे असे मत या बैठकीत मांडले. यावेळी उपस्थित सर्वांनी एकमताने दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी बीड मध्ये भव्य मोर्चा काढावा असे ठरवले गेले. भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या भव्य मोर्चाला सुरुवात होणार आहे," अशी माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी निष्पन्न झालेले आहेत. यातील चार अटक असून सुदर्शन घुलेसह तिघे अजूनही फरार आहेत. हाच मुद्दा यावेळी हिवाळी अधिवेशनात गाजला. त्यामुळे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदलीही करण्यात आला. आता हत्या होऊन १५ दिवस उलटत आले तरी यातील तीन आरोपी मोकाटच आहेत. तसेच या प्रकरणात मास्टरमाईंडही मोकाट असल्याचा आरोप होत आहे. आ.संदीप क्षीरसागर यांनी थेट वाल्मीक कराड यांचे नाव घेतले होते. असे असतानाही पोलिसांकडून आरोपी अटक होत नसल्याने बीडमध्ये मोर्चा काढण्याचे नियोजित केले होते. त्यासाठीच सोमवारी बैठक घेण्यात आली. यात सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय, सर्व नेत्यांचा समावेश होता. सुरूवातीला देशमुख यांना श्रद्धांजली अर्पन करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करायला हवे असे मत या मांडण्यात आले. त्यासाठीच २८ डिसेंबर रोजी सकाळी मोर्चा काढण्याचे ठरले. हा मोर्चा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप होणार आहे.

मुलीला आश्रू अनावरया बैठकीत संतोष देशमुख यांची १२ वी च्या वर्गात शिक्षण घेणारी वैभवी देखील उपस्थित होती. आपल्या वडिलांची हत्या झाली. मारेकऱ्यांना अटक करून शिक्षा द्यावी, अशी मागणी तिने केली. यावेळी तिला अश्रू अनावर झाले. न्याय द्या, सहकार्य करा, अशी विनवणी तिने केली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागर