शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अनाथ असताना मिळाला ‘सहारा’; आता शेकडो हात करणार कन्यादान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 19:49 IST

‘बालग्राम’मध्ये सोहळा : दानशूरच करणार अहेर अन् बांधणार बस्ता

ठळक मुद्दे या सोहळ्यात दानशूरच अहेर घेणार असून बस्ता बांधण्याची तयारीही काहींनी दर्शविली आहे.

- सोमनाथ खताळ

बीड : अनाथ, उपेक्षित, वंचित मुलांचा सांभाळ करणाऱ्या बालग्राम अनाथालयातील कन्येचा विवाह सोहळा २३ फेब्रुवारीला पार पडत आहे. वयाच्या १४ व्या वर्षी अनाथ म्हणून आलेली बालिका आता २० व्या वर्षी लग्नबंधनात अडकत आहे. ‘सहारा’ देण्याबरोबरच मायेची ऊब मिळाल्यानंतर आता तिचे कन्यादान केले जाणार आहे. या सोहळ्यात दानशूरच अहेर घेणार असून बस्ता बांधण्याची तयारीही काहींनी दर्शविली आहे. 

मनीषाचे (नाव बदललेले) न कळणाऱ्या वयातच आई-वडिलांचे छत्र हरवले. नंतर ती आत्याकडे आली; परंतु तिचा येथे व्यवस्थित सांभाळ झाला नाही. साधारण १४ वर्ष वय असताना ती काळोखाच्या रात्री पोलिसांना मिळून आली. ती काहीच सांगत नव्हती. म्हणून पोलिसांनी तिला थेट सहारा अनाथालयात आणले. येथे प्रीती व संतोष गर्जे यांनी तिला सहारा आणि आई-वडिलांचे प्रेम दिले. सहा वर्षे पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करण्याबरोच तिचे शिक्षण पूर्ण केले. चांगले स्थळ आल्याने तिचे लग्न लावून देण्याचा निर्णय झाला. सोलापूर जिल्ह्यातील मंगेशने (नाव बदललेले) तिला पसंत करून लग्नाची इच्छा व्यक्त केली. २३ फेब्रुवारीला सकाळी ११.४५ वाजता लग्नाची वेळ ठरविण्यात आली आहे. सोहळ्याला लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, व्यापारी आदींची उपस्थित राहणार आहेत. पत्रिका वाटपही सुरू आहे.

सुराणा परिवाराने स्वीकारले पालकत्वपरभणी येथील कविता व गौतम सुराणा यांना मुलगी नाही. त्यांनी मनीषाचे पालकत्व स्वीकारण्याबरोबरच कन्यादानाची तयारी दर्शविली आहे. तिला त्यांनी मानसकन्या मानले आहे. लग्नपत्रिकेवर तसा उल्लेखही आहे. तर प्रीती व संतोष गर्जे आणि बालग्राम परिवाराची कन्या, असाही उल्लेख पत्रिकेवर आहे. लग्नानंतर येणे-जाण्यासह सर्व जबाबदारी सुराणा परिवार घेणार असल्याचे सांगण्यात आले. 

मदतीचे आवाहनबालग्राम परिवारातील मुलीचे हे पहिले लग्न असणार आहे. त्यामुळे खर्चही मोठ्या प्रमाणात आहे. अनेक दानशुरांनी सढळ हाताने मदत केली आहे. आणखी मदतीची गरज व्यक्त केली जात आहे. बालग्राम परिवाराला मदत करण्याचे आवाहन प्रीती व संतोष गर्जे यांनी केले आहे. 

१०७ मुलांचा बालग्राम परिवारवेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, कैद्यांची मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, उपेक्षित, वंचित, निरश्रित अशा विविध गटांतील मुलांचा बालग्राममध्ये सांभाळ केला जातो. सध्या येथे १०७ मुले असून यामध्ये ४८ मुलींचा समावेश आहे. प्रीती व संतोष गर्जे हे तरूण दाम्पत्य या मुलांचा सांभाळ करते. 

टॅग्स :marriageलग्नBeedबीडsocial workerसमाजसेवक