शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

रेशनचे धान्य विक्रीला १० रुपये किलोने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:41 IST

मोठी टोळी सक्रिय : ग्रामीण भागातून देखील धान्य होतेय गायब बीड : कोरोना काळात संकटात केंद्र सरकारसह राज्य शासनानेही ...

मोठी टोळी सक्रिय : ग्रामीण भागातून देखील धान्य होतेय गायब

बीड : कोरोना काळात संकटात केंद्र सरकारसह राज्य शासनानेही सामान्य नागरिकांना मोफत व माफक दरात धान्य मिळावे यासाठी मोठा साठा पाठवण्यात आला होता. मात्र, यापैकी थेट गोदामातून तर, काही माल रेशन चालकांकडून विक्री केल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. तर, ज्यांना कमी दरात व मोफत धान्य मिळत आहे ते देखील १० ते १२ रुपये किलोने धान्य भुसार बाजारात विक्री करत असल्याचे समोर आले आहे.

कोरोना काळात दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वाटप केले जात होते. त्यानंतर दोन व तीन रुपये किलोने धान्य मिळत आहे. मात्र, याचा काहीजण गैरफायदा घेत असून, थेट गोदामातून मालाची विक्री किंवा रेशन दुकानदारांकडून रेशनचा माल विकल्याचे प्रकार समोर आले होते. मात्र, लाभार्थीच कमी पैशात धान्य घेत त्याची विक्री १० ते १२ रुपये किलोने करत आहे.

१० रुपये किलो तांदूळ

स्वस्त धान्य दुकानातून घेतलेले तांदूळ १० रुपये किलो दराने हॉटेल व इतर ठिकाणी विक्री केली जात आहे. त्यासाठी ग्रामीण व शहरी भागात धान्य खरेदी करण्यासाठी काहीजण फिरताना दिसतात. हे घ्या पुरावे

पेठ बीड

शहरातील पेठ बीड भागात स्वस्त धान्य खरेदी करण्यासाठी खासगी व्यापारी फिरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले असून, त्याला प्रतिसाद मिळत आहे.

हिंगणी

शहराप्रमाणे ग्रामीण भागात देखील रेशन धान्य खरेदी करण्यासाठी वाहनं घेऊन फिरत आहेत. या धान्य खरेदीची सुरुवात ५ रुपये किलोपासून केली जाते. शेवटी १० ते १२ रुपये किलोने खरेदी केली जाते.

सात्रा

येथे देखील रेशनचे मोफत मिळालेले धान्य विक्री करून त्याबदल्यात काही वस्तू खरेदी करताना काहीजण आढळून आले होते. त्याच पद्धतिने इतर गावांध्ये देखील असे धान्य कमी दरात खरेदी केले जाते.

पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांपर्यंत धान्य पोहचवणे व ते लाभार्थ्यांना मिळाले की नाही याची खातरजमा करणे इतपर्यंतच काम केले जाते. त्यानंतर लाभार्थ्यांकडून त्याचे काय केले जाते याविषयी सांगणे कठीण आहे. परंतु शासनाने मोफत व अत्याल्प दरात दिलेले धान्य खरेदी करणे गुन्हा आहे. संजिव राऊत

नायब तहसीलदार पुरवठा विभाग बीड