शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

नेकनुरातील नदी पात्रातून वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST

पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रास बीड : तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनदेखील रस्त्याची ...

पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रास

बीड : तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनदेखील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात येताना-जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच शेतीमाल नेतानादेखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे.

शेतमजुरांना विमा कवचाची प्रतीक्षा

अंबाजोगाई : कोरोनाच्या काळात शेतमजुरांना रोजगारासाठी विविध ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. एकाच ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नसल्याने जिथे काम मिळेल, तिथे रोजगारासाठी जावे लागते. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग, अपघाती प्रसंग ओढवल्यास शेतमजुरांना विमा कवच असले पाहिजे.

स्मशानभूमीत शेड उभारावेत

वडवणी : तालुक्यात जवळजवळ सर्वच गावांत अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीकाठी किंवा शेतात उघड्या जागेचा वापर करावा लागत असल्याने पावसाळ्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. वडवणी तालुक्यात ४५ गावांचा समावेश असून, ३५ ग्रामपंचायती व एक नगरपंचायत आहे. यापैकी केवळ कवडगाव, देवडी, खळवट लिमगाव, देवगाव, काडीवडगाव, कुप्पा, तिगाव, चिंचाळा या गावांना स्मशानभूमी असून, उर्वरित गावांत सुविधाच नाही. गैरसोय टाळण्यासाठी स्मशानभूमीत शेड उभारण्याची मागणी होत आहे.

धारूर-आसोला रस्त्याची दुरवस्था

धारूर : धारूर ते असोला या आठ किलोमीटर रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक व प्रवासी वैतागून गेले आहेत. या रस्त्यावरील खड्डे तत्काळ प्रशासनाने बुजवावेत तसेच वाहनांचे होणारे नुकसान व अपघात टाळावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

शिरूर कासार शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले

बीड : गेल्या काही दिवसांपासून शिरूर कासार शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोऱ्या वाढल्याने नागरिकांत घबराट असून, त्यांच्या सुरक्षेबाबत विश्वास निर्माण होण्यासाठी रात्रीच्या वेळी शहरात गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. मागील चोरीच्या प्रकरणात तपास लागत नसल्याने चोरट्यांचे फावत आहे. या चोऱ्यांना आळा घालून गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

रस्त्यावरच्या फांद्या ठरताहेत धोकादायक

अंबाजोगाई : ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अनेक मोठमोठी काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या झाडांच्या फांद्या रस्त्यालगत येत आहेत. त्यामुळे मोठ्या वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने फांद्या तोडून रस्ता सुरक्षित करून देण्याची मागणी होत आहे.