शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

केजमध्ये पिकविम्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचा रास्तारोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 17:00 IST

छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. 

केज (बीड ) : तालुक्यातील शेतकर्‍यांना गतवर्षीचा खरीप पिकांचा विमा देण्यात यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सकाळी ११ वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. 

तालुक्यातील शेतकर्‍यांनी गतवर्षीच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजना घेतली. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतातील सोयाबीन, कापूस, मुग आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. असे असतानाही पिकांच्या उत्पन्नाच्या चुकीच्या नोंदी शासकीय यंत्रणेने घेतल्या. यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना पीकविमा योजनेतून वगळण्यात आले. या शेतकऱ्यांना पीकविमा योजनेत सहभागी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने 7 जुन रोजी केली शासनाकडे केली. मात्र याची प्रशासनाने दखल घेतली नाही व शेतकर्‍यांना पीकविमा योजनेत सहभागी केले नाही.

यामुळे संभाजी ब्रिगेडने सर्व शेतकऱ्यांना त्वरित पीकविमा योजना लागू करावा अशी मागणी करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी 11 वाजता रस्तारोको आंदोलन केले. तब्बल हे आंदोलन चाले यामुळे वाहतुकीला चांगलाच फटका बसला. यावेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार आशा वाघ यांनी स्वीकारले. आंदोलनात संघर्ष विकास समितीचे प्रा हनुमंत भोसले, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहूल खोडसे, योगेश अंबाड, विलास गुंठाळ, मनोज चौधरी, नरशिंग यादव, रामचंद्र चौधरी, हमीद शेख आदींचा सहभाग होता. 

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडagitationआंदोलनFarmerशेतकरी