शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

अनाथ असताना मिळाला ‘सहारा’; आता शेकडो हात करणार कन्यादान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 19:49 IST

‘बालग्राम’मध्ये सोहळा : दानशूरच करणार अहेर अन् बांधणार बस्ता

ठळक मुद्दे या सोहळ्यात दानशूरच अहेर घेणार असून बस्ता बांधण्याची तयारीही काहींनी दर्शविली आहे.

- सोमनाथ खताळ

बीड : अनाथ, उपेक्षित, वंचित मुलांचा सांभाळ करणाऱ्या बालग्राम अनाथालयातील कन्येचा विवाह सोहळा २३ फेब्रुवारीला पार पडत आहे. वयाच्या १४ व्या वर्षी अनाथ म्हणून आलेली बालिका आता २० व्या वर्षी लग्नबंधनात अडकत आहे. ‘सहारा’ देण्याबरोबरच मायेची ऊब मिळाल्यानंतर आता तिचे कन्यादान केले जाणार आहे. या सोहळ्यात दानशूरच अहेर घेणार असून बस्ता बांधण्याची तयारीही काहींनी दर्शविली आहे. 

मनीषाचे (नाव बदललेले) न कळणाऱ्या वयातच आई-वडिलांचे छत्र हरवले. नंतर ती आत्याकडे आली; परंतु तिचा येथे व्यवस्थित सांभाळ झाला नाही. साधारण १४ वर्ष वय असताना ती काळोखाच्या रात्री पोलिसांना मिळून आली. ती काहीच सांगत नव्हती. म्हणून पोलिसांनी तिला थेट सहारा अनाथालयात आणले. येथे प्रीती व संतोष गर्जे यांनी तिला सहारा आणि आई-वडिलांचे प्रेम दिले. सहा वर्षे पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करण्याबरोच तिचे शिक्षण पूर्ण केले. चांगले स्थळ आल्याने तिचे लग्न लावून देण्याचा निर्णय झाला. सोलापूर जिल्ह्यातील मंगेशने (नाव बदललेले) तिला पसंत करून लग्नाची इच्छा व्यक्त केली. २३ फेब्रुवारीला सकाळी ११.४५ वाजता लग्नाची वेळ ठरविण्यात आली आहे. सोहळ्याला लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, व्यापारी आदींची उपस्थित राहणार आहेत. पत्रिका वाटपही सुरू आहे.

सुराणा परिवाराने स्वीकारले पालकत्वपरभणी येथील कविता व गौतम सुराणा यांना मुलगी नाही. त्यांनी मनीषाचे पालकत्व स्वीकारण्याबरोबरच कन्यादानाची तयारी दर्शविली आहे. तिला त्यांनी मानसकन्या मानले आहे. लग्नपत्रिकेवर तसा उल्लेखही आहे. तर प्रीती व संतोष गर्जे आणि बालग्राम परिवाराची कन्या, असाही उल्लेख पत्रिकेवर आहे. लग्नानंतर येणे-जाण्यासह सर्व जबाबदारी सुराणा परिवार घेणार असल्याचे सांगण्यात आले. 

मदतीचे आवाहनबालग्राम परिवारातील मुलीचे हे पहिले लग्न असणार आहे. त्यामुळे खर्चही मोठ्या प्रमाणात आहे. अनेक दानशुरांनी सढळ हाताने मदत केली आहे. आणखी मदतीची गरज व्यक्त केली जात आहे. बालग्राम परिवाराला मदत करण्याचे आवाहन प्रीती व संतोष गर्जे यांनी केले आहे. 

१०७ मुलांचा बालग्राम परिवारवेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, कैद्यांची मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, उपेक्षित, वंचित, निरश्रित अशा विविध गटांतील मुलांचा बालग्राममध्ये सांभाळ केला जातो. सध्या येथे १०७ मुले असून यामध्ये ४८ मुलींचा समावेश आहे. प्रीती व संतोष गर्जे हे तरूण दाम्पत्य या मुलांचा सांभाळ करते. 

टॅग्स :marriageलग्नBeedबीडsocial workerसमाजसेवक