शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
4
राहुल गांधींना वाचन करण्याचा आदेश कसा द्यायचा? सावरकरांवरील याचिका हायकोर्टाने फेटाळली
5
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
6
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
7
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
8
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
9
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
10
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
11
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
12
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
13
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
14
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
15
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
16
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
17
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
18
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
Manglagauri 2025 Date: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..

सचिन-सुनिलचं काय चुकलं?, पाकिस्तानला हरवण्याची धमक असलेल्यांवर टीका का?; शरद पवारांची 'बॅटिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 10:50 IST

मोदी सरकार धर्माच्या नावाखाली समाजामध्ये विष पसरवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केली.

बीड - मोदी सरकार धर्माच्या नावाखाली समाजामध्ये विष पसरवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केली. सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावसकर यांच्या भूमिकेत काय चुकले ? असा प्रश्न उपस्थित करत पवारांनी दोन्ही क्रिकेटर्सची पाठराखण केली आहे. भारत-पाकिस्तान सामना खेळू दिला पाहिजे, असे सचिनने म्हटले होते. तसेच, पाकिस्तानला पराभूत करण्याची ताकत टीम इंडियात असल्याचेही तो म्हणाला होता. या विधाननंतर सचिनवर टीकेची झोड उठली, याबाबत भाष्य करताना पवार यांनी सचिनची पाठराखण केली आहे.  

परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीच्या वतीने शनिवारी दुसऱ्या संयुक्त जाहीर सभेत पवार बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रा. जोगेंद्र कवाडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.

या सरकारने धनगर, मराठा, मुस्लिम समाजाची आरक्षणाच्या मुद्दावर फसवणूक केली आहे. शेतकरी, तरु ण बेरोजगारांचीही दिशाभुल केली आहे. जाती धर्माच्या नावावर द्वेष पसरविला जात आहे. आरक्षणाच्या माध्यमातूनही जातीय धोरण अवलंबिले जात आहे. जनतेत दुही पसरविण्याचे काम सरकारकडून होत असल्याचे पवार म्हणाले.

मी आयसीसीचा अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. जगाचे क्रिकेट मी अनुभवले आहे. मात्र, त्या क्रिकेट खेळामध्येही वाद घातला जात आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर अशा महान खेळाडूंचा अपमान केला जात आहे. सचिन तेंडुलकर यांनी एक भूमिका मांडली की, भारताच्या खेळाडूंना पाकिस्तानशी सामना करू द्या. त्यांचा पराभव करण्याची धमक आमच्या खेळाडूंमध्ये आहे मात्र, त्यांच्यावर जातीयवाद आणि पाकिस्तान प्रेमाचा ठपका ठेवला गेला. ज्यांनी सचिनवर आरोप केला त्यांना माहिती नाही, वयाच्या 15 व्या वर्षी सचिनने पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानचा पराभव केला होता. पराभव करण्याची धमक ज्या सचिनमध्ये आहे, त्यावर आरोप केले गेले याची खंत वाटते. याचे एकच कारण आहे, यांना विष पसरवायचे आहे. त्यांना उत्तर देण्याची आणि धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारवर जहाल शब्दात टीका केली. तसेच एकप्रकारे सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांची पाठराखणही केली आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSachin Tendulkarसचिन तेंडुलकरNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारPakistanपाकिस्तान